शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख २० हजार विद्यार्थ्यांच्या होणार नव्याने ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. मात्र, अंतिम वर्षात पोहोेचले. पण, प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्र परीक्षा दिल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयारी चालविली आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे स्वरूप, मूल्यांकन, निकाल आदी बाबी कशा पद्धतीने असाव्यात, यासाठी अगोदर विद्वत परिषद, परीक्षा मंडळ आणि त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देप्राधिकरणाच्या निर्णयाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा, मू्ल्यांकन, निकाल आदी प्रक्रिया पूर्णत्वास नेली. आता परीक्षेपासून दूर असलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या नियोजनाची तयारी आरंभली आहे. विद्यापीठांतर्गत १.२० लाख विद्यार्थी असल्याची नाेंद आहे.अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. मात्र, अंतिम वर्षात पोहोेचले. पण, प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्र परीक्षा दिल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयारी चालविली आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे स्वरूप, मूल्यांकन, निकाल आदी बाबी कशा पद्धतीने असाव्यात, यासाठी अगोदर विद्वत परिषद, परीक्षा मंडळ आणि त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यात येणार आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतील सुमारे १.२० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येईल. परीक्षांचे वेळापत्रक, केंद्र, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन, निकाल आदी बाबींचे नियोजन विद्यापीठ स्तरावर करण्यात येणार  असल्याची माहिती आहे. परीक्षा विभागाने त्यानुसार तयारी सुरू केली आहे. 

डिसेंबर महिन्यात परीक्षा होण्याचे संकेतप्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या सत्राच्या परीक्षांना विविध प्राधिकरणांनी मान्य दिल्यानंतर डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे नियोजन सुरू झाले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील आदींच्या मार्गदर्शनात परीक्षाबाबत तयारी करण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेत सर्वांगीण चर्चा झाल्यानंतर या परीक्षांवर शिक्कामोर्तब केले जाईल. परीक्षांचे वेळापत्रक, स्वरूप, निकाल, मूल्यांकन आदी निश्चित केले जाईल.

अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्राच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. परीक्षा महाविद्यालय स्तरावर होतील, असे संकेत आहे. परीक्षांसाठी पूरक साहित्य विद्यापीठाकडून पुरविण्यात येतील.हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

 

टॅग्स :universityविद्यापीठ