शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधून गेलेत ते कावळे, उर्वरित खरे मावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:01 IST

तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या युवकांना मार्गदर्शन करीत होत्या. युवकांनो, आपण निर्धार केला पाहिजे, मी लढणार, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार, सामान्यजनांचे प्रश्न सोडविणार, जनतेची सेवा करणार, देशाला दिशा देणार आणि मी जिंकणार.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमात युवकांना दिले जिंकण्याचे तंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काँग्रेसच्या काळात शेतकरी समाधानी होते. आता तर विदर्भाचेच मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसल्याचे चित्र आहे. परंतु, क्षणिक सत्तेत आलेल्या पक्षात सद्यस्थितीत प्रवेशाची धूम सुरू आहे. जे काँग्रेस पक्षातून गेलेत ते कावळे, राहिलेत तेच खरे मावळे आहेत. गड जिंकण्यासाठी त्यांचेच बळ पुरेसे असल्याचा निर्धार काँगे्रसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी येथे व्यक्त केला.तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या युवकांना मार्गदर्शन करीत होत्या. युवकांनो, आपण निर्धार केला पाहिजे, मी लढणार, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार, सामान्यजनांचे प्रश्न सोडविणार, जनतेची सेवा करणार, देशाला दिशा देणार आणि मी जिंकणार. तेव्हाच आपल्यामधील युवा जागा होईल आणि खºया अर्थाने जनतेला न्याय मिळेल, असे आवाहन आमदार यशोमती ठाकूर यांनी तरुणाईला केले.आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने आपल्या सत्ताकाळात जनतेच्या हितार्थ कामे केली. आबालवृद्धांना काँग्रेसबद्दल आस्था होती, आहे आणि राहणार. कारण तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रयत्नांमुळे संगणकाची मोठी क्रांती झालेली आहे.याप्रसंगी चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय ‘मै भी नायक’ या स्पर्धेतून अमरावती जिल्ह्यातील आॅनलाईन व्होटिंगद्वारे निवड झालेल्या दोन युवकांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक दिवस कामकाज समजून घेण्याची संधी मिळाल्याने त्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमाला भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, सरचिटणीस प्रतिभा रघुवंशी, जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, भेया पवार, परीक्षित जगताप आदी प्रवक्ते व युवा काँग्रेसचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.तिवसा मतदारसंघातील भातकुली तालुका, तिवसा तालुक्यासह नांदगावपेठ परिसरातील हजारो युवकांची उपस्थिती होती. ते या कार्यक्रमातून सकारात्मक प्रेरणा, ऊर्जा घेऊन गेले.भाजप सरकारच्या काळात अत्याचार वाढलेआमचा निर्धार पक्का आहे. महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचा झेंडा फडकवूनच दाखवू, यासाठी प्रत्येक बूथवरून काँग्रेसला संधी देण्याची जबाबदारी युवकांची आहे. या जिल्ह्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा, डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्यासारख्या थोर पुरुषांचा वारसा लाभला आहे. परंतु, जेव्हापासून राज्यात व देशात भाजपचे सरकार आले तेव्हापासून अन्याय, अत्याचार, गोरगरिबांवर वाढले आहे. अरबी समुद्रात शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याची वल्गना केली. मात्र, ते अद्याप पूर्णत्वास आले नाही. काँग्रेसने मात्र जनतेच्या हितार्थ निर्णय घेऊन ते पूर्णत्वास नेल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. आपली साथ मिळाल्यास राज्याचा विकास करूच, शिवाय देशालासुद्धा दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही सुरूच ठेवू, असे आ. ठाकूर म्हणाल्या.

टॅग्स :congressकाँग्रेसYashomati Thakurयशोमती ठाकूर