शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

जिल्हा परिषदेचा गृहपाठ कच्चा; पीआरसी मुद्यावर कारवाई, साक्ष पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 13:35 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या कारभाराचा धांडोळा घेतल्यानंतर त्यात दोषी आढळलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई, अपहारित रकमांची वसुली, दंडात्मक कारवाईसाठी दिलेल्या मुद्यांनुसार कारवाई करण्यात जिल्हा प्रशासनाने कुचराई केल्याचे पुढे येत आहे.

ठळक मुद्देविधिमंडळाच्या पंचायत राज समितीने गेल्यावर्षी १ ते ३ जूनदरम्यान जिल्हा परिषदेची तपासणी केली होती. जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांचा दौरा करत विविध प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते.अनुपालनाची माहिती अर्धवट असल्याने ती समितीपुढे कशी ठेवावी, या मुद्यावरूनच आता अधिकारी धास्तावले आहेत.

अकोला : जिल्हा परिषदेच्या कारभाराचा धांडोळा घेतल्यानंतर त्यात दोषी आढळलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई, अपहारित रकमांची वसुली, दंडात्मक कारवाईसाठी दिलेल्या मुद्यांनुसार कारवाई करण्यात जिल्हा प्रशासनाने कुचराई केल्याचे पुढे येत आहे. कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करताना तोंडघशी पडण्याऐवजी गृहपाठ पक्का झाल्यानंतरच पंचायत राज समितीने साक्ष घ्यावी, या मतावर अधिकारी आले. त्यामुळे आधी ठरलेल्या कार्यक्रमाऐवजी आता २९ व ३० मे रोजी अधिकाºयांची साक्ष होणार असल्याची माहिती आहे.विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने गेल्यावर्षी १ ते ३ जूनदरम्यान जिल्हा परिषदेची तपासणी केली होती. त्यावेळी सन २००८-०९ आणि २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखा परीक्षण अहवालातील गंभीर मुद्यांवर जिल्हा परिषदेने केलेल्या कारवाईची माहिती समितीने घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांचा दौरा करत विविध प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. त्यावेळी लेखा परीक्षण अहवालानुसार अपहारित रक्कम, गैरव्यवहारांची रक्कम तसेच काही प्रकरणात दंडाची वसुली करण्याचे आदेश समितीने दिले. ती रक्कम प्रचंड असताना जिल्हा परिषदेने ३० कोटी रुपये वसूल केल्याची माहिती आहे. तसेच ३० ते ३२ प्रकरणात अधिकारी-कर्मचाºयांवर प्रशासकीय कारवाईचेही निर्देश दिले होते. त्यावरही काहींना नोटीस देत त्यांची स्पष्टीकरणे मागवण्यात आली. त्यावर कोणतीच कारवाई न करता ती तशीच अनुपालन अहवालात जोडण्यात आली. त्यातून समितीने दिलेल्या निर्देशांचे पूर्णपणे अनुपालन झालेच नाही. अनुपालनाची माहिती अर्धवट असल्याने ती समितीपुढे कशी ठेवावी, या मुद्यावरूनच आता अधिकारी धास्तावले आहेत.- नियमित अधिकारी नसल्याची सबबपंचायत राज समितीपुढे ग्रामविकास विभागाचे सचिव, जिल्हा परिषद अधिकारी, विभागप्रमुखांची साक्ष २ व ३ मे रोजी घेण्याचे ठरले. मात्र, जिल्हा परिषदेला नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी नाहीत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांची बदली झाली आहे. या परिस्थितीत वसुली, प्रशासकीय कारवाई करणे शक्य नाही. त्यासाठी वेळ लागेल, अशी सबब सांगत जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकाºयांची साक्ष पुढे ढकलण्याची विनंती केल्याची माहिती आहे. त्यानुसार समितीने २९ व ३० मे रोजी साक्ष घेण्याची तयारी केल्याची माहिती आहे.

अनेक प्रकरणातील कारवाई थंड बस्त्यातजिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत राज समितीने दिलेल्या निर्देशानुसार कारवाईच केली नसल्याची माहिती आहे. अधिकारी-कर्मचाºयांना वाचवण्याच्या नादात आता समितीपुढे तोंडघशी पडण्याची वेळ येणार आहे. त्यावर आता सारवासारव करण्यासाठी साक्ष पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली.- अधिकाºयांवर अविश्वासपंचायत राज समितीच्या दौºयाच्या वेळी जिल्हा परिषदेच्या काही अधिकाºयांनी स्वत:चे उखळ पांढरे केल्याची चर्चा आहे. त्यावेळी कासावीस झालेल्या अधिकारी-कर्मचाºयांनी आता संबंधित अधिकाºयाला न जुमानण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे समितीपुढे साक्ष देताना कारवाई न केल्याची जबाबदारी कोण घेणार, यासाठीच टाळाटाळ सुरू असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद