शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्हा परिषदेने सुरू केले ५० खाटांचे काेविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:19 IST

अकाेला : अकोल्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि बेड व रेमडेसिविरसाठी होणारी रुग्णांची परवड लक्षात घेता, अकाेला जिल्हा ...

अकाेला : अकोल्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि बेड व रेमडेसिविरसाठी होणारी रुग्णांची परवड लक्षात घेता, अकाेला जिल्हा परिषदेने काेविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून गुरुवारी त्याचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या वतीने संचालित असलेले राज्यातील हे पहिलेच काेविड सेंटर असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी काेविड सेंटरसाठी पुढाकार घेऊन अवघ्या तीन दिवसांत हे काेविड सेंटर सुरू केले आहे. त्यांच्याच हस्ते या काेविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, पोलीस उपविभागीय अधिकारी कदम, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे,

जिल्हा परिषदेचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्षा सवित्रीताई राठोड, सभापती आकाश शिरसाट, सभापती पंजाबराव वडाळ, जिल्हा परिषद सदस्य अविनाश खंडारे, राम गव्हाणकर, समिती सदस्य दिनकरराव खांडारे, डॉ. उन्हाळे, पांडे गुरुजी, मनोहर पंजवणी, रुग्ण कल्याण समिती सदस्य पराग गवई तसेच जिल्हा प्रशासनातील व जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.