शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

जिल्हा परिषद निवडणूक : केवळ भाजपने दिले सर्वच जागांवर उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:18 IST

जिल्हा परिषदेच्या ५३ गट आणि १०५ गणांत केवळ भाजपनेच शंभर टक्के उमेदवार रिंगणात आणले आहेत.

- सदानंद सिरसाट

अकोला: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रथमच भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढत असताना या परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या ५३ गट आणि १०५ गणांत केवळ भाजपनेच शंभर टक्के उमेदवार रिंगणात आणले आहेत. त्याचवेळी जिल्ह्यात पाळेमुळे रोवलेल्या भारिप-बमसंला अनेक गणांत ऐनवेळी उमेदवारी देणे कठीण गेले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची अनेक गट, गणांतही उमेदवार देताना दमछाक झाली आहे. जिल्ह्यात चौरंगी लढतीचे चित्र असताना भारिप-बमसंच्या उमेदवारांना किमान १५ गट, गणांतील स्वपक्षीय बंडखोर व अपक्षांच्या साखळीने आव्हान दिल्याने निकालाचे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंडखोरांची मनधरणी करण्याची तयारी पक्षासह उमेदवारांनी सुरू केली आहे. त्यामध्ये यश मिळाल्यास त्याचा परिणामही निकालावर होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही सत्तेचे समीकरण बदलण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून महाविकास आघाडी निर्मितीची चाचपणी झाली. सत्तेच्या मुद्यावर एकत्र आले तरी ध्येय-धोरणांमध्ये फरक असल्याने निवडणूक एकत्र लढण्याच्या विषयाला बाजूला ठेवण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व शिवसेना स्वतंत्रपणे लढण्याचे ठरले. त्यासाठी काँग्रेसने ३७ जागांवर उमेदवारी यादी प्रसिद्धीस दिली. त्यापैकी ५ गट राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन गट शिवसेनेसाठी असल्याचे नमूद केले. त्यामुळे काँग्रेसने केवळ ३० गटांमध्ये उमेदवार दिले आहेत. त्यापैकी तीन भारिप-बमसंचे बंडखोर आहेत, तर ३० गटांच्या ६० गणांमध्ये उमेदवारी न देता ५५ गणांतच उमेदवार देण्याची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या १८ गटांत उमेदवारी दिली तर त्यातुलनेत पंचायत समितीच्या ४० गटांमध्ये उमेदवारी दिली. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची संख्या पाहता जिल्हा परिषदेचे ४८ गट आणि ९५ गणांत लढतीमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय व राज्यस्तरीय असलेल्या या दोन्ही पक्षांना जिल्ह्यातील ५ गट आणि ११ गणांत उमेदवारी घेता का, असे विचारण्याची वेळ आली. शिवसेनेने प्रथमच स्वबळावर असताना ४९ गट व ९९ गणांत उमेदवार दिले आहेत. भाजपने सर्वच जिल्हा परिषद गटांसह १०५ गणांत उमेदवार दिले. एका घुसर गणात भाजप समर्थित उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे भाजपनेही निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात भारिप-बमसंचा प्रभाव असला तरी ऐनवेळी उमेदवारी संदर्भात वाद झाल्याने पंचायत समितीच्या तीन ते पाच गणांत पक्षाचे उमेदवार रिंगणात नसल्याची माहिती आहे. आसेगाव, भांबेरी गटात हा प्रकार घडला आहे. आसेगाव गटात प्रबळ इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या वाघोडे, प्रदीप वानखडे या दोघांचीही दावेदारी रद्द झाल्याने ऐनवेळी गोंधळ उडाला. त्यांच्यासोबत गणांत निवडणूक लढण्यासाठी उत्सुकांनी रिंगणातून काढता पाय घेतला. हा प्र्रकार कमी-अधिक प्रमाणात बºयाच ठिकाणी घडला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBJPभाजपा