शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

तीन सख्ख्या भावांसह सहा जणांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

सय्यद मुशीर आलम नियाज अली (३५, रा. साबनपुरा) याची १ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८.३० ते ९.३० च्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. गांधी चौक ते जवाहर गेट रस्त्यावरील सावजी हॉटेलजवळ ही घटना घडली. या हत्याकांडामुळे शहरातील राजकारण तापले होते. महापालिकेतील आमसभाही या विषयाने गाजल्या होत्या.

ठळक मुद्देमुशीर आलम हत्याकांड । अमरावती न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार वर्षांपूर्वी शहरात गाजलेल्या मुशीर आलम हत्याकांडात तीन सख्ख्या भावांसह सहा जणांना जन्मठेप ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. २ राजेश तिवारी यांनी शनिवारी हा निर्णय दिला.विधी सूत्रांनुसार, आजन्म कारावास ठोठावण्यात आलेल्या आरोपींमध्ये उमेश अशोक आठवले (२७), नीलेश अशोक आठवले (२४), दिनेश अशोक आठवले (३२, तिघेही रा. महाजनपुरा), राजेश गोविंद मांडवे (२५, कुंभारवाडा), शुभम तात्याराव जवंजाळ (१९, रा. कुंड खुर्द, ता. भातकुली) व अंकुश सुभाषराव जिरापुरे (२३, रा. खरकाडीपुरा) यांचा समावेश आहे.सय्यद मुशीर आलम नियाज अली (३५, रा. साबनपुरा) याची १ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८.३० ते ९.३० च्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. गांधी चौक ते जवाहर गेट रस्त्यावरील सावजी हॉटेलजवळ ही घटना घडली. या हत्याकांडामुळे शहरातील राजकारण तापले होते. महापालिकेतील आमसभाही या विषयाने गाजल्या होत्या. शहर कोतवाली पोलिसांनी त्यावेळी सहा आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९ गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. प्रमुख सरकारी वकील परीक्षित गणोरकर, त्यांचे सहकारी दिलीप तिवारी, प्रशांत देशपांडे, शोएब खान, शब्बीर खान, मोहसीन मिर्झा यांनी युक्तिवाद केला. युक्तिवादाअंती न्या. राजेश तिवारी यांनी सर्व सहा आरोपींना आजन्म कारावास व दंड ठोठावला. उमेश आठवले व अन्य पाच आरोपींना कलम ३०२ व कलम ३०७ मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कलम ३२४ अन्वये तीन वर्षे कारावास, पाच हजार रुपये दंड, कलम १४३ नुसार सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंड, कलम १४८ मध्ये तीन वर्षे कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. आर्म्स अ‍ॅक्टमध्ये सहाही आरोपींना निर्दोष ठरविण्यात आले. आरोपींच्यावतीने सी.व्ही. नवलानी, अ‍ॅड. तायडे, एस.आर. लोणे यांनी युक्तिवाद केला. ४ मार्च २०१६ रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली. त्यानंतर सुनावणीदरम्यान १८ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी विलास राजगुरे हा फितुर झाला.आरोपींनी प्रतीक्षालयात कापला होता केकसुनावणीदरम्यान न्यायालयीन प्रतीक्षालयात केक कापून आरोपी उमेश आठवलेचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ५ आॅक्टोबर २०१८ रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची तक्रार पोलीसात करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपी उमेश आठवले, अंकुश जिरापुरेसह अन्य एकाला कारागृहातून न्यायालयात हजर करण्यासाठी आणले. सुनावणी सुरु असताना काही वेळाकरिता आरोपींना न्यायालयातील प्रतीक्षालयात बसविण्यात आले होते. शुक्रवारी उमेश आठवलेचा वाढदिवस असल्यामुळे त्याचे काही मित्र केक घेऊन प्रतीक्षालयात दाखल झाले. हातात हातकडी असलेल्या उमेश आठवले याने केक मित्रांनी उमेश आठवलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा सर्व प्रकार पोलिसांसमक्ष झाला.न्यायालयाच्या प्रतीक्षालयात घडलेला हा प्रकार पाहून फिर्यादी पक्ष अचंबित झाला. या प्रकाराबाबत तन्वीर आलम यांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली होती.असा आहे घटनाक्रमआरोपी उमेश आठवले हा १ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास जुना बसस्टँडनजीकच्या मराठा सावजी हॉटेलमध्ये जेवायला गेला. हॉटेलमालक सुरेश राजगुरे यांना त्याने जेवन वाढण्यास उशीर होत असल्याबाबत शिवीगाळ केली व तो निघून गेला. त्यानंतर लगेचच दोन ते तीन दुचाकीवर उमेशसह सहा जण तेथे आले. त्यांनी राजगुरेंवर सशस्त्र हल्ला चढविला. मुशीर आलम हा त्यावेळी बाजूलाच असलेल्या ट्रॅव्हल्सच्या दुकानात बसलेला होता. हल्ला परतवण्याच्या उद्देशाने मुशीरने हॉटेलकडे धाव घेतली. त्यावेळी उमेश आठवले व अन्य आरोपींनी मुशीर आलम, तनवीर आलम व बाबा उर्फ मशरुर आलम यांच्यावर तलवार, चाकूने वार केले. गंभीर जखमी मुशीरचा रात्री १ च्या सुमारास मृत्यू झाला. खुनाची ही घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेचा प्राथमिक तपास शहर कोतवालीचे तत्कालीन निरीक्षक सुरेश इंगळे यांनी केला, तर तत्कालीन ठाणेदार दिलीप पाटील यांनी आरोपपत्र दाखल केले.

टॅग्स :Murderखून