शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

१० वाजता अधिकाऱ्यांची दालने रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:01 IST

‘लोकमत’ची चमू गुरुवारी सकाळी १०.४५ वाजता महावितरण कार्यालयात पोहचली असता, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. त्यांच्या दालनातील पंखा आणि चार दिवे सुरू होते. विजेचा अपव्यय होत होता. लगतच्या कार्यकारी अभियंता प्रतीक्षा शंभरकर यादेखील त्यांच्या दालनात उपस्थित नव्हत्या. पंखा आणि दिवे त्यांच्याही दालनात सुरू होते. अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे यांच्या दालनात नव्हते.

ठळक मुद्देये है मेरा 'एमएसईडीसीएल' : भरभर पंखे सुरू, दिव्यांचाही झगमगाट, वीज ग्राहक ताटकळत, होणार का लेटलतिफांवर कारवाई?

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारीत मोठ्या प्रमणात वाढ झाली आहे. संवेदनशील काळात कर्तव्यावर वेळेत उपस्थित राहून तक्रारींचा निपटारा करणे, शिस्त लावणे हे ज्यांचे प्रमुख कर्तव्य आहे, तेच बड्या पगाराचे अधिकारी ११ वाजेर्पंत कार्यालयात पोहोचले नसल्याचे वास्तव 'लोकमत'च्या स्टिंग ऑपरेशनमधून गुरुवारी उघड झाले.महावितरण कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता सकाळी १० च्या ठोक्याला कार्यालयात उपस्थित नव्हते. इतर अनेक अधिकाऱ्यांची स्थिती हीच होती.वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याची बचत करा, असा संदेश देणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनातील पंखे, विजेचे दिवे मात्र, ते अनुपस्थित असतानाही सुरूच होते.‘लोकमत’ची चमू गुरुवारी सकाळी १०.४५ वाजता महावितरण कार्यालयात पोहचली असता, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. त्यांच्या दालनातील पंखा आणि चार दिवे सुरू होते. विजेचा अपव्यय होत होता. लगतच्या कार्यकारी अभियंता प्रतीक्षा शंभरकर यादेखील त्यांच्या दालनात उपस्थित नव्हत्या. पंखा आणि दिवे त्यांच्याही दालनात सुरू होते. अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे यांच्या दालनात नव्हते. पंखा आणि दोन दिवे सुरू होते. उपकार्यकारी अभियंता पी.आर.अजमिरे त्यांच्या दालनात नव्हते. पंखा आणि एक दिवा सुरू होता. उपकार्यकारी अभियंता एस.ए. जयस्वाल त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. पंखा आणि दोन दिवे सुरू होते. इतर अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दालनातील स्थिती अशीच होती.मुख्य अभियंता सुचित्रा गुजर त्यांच्या दालनात नव्हत्या. जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड यांनी त्या गुरुवारी रजेवर असल्याचे सांगितले.दुपारी १.३० ते २ वाजेपर्यंतचा 'लंच टाईम' वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत कर्तव्यावर हजर असणे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. परंतु दीड-दोन तासांपर्यंत अधिकारी कार्यालर्यात पोहोचत नसतील तर ग्राहकांची कामे होणार कशी? सकाळी कामांसाठी पोहोचणाऱ्यांना ताटकळत ठेवण्याचे अधिकार यांना आहेत काय? राज्य कुणाचे, जनेतेचे की अधिकाऱ्यांचे, असे प्रश्न उपस्थित होतात.उशिरा येणार, दीड तास बसविणारअधिकारी, कर्मचारी नेहमीच कार्यालयात उशिरा येत असल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी उशिरा आल्यानंतरही त्यांना भेटावयाचे असेल तर सामान्य नागरिकांना अर्धा ते एक तासभर वेटींग रुममध्ये बसवून ठेवले जातात. चिठ्ठी आत गेल्याशिवाय कुणालाही परवानगी नसते. इच्छेप्रमाणे यायचे, सोयीनुसार भेटायचे, ही कार्यपद्धती अपेक्षित आहे काय?भेटणाऱ्यांची नोंद, कर्मचाºयांची मात्र नाही!महावितरणच्या मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता कार्यालयातील कामानिमित्य बाहेरून येणाºया प्रत्येक व्यक्तिची नोंद प्रवेशव्दारावरच रजीस्टरमध्ये घेण्यात येते. मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आगमनाची नोंद होत नाही. महावितरण कार्यालयातील बायोमेट्रीक मशीनसुद्धा बंद आहे. त्यामुळे कुणी किती तास कम केले याचा हिशेब कसा ठेवणार, कोण ठेवणार हा प्रश्न उपस्थित होतो.मी रजेवर आहे. कार्यालयात पुन्हा उपस्थित झाल्यानंतर कोण-कोण अनुपस्थित होते, त्याची चौकशी करण्यात येईल.- सुचित्रा गुजर,मुख्य अभियंता,महावितरण

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र