शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

काँग्रेसमधून गेलेत ते कावळे, उर्वरित खरे मावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:01 IST

तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या युवकांना मार्गदर्शन करीत होत्या. युवकांनो, आपण निर्धार केला पाहिजे, मी लढणार, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार, सामान्यजनांचे प्रश्न सोडविणार, जनतेची सेवा करणार, देशाला दिशा देणार आणि मी जिंकणार.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमात युवकांना दिले जिंकण्याचे तंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काँग्रेसच्या काळात शेतकरी समाधानी होते. आता तर विदर्भाचेच मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसल्याचे चित्र आहे. परंतु, क्षणिक सत्तेत आलेल्या पक्षात सद्यस्थितीत प्रवेशाची धूम सुरू आहे. जे काँग्रेस पक्षातून गेलेत ते कावळे, राहिलेत तेच खरे मावळे आहेत. गड जिंकण्यासाठी त्यांचेच बळ पुरेसे असल्याचा निर्धार काँगे्रसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी येथे व्यक्त केला.तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या युवकांना मार्गदर्शन करीत होत्या. युवकांनो, आपण निर्धार केला पाहिजे, मी लढणार, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार, सामान्यजनांचे प्रश्न सोडविणार, जनतेची सेवा करणार, देशाला दिशा देणार आणि मी जिंकणार. तेव्हाच आपल्यामधील युवा जागा होईल आणि खºया अर्थाने जनतेला न्याय मिळेल, असे आवाहन आमदार यशोमती ठाकूर यांनी तरुणाईला केले.आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने आपल्या सत्ताकाळात जनतेच्या हितार्थ कामे केली. आबालवृद्धांना काँग्रेसबद्दल आस्था होती, आहे आणि राहणार. कारण तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रयत्नांमुळे संगणकाची मोठी क्रांती झालेली आहे.याप्रसंगी चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय ‘मै भी नायक’ या स्पर्धेतून अमरावती जिल्ह्यातील आॅनलाईन व्होटिंगद्वारे निवड झालेल्या दोन युवकांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक दिवस कामकाज समजून घेण्याची संधी मिळाल्याने त्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमाला भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, सरचिटणीस प्रतिभा रघुवंशी, जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, भेया पवार, परीक्षित जगताप आदी प्रवक्ते व युवा काँग्रेसचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.तिवसा मतदारसंघातील भातकुली तालुका, तिवसा तालुक्यासह नांदगावपेठ परिसरातील हजारो युवकांची उपस्थिती होती. ते या कार्यक्रमातून सकारात्मक प्रेरणा, ऊर्जा घेऊन गेले.भाजप सरकारच्या काळात अत्याचार वाढलेआमचा निर्धार पक्का आहे. महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचा झेंडा फडकवूनच दाखवू, यासाठी प्रत्येक बूथवरून काँग्रेसला संधी देण्याची जबाबदारी युवकांची आहे. या जिल्ह्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा, डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्यासारख्या थोर पुरुषांचा वारसा लाभला आहे. परंतु, जेव्हापासून राज्यात व देशात भाजपचे सरकार आले तेव्हापासून अन्याय, अत्याचार, गोरगरिबांवर वाढले आहे. अरबी समुद्रात शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याची वल्गना केली. मात्र, ते अद्याप पूर्णत्वास आले नाही. काँग्रेसने मात्र जनतेच्या हितार्थ निर्णय घेऊन ते पूर्णत्वास नेल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. आपली साथ मिळाल्यास राज्याचा विकास करूच, शिवाय देशालासुद्धा दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही सुरूच ठेवू, असे आ. ठाकूर म्हणाल्या.

टॅग्स :congressकाँग्रेसYashomati Thakurयशोमती ठाकूर