शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे वाभाडे; आंबेडकर भाजपाच्या ‘रडार’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:59 IST

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित पहिल्याच सभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनाच लक्ष्य करण्यात आले.

- राजेश शेगोकारअकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित पहिल्याच सभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनाच लक्ष्य करण्यात आले. या सभेत मुख्यमंत्र्यांसह उमेदवार व खासदार धोत्रे यांनी अ‍ॅड. आंबेडकरांच्या नेतृत्वातील भारिप-बमसंची गेल्या २५ वर्षांपासून सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढत लोकसभेची लढाई वंचितसोबतच असल्याचे संकेत दिले आहेत. शिवाय पुढील ‘लक्ष्य’ जिल्हा परिषदेचे असेल, असा इशारा देत अ‍ॅड. आंबेडकरांना ‘रडार’वर घेत त्यांच्या शक्तिस्थानावरच प्रहार करण्यात आला आहे.उमेदवार संजय धोत्रे यांनी प्रास्ताविकातच जिल्हा परिषदेतील या कारभाराचे वाभाडे काढले. गेल्या पाच वर्षांत अकोल्यास इतर शहरे व ग्रामीण परिसरातील झालेल्या विकासाची तुलना करताना त्यांनी शहरातील विकासाचे श्रेय त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाच्या ताब्यात असल्याचे अधोरेखित केले. ग्रामीण भागातील विकासासाठी जिल्हा परिषद ही यंत्रणा आहे; मात्र या यंत्रणेत ‘रिमोट कंट्रोल’ने सत्ता चालविली जात असल्याने गावे चमकदार झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विकासाचा निधी दिला जातो; मात्र हा विकास ज्या जिल्हा परिषदेच्या पाइपलाइनमधून जातो, त्या पाइपलाइनला भ्रष्टाचाराचे लिकेजेस असल्याने विकास होत नाही. त्यामुळे आगामी काळात ही पाइपलाइनच बदलवून टाकू, अशा स्पष्ट शब्दात धोत्रे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अ‍ॅड. आंबेडकरांनाच आव्हान दिले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नावावर मते मागणाऱ्यांनीच ग्रामीण जनतेला विकासापासून दूर ठेवल्याचा आरोपही धोत्रे यांनी केला. त्यांच्या प्रास्ताविकाचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांनी थेट अ‍ॅड. आंबेडकरांवरच निशाणा साधला. आंबेडकरांकडे कोणतीही नीती नाही, धोरण नाही. त्यांनी जिल्हा परिषदेचे वाटोळे केले, अशा स्पष्ट शब्दात वाभाडे काढल्याने लोकसभेच्या प्रचारातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे.गेल्या पंचवीस वर्षांपासून अ‍ॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बमसंकडे अकोला जिल्हा परिषदेची सत्ता आहे. अकोल्याचा विचार केला तर लोकसभा व विधानसभा मतदारसंघांना ‘काँग्रेसमुक्त’ करण्याचा करिष्मा करणाºया भाजपाने महापालिकेतही एकहाती सत्ता आणली. अगदी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या सोबतीचीही भाजपाला गरज भासली नाही; मात्र जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविण्याचे भाजपाचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. डिसेंबर २०१८ मध्ये मुदत संपलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होण्याच्या मार्गावर असतानाच निवडणुकीतील आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात अडकल्यामुळे सध्या जिल्हा परिषदेला मुदतवाढ मिळाली व निवडणुका टळल्या. त्यामुळे लोकसभेपूर्वी होणारी रंगीत तालीम होऊ शकली नाही. या पृष्ठभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी ‘वंचित बहुजन आघाडी’ स्थापन करून भाजपा व काँग्रेससमोर सक्षम पर्याय उभा केला आहे. या पर्यायाची दखल घेत भाजपाने गुरुवारच्या प्रचारसभेत जिल्हा परिषद ‘टार्गेट’ करून आंबेडकरांना घेरण्याची रणनीती स्पष्ट केली आहे.काँग्रेसच्या उमेदवारावर टीका टाळली!मुख्यमंत्र्यांसह उमेदवार संजय धोत्रे यांनी मोदीमय विकासाचे चित्र उभे करताना ‘वंचित बहुजन आघाडीवर नाव घेऊन टीका केली, तर काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा अर्धा वेळ गेला; मात्र स्थानिक उमेदवारावर दोघांच्याही भाषणात एकाही शब्दाने टीका करण्यात आली नाही.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस