शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

ढिसाळ नियोजनापायी वऱ्हाडात उन्हाळ्याच्या तोंडावरच १, ३११ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 11:06 IST

सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाल्याने विभागातील ४६ तालुक्यांची भूजल पातळी १० फुटापर्यंत खोल गेल्याचा अहवाल असतानाही सर्व जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे विभागातील १,३११ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे७१ गावांत टँकरने पाणीपुरवठा१,६४१ उपाययोजना, दोन महिने उशिरा नियोजन

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाल्याने विभागातील ४६ तालुक्यांची भूजल पातळी १० फुटापर्यंत खोल गेल्याचा भुजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल असतानाही सर्व जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी तीन विभागांचा संयुक्त कृती आराखडादेखील यंदा दोन महिने उशिरा तयार करण्यात आला, त्यासाठीही विभागीय आयुक्तांना कानपिचक्या घ्याव्या लागल्या. यामुळे विभागातील १,३११ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर १,६४१ उपाययोजनांची मात्रा सुचविण्यात आल्यात.या योजनांवर ११ कोटी ५५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तूर्तास टंचाईचा सामना करण्यासाठी तीन जिल्ह्यांमध्ये ७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. स्थाानिक स्तरावर नियोजनाचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी तीन विभागांचा संयुक्त कृती आराखडा तयार करण्यात येतो. यंदा मात्र, याला दोन महिने उशीर लागल्यामुळे अनेक गावांमध्ये वेळेवर उपाययोजना सुरू न झाल्याने नागरिकांना टंचाईची झळ पोहोचली आहे.विभागात एप्रिल ते जून या कालावधीत ११५ गावांमध्ये ८८४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यावर ३.४४ कोटींचा खर्च होणार आहे. ११५ गावांमध्ये २०९ विहिरींचे खोलीकरण करण्यात येणार आहे. ७३ गावांमध्ये दोन कोटी १५ लाखांच्या निधीतून ७३ नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. १६ विंधन विहिरींची दुरूस्ती, तर २१० गावांमध्ये २१३ नवीन विंधन विहीरी तयार करण्यात येणार आहे. यावर एक कोटी ७५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. चार गावांमध्ये २१ लाखांचा निधी खर्च होणार आहे. अशा एकंदरीत १,६४१ उपाययोजनांवर ११ कोटी ४१ लाखांचा निधी खर्च होणार आहे.

तीन जिल्ह्यांत ८५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठासद्यस्थितीत विभागात १८ तालुक्यांमधील ८५ गावांमध्ये तीन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये सर्वाधिक ५६ गावे अकोला जिल्ह्यातील आहेत. या गावांमध्ये ४२ टँकर, यवतमाळ जिल्ह्यात १७ गावांमध्ये १७ टँकर, तर बुलडाणा जिल्ह्यात १२ गावांमध्ये १२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. या महिन्याअखेर आणखी ५० टँकर वाढतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला.

४८४ प्रकल्पांमध्ये सरासरी २५ टक्केच साठाविभागात एकूण मोठे, मध्यम व लघु असे एकूण ४८४ प्रकल्प आहेत. यात सध्या पूर्ण संचयन पातळीच्या २५ टक्केच साठी शिल्लक आहे. यामध्ये १० टक्के मृतसाठा, दररोज होणारे बाष्पीभवन, शेतीसिंचन, औद्योगिक व पाणीपुरवठा योजनांचा वापर गृहित धरता आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. सद्यस्थितीत ९ मुख्य प्रकल्पांत २९.४२ टक्के, २३ मध्यम प्रकल्पांत १६.२४ टक्के तर, ४५२ लघुप्रकल्पांमधअये १६.२४ टक्के साठा शिल्लक आहे.

टॅग्स :Waterपाणी