शहरं
Join us  
Trending Stories
1
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
2
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
3
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
4
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
5
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
6
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
7
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
8
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
9
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
10
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
11
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
12
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
13
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
14
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
15
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
16
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
17
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
18
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
19
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
20
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ नियोजनापायी वऱ्हाडात उन्हाळ्याच्या तोंडावरच १, ३११ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 11:06 IST

सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाल्याने विभागातील ४६ तालुक्यांची भूजल पातळी १० फुटापर्यंत खोल गेल्याचा अहवाल असतानाही सर्व जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे विभागातील १,३११ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे७१ गावांत टँकरने पाणीपुरवठा१,६४१ उपाययोजना, दोन महिने उशिरा नियोजन

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाल्याने विभागातील ४६ तालुक्यांची भूजल पातळी १० फुटापर्यंत खोल गेल्याचा भुजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल असतानाही सर्व जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी तीन विभागांचा संयुक्त कृती आराखडादेखील यंदा दोन महिने उशिरा तयार करण्यात आला, त्यासाठीही विभागीय आयुक्तांना कानपिचक्या घ्याव्या लागल्या. यामुळे विभागातील १,३११ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर १,६४१ उपाययोजनांची मात्रा सुचविण्यात आल्यात.या योजनांवर ११ कोटी ५५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तूर्तास टंचाईचा सामना करण्यासाठी तीन जिल्ह्यांमध्ये ७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. स्थाानिक स्तरावर नियोजनाचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी तीन विभागांचा संयुक्त कृती आराखडा तयार करण्यात येतो. यंदा मात्र, याला दोन महिने उशीर लागल्यामुळे अनेक गावांमध्ये वेळेवर उपाययोजना सुरू न झाल्याने नागरिकांना टंचाईची झळ पोहोचली आहे.विभागात एप्रिल ते जून या कालावधीत ११५ गावांमध्ये ८८४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यावर ३.४४ कोटींचा खर्च होणार आहे. ११५ गावांमध्ये २०९ विहिरींचे खोलीकरण करण्यात येणार आहे. ७३ गावांमध्ये दोन कोटी १५ लाखांच्या निधीतून ७३ नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. १६ विंधन विहिरींची दुरूस्ती, तर २१० गावांमध्ये २१३ नवीन विंधन विहीरी तयार करण्यात येणार आहे. यावर एक कोटी ७५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. चार गावांमध्ये २१ लाखांचा निधी खर्च होणार आहे. अशा एकंदरीत १,६४१ उपाययोजनांवर ११ कोटी ४१ लाखांचा निधी खर्च होणार आहे.

तीन जिल्ह्यांत ८५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठासद्यस्थितीत विभागात १८ तालुक्यांमधील ८५ गावांमध्ये तीन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये सर्वाधिक ५६ गावे अकोला जिल्ह्यातील आहेत. या गावांमध्ये ४२ टँकर, यवतमाळ जिल्ह्यात १७ गावांमध्ये १७ टँकर, तर बुलडाणा जिल्ह्यात १२ गावांमध्ये १२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. या महिन्याअखेर आणखी ५० टँकर वाढतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला.

४८४ प्रकल्पांमध्ये सरासरी २५ टक्केच साठाविभागात एकूण मोठे, मध्यम व लघु असे एकूण ४८४ प्रकल्प आहेत. यात सध्या पूर्ण संचयन पातळीच्या २५ टक्केच साठी शिल्लक आहे. यामध्ये १० टक्के मृतसाठा, दररोज होणारे बाष्पीभवन, शेतीसिंचन, औद्योगिक व पाणीपुरवठा योजनांचा वापर गृहित धरता आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. सद्यस्थितीत ९ मुख्य प्रकल्पांत २९.४२ टक्के, २३ मध्यम प्रकल्पांत १६.२४ टक्के तर, ४५२ लघुप्रकल्पांमधअये १६.२४ टक्के साठा शिल्लक आहे.

टॅग्स :Waterपाणी