शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात उपाययोजना शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:37 IST

पाणीटंचाई निवारणाच्या पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासंदर्भात आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचा पहिल्या टप्प्यातील कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, त्यामध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना शून्य दर्शविण्यात आल्या आहेत. पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील धरणे, नद्या, विहिरी व तलावांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने पाणीटंचाईची परिस्थिती नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाच्या पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला. पावसाळा संपल्यानंतर गत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला असून, नदी-नाले वाहत आहेत, तसेच विहिरी आणि तलावांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही भागात पाणीटंचाईची परिस्थिती नसल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा गत ३० नोव्हेंबर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाच्या या कृती आराखड्यात पाणीटंचाई निवारणाची एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.

 आराखडा तयार करण्याचे निर्देश!दुसºया टप्प्यात जानेवारी ते मार्च आणि तिसºया टप्प्यात एप्रिल ते जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेला देण्यात आले. त्यानुसार दुसºया व तिसºया टप्प्यातील जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हा परिषदेमार्फत तयार करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई