शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत मंगळवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 11:15 IST

उमेदवार थेट अध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अकोला : राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या आरक्षित पदांचे जिल्हा परिषदनिहाय वाटप करण्यासाठी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मंत्रालयातील परिषद भवनात सोडत काढली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांना बोलाविण्यात आले आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षित जागांची संख्या ठरलेली आहे. आरक्षित पदांचे वाटप जिल्हा परिषदांना केले जाते. त्यानुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या प्रवर्गासाठी राखीव तसेच सर्वसाधारणसह राखीव प्रवर्गातील पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानुसार संबंधित जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव ठेवले जाते. राज्यातील ३५ जिल्हा परिषदांसाठी ही सोडत काढली जाते. ग्रामविकास विभागाकडून ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आरक्षण सोडतीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांना उपस्थित राहण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.

 निवडणुकीपूर्वी ठरणार आरक्षणसर्वसाधारणपणे जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाते. ही प्रक्रिया नियमित निवडणुकीच्या काळात घडते. राज्यातील पाच जिल्हा परिषदा बरखास्त झाल्यानंतर त्यांची निवडणूकच झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ती शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आधी राखीव होणार, त्यानंतर निवडणूक असल्याने काही उमेदवार थेट अध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद