शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

दोन वर्षांत शाळा जिल्हा परिषदेच्या १५ शाळा पडल्या बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 13:23 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये काही गावांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्या बंद करण्याची वेळ आली. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १५ शाळा बंद पडल्या असून, त्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत.

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये काही गावांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्या बंद करण्याची वेळ आली. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १५ शाळा बंद पडल्या असून, त्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकत्याच झालेल्या बैठकीचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे.ग्रामीण भागात कॉन्व्हेंट संस्कृतीचे लोण पोहोचले, तसेच वाहतुकीची साधने वाढल्याने शहर, ग्रामीण भागाचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्रासपणे शहरी भागातील शाळांमध्ये दाखल होत आहेत. त्यातच जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा दर्जाही घसरला. त्याचाही परिणाम, शाळांतील विद्यार्थी प्रवेशावर होत आहे. काही गावांची लोकसंख्याही कमीच असल्याने २० पर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या सर्व बाबींच्या परिणामी, २०१७ ते आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या १५ शाळा बंद करून इतर शाळांमध्ये जोडण्यात आल्या. त्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लगतच्या शाळेत धाव घ्यावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या संचमान्यतेनुसार शिक्षकांची पदेही घटली आहेत. याबाबतची माहिती पुन्हा शासनाने मागविल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पाठविली आहे.- गरिबांचे शिक्षण, शिक्षकांची पदे वाचवा!मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कास्ट्राइब कर्मचारी संघटनेसोबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेने बंद केलेल्या शाळांचा मुद्दा उपस्थित केला. त्यामध्ये जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने शाळांना कुलूप लावण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थी घडत असतात म्हणून त्या सुरू ठेवाव्या, अशी मागणी केली. बैठकीला कास्ट्राइब संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ उपस्थित होते. त्या इतिवृत्तानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला पत्र देत कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.

- बंद पडलेल्या प्राथमिक शाळाकमी पटसंख्येमुळे बंद पडलेल्या शाळांची संख्या जिल्ह्यात १५ आहे. त्यापैकी काही शाळांतील विद्यार्थी संख्या शून्य ते १० पर्यंत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सोनाळा-०८, साहित-०८, मालपुरा-७, लखमापूर-१०, मोझरी-४, उर्दू शाळा जामठी बु.-३, ठोकबर्डी-७, अडोशी-१०, वणी-४, कवठा खुर्द-६, सर्व विद्यार्थी संख्या शून्य असलेल्या शाळांमध्ये राजापूर, एडली, व्याळा उर्दू, खांबोरा गावांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदSchoolशाळा