शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

१ लाख २० हजार विद्यार्थ्यांच्या होणार नव्याने ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. मात्र, अंतिम वर्षात पोहोेचले. पण, प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्र परीक्षा दिल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयारी चालविली आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे स्वरूप, मूल्यांकन, निकाल आदी बाबी कशा पद्धतीने असाव्यात, यासाठी अगोदर विद्वत परिषद, परीक्षा मंडळ आणि त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देप्राधिकरणाच्या निर्णयाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा, मू्ल्यांकन, निकाल आदी प्रक्रिया पूर्णत्वास नेली. आता परीक्षेपासून दूर असलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या नियोजनाची तयारी आरंभली आहे. विद्यापीठांतर्गत १.२० लाख विद्यार्थी असल्याची नाेंद आहे.अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. मात्र, अंतिम वर्षात पोहोेचले. पण, प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्र परीक्षा दिल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयारी चालविली आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे स्वरूप, मूल्यांकन, निकाल आदी बाबी कशा पद्धतीने असाव्यात, यासाठी अगोदर विद्वत परिषद, परीक्षा मंडळ आणि त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यात येणार आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतील सुमारे १.२० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येईल. परीक्षांचे वेळापत्रक, केंद्र, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन, निकाल आदी बाबींचे नियोजन विद्यापीठ स्तरावर करण्यात येणार  असल्याची माहिती आहे. परीक्षा विभागाने त्यानुसार तयारी सुरू केली आहे. 

डिसेंबर महिन्यात परीक्षा होण्याचे संकेतप्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या सत्राच्या परीक्षांना विविध प्राधिकरणांनी मान्य दिल्यानंतर डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे नियोजन सुरू झाले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील आदींच्या मार्गदर्शनात परीक्षाबाबत तयारी करण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेत सर्वांगीण चर्चा झाल्यानंतर या परीक्षांवर शिक्कामोर्तब केले जाईल. परीक्षांचे वेळापत्रक, स्वरूप, निकाल, मूल्यांकन आदी निश्चित केले जाईल.

अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्राच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. परीक्षा महाविद्यालय स्तरावर होतील, असे संकेत आहे. परीक्षांसाठी पूरक साहित्य विद्यापीठाकडून पुरविण्यात येतील.हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

 

टॅग्स :universityविद्यापीठ