शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

वादळी पावसाने महावितरणला दिला १.२५ कोटींचा शॉक; ८१४ विद्युत खांब कोसळले, ६० किलोमीटर वीज वाहिन्या क्षतीग्रस्त

By उज्वल भालेकर | Updated: April 11, 2024 18:52 IST

या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यात बसला असून जवळपास १.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

अमरावती : जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या वादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला बसला आहे. अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने शेकडो गावातील वीज पुरवठा खंडित झाला. या पावसामुळे ८१४ वीज खांब कोसळले असून ६० किलोमीटर पर्यंतच्या विद्युत वाहिन्या क्षतीग्रस्त झाल्या आहेत. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यात बसला असून जवळपास १.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. यामध्ये महावितरणलाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. आकाशातील वीज आणि महावितरणची वीज यंत्रणा यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन अनेक वीज वाहिन्यावरील इन्सुलेटर फुटले तसेच उपकेंद्रात तांत्रिक दोष निर्माण झाले. याचबरोबर काही ठिकाणी वादळाच्या प्रचंड दबावामुळे झाडे उन्मळून वीज वाहिन्यावर पडली होती. परिणामी महावितरणची ९ उपकेंद्रे आणि ३७ फिडर पूर्णत: बंद पडले होते. चांदूर बाजार परिसरात महावितरणचे उच्चदाबाचे २४१ आणि लघुदाबाचे ४२४ वीज खांब कोसळले. यामुळे साडेसतरा किलोमीटर उच्चदाब आणि ३० किलोमीटर लघुदाबाच्या वीज वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या. त्याचबरोबर ५ रोहित्रात तांत्रिक दोष निर्माण होऊन नादूरुस्त झाले. तर ४ रोहित्रे जमिनीवर खाली पडून नुकसान झाले. तसचे भातकुली परिसरातही ३३ उच्चदाबाचे आणि ७९ लघुदाबाचे वीज खांब कोसळले असून ९ किमी वीज वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. अचलपूर विभागात उच्च आणि लघुदाब वर्गवारीतील ३२ वीज खांब कोसळले असून २ किलोमीटर वीज वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या आहेत. तसेच दोन रोहित्रे नादुरुस्त झाली आहेत. तर अमरावती शहरात ७ वीजेचे खांब कोसळले असून १ रोहित्र खाली पडले आहे. ३ रोहित्रात तांत्रिक दोष निर्माण होऊन निकामी झाले झाल्यामुळे महावितरणला १.२५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

याठिकाणचा वीज पुरवठा झाला सुरळीतवादळ थांबताच महावितरणने टप्प्या- टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु केले. जेथे शक्य झाले त्या ठिकाणी उपकेंद्राला बॅक फिडींगने वीज पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेल्या ३३ केव्ही पाडा, ३३ केव्ही घाटलाडकी, ३३ केव्ही खोलापूर,३३ केव्ही आमला,३३ केव्ही ब्राम्हणवाडा,३३ केव्ही तोंडगाव, ३३ केव्ही खल्लार,३३ केव्ही चांदस वाटोडा आणि ३३ केव्ही टाकरखेडा या उपकेंद्राचा आणि त्या उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या तसेच या उपकेंद्रातून वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या ३७ वीज वाहिन्यांचा बंद पडलेला वीज पुरवठा सुरु करण्यास महावितरणला यश आले आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज