शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

जिल्हा परिषदांमध्ये आदिवासी विकास समिती हवी  - अंजली आंबेडकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 17:34 IST

समाजकल्याणप्रमाणेच आदिवासी विकास समिती जिल्हा परिषदांमध्ये असायला हवी, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले.

अकोला : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सामाजिक विकास साधण्यासाठी लोक निर्णयानुसार निधी खर्च करता येतो. त्याचवेळी आदिवासी समाजातील विकास योजना योजनांचा निधी खर्च करण्यातही लोकसहभाग वाढावा, यासाठी समाजकल्याणप्रमाणेच आदिवासी विकास समिती जिल्हा परिषदांमध्ये असायला हवी, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले. त्यासाठी जिल्हा परिषदेने तसा ठराव शासनाकडे पाठवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.जिल्हा परिषदेच्या पदग्रहण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. मंचावर प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना त्यांनी बलवंतराय मेहता कमिटीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरणाची शिफारस केली. त्यानुसार ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी निधी खर्च प्रक्रीयेत लोकसहभाग वाढवण्यात आला. त्यासाठी लोकांमधून निवड केलेल्या प्रतिनिधींमार्फत विकासाचे नियोजन, खर्चावर नियंत्रण तसेच गरजेनुसार विकास कामे करता येतात. हे असले तरी राज्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. त्या समाजाचा विकास करण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दिली जाते. त्यांच्यासोबत लोकसहभागाची जोड देणे महत्त्वाचे आहे. आदिवासींचा विकास साधण्यासाठी लोकांच्या माध्यमातून आणि निर्णय प्रक्रीयेतून तो व्हावा, अशी व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.जिल्हा परिषदांमध्ये समाजकल्याण समिती आहे. त्या सोबतीला आदिवासी विकास समितीही अस्तित्त्वात आल्यास त्या समाज घटकाचा विकास आणखी प्रभावीपणे करता येईल, असा आशावाद व्यक्त केला. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास समिती गठित करण्याचा ठराव घ्यावा, तो शासनाकडे सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद