शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभाग ‘पदवीधर’ निवडणुकीत १.८६ लाख मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 20:01 IST

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अंतिम मतदार यादी जाहीर केली.

गजानन मोहोडअमरावती :

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अंतिम मतदार यादी जाहीर केली. यामध्ये १,८६ ३६० मतदारांचा समावेश आहे. प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत ६०,४३६ ने वाढ, तर सन २०१७ च्या तुलनेत सद्यस्थितीत २४,१५१ ने मतदार संख्या कमी झाल्याचे दिसून येते.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील आमदारांचा कालावधी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी समाप्त होत आहे. त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झालेली आहे. ती २ फेब्रुवारी दिवशी मतमोजणी संपेपर्यंत सुरू राहणार आहे.

पदवीधर मतदारसंघात दर सहा वर्षांत किमान १० टक्के मतदारसंख्या वाढ गृहीत धरण्यात येते. यामध्ये काही मतदार मृतदेखील होतात. त्यानुसार यावेळेस किमान २.३५ ते २.४० लाखांचे दरम्यान मतदारसंख्या राहील, अशी निवडणूक विभागाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती संख्यादेखील पार झालेली नसल्याने यावेळी पदवीधरांमध्ये असलेला अनुत्साह चर्चील्या जात आहे. या मतदारसंघासाठी प्रत्येक वेळी नव्याने मतदार यादी तयार केली जाते. त्यानुसार निवडणूक विभागाने प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती केली होती.मतदारसंख्येत होणार वाढपदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त ५ जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध करतील. त्यापूर्वी नोंदणी झालेले मतदार या यादीमध्ये राहणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. याशिवाय उमेदवारी अर्ज प्रक्रियेपर्यंत मतदार नोंदणी करू शकतात. मात्र, मतदार यादीत नाव येण्यासाठी अंतिम दिनाचे पाच दिवसांपूर्वी नोंदणी आवश्यक आहे.विभागात आचारसंहिता लागूआयोगाद्वारा २९ डिसेंबरला ‘पदवीधर’साठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर विभागातील पाचही जिल्ह्यात आचारसंहितेचा अंमल सुरू झालेला आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाग करणारी कोणतीही कृती करता येणार नाही. दोन महिन्यांपासून सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता २० डिसेंबरला संपुष्टात आल्यानंतर आठ दिवसांत पुन्हा ‘पदवीधर’साठी लागू झालेली आहे.