शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने महावितरणला दिला १.२५ कोटींचा शॉक; ८१४ विद्युत खांब कोसळले, ६० किलोमीटर वीज वाहिन्या क्षतीग्रस्त

By उज्वल भालेकर | Updated: April 11, 2024 18:52 IST

या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यात बसला असून जवळपास १.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

अमरावती : जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या वादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला बसला आहे. अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने शेकडो गावातील वीज पुरवठा खंडित झाला. या पावसामुळे ८१४ वीज खांब कोसळले असून ६० किलोमीटर पर्यंतच्या विद्युत वाहिन्या क्षतीग्रस्त झाल्या आहेत. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यात बसला असून जवळपास १.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. यामध्ये महावितरणलाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. आकाशातील वीज आणि महावितरणची वीज यंत्रणा यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन अनेक वीज वाहिन्यावरील इन्सुलेटर फुटले तसेच उपकेंद्रात तांत्रिक दोष निर्माण झाले. याचबरोबर काही ठिकाणी वादळाच्या प्रचंड दबावामुळे झाडे उन्मळून वीज वाहिन्यावर पडली होती. परिणामी महावितरणची ९ उपकेंद्रे आणि ३७ फिडर पूर्णत: बंद पडले होते. चांदूर बाजार परिसरात महावितरणचे उच्चदाबाचे २४१ आणि लघुदाबाचे ४२४ वीज खांब कोसळले. यामुळे साडेसतरा किलोमीटर उच्चदाब आणि ३० किलोमीटर लघुदाबाच्या वीज वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या. त्याचबरोबर ५ रोहित्रात तांत्रिक दोष निर्माण होऊन नादूरुस्त झाले. तर ४ रोहित्रे जमिनीवर खाली पडून नुकसान झाले. तसचे भातकुली परिसरातही ३३ उच्चदाबाचे आणि ७९ लघुदाबाचे वीज खांब कोसळले असून ९ किमी वीज वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. अचलपूर विभागात उच्च आणि लघुदाब वर्गवारीतील ३२ वीज खांब कोसळले असून २ किलोमीटर वीज वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या आहेत. तसेच दोन रोहित्रे नादुरुस्त झाली आहेत. तर अमरावती शहरात ७ वीजेचे खांब कोसळले असून १ रोहित्र खाली पडले आहे. ३ रोहित्रात तांत्रिक दोष निर्माण होऊन निकामी झाले झाल्यामुळे महावितरणला १.२५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

याठिकाणचा वीज पुरवठा झाला सुरळीतवादळ थांबताच महावितरणने टप्प्या- टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु केले. जेथे शक्य झाले त्या ठिकाणी उपकेंद्राला बॅक फिडींगने वीज पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेल्या ३३ केव्ही पाडा, ३३ केव्ही घाटलाडकी, ३३ केव्ही खोलापूर,३३ केव्ही आमला,३३ केव्ही ब्राम्हणवाडा,३३ केव्ही तोंडगाव, ३३ केव्ही खल्लार,३३ केव्ही चांदस वाटोडा आणि ३३ केव्ही टाकरखेडा या उपकेंद्राचा आणि त्या उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या तसेच या उपकेंद्रातून वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या ३७ वीज वाहिन्यांचा बंद पडलेला वीज पुरवठा सुरु करण्यास महावितरणला यश आले आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज