शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'झीरो ग्रॅव्हिटी' प्रकल्प यशस्वी : विजेशिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:11 IST

संतोषकुमार गवई शिर्ला : पातूर तालुक्यातील कोठारी गावातील ५१ शेतकºयांनी मोर्णा धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाला ...

संतोषकुमार गवई

शिर्ला : पातूर तालुक्यातील कोठारी गावातील ५१ शेतकºयांनी मोर्णा धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाला असून, ११ जून रोजी शेतकºयांच्या बांधावर पाणी पोहोचले. परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी २४ तास बारमाही पाणी मिळणार आहे.कोठारी शेतशिवारात अकोला महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता तथा झीरो ग्रॅव्हिटी प्रकल्पाचे प्रमुख हरिदास ताठे तथा महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त हिंमतराव टप्पे या जोडीने एक वर्षापूर्वी ५१ शेतकºयांना एकत्रित करून श्री सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्थेची स्थापना केली. कोठारी गावाच्या वरील बाजूस मोर्णा धरण आहे असे असूनही या गावाला सिंचनासाठी पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे शेतकºयांना बारमाही शेती करणे शक्य नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षी हरिदास ताठे यांच्या मार्गदर्शनात आणि हिंमतराव टप्पे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी शेतीला शेतीला कायमस्वरूपी पाणी देता यावे, या उद्देशाने या धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वाने पाणी आणण्याचा निर्णय १ मे २०१९ रोजी घेतला. त्यानुसार पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सचिन वाकोडे यांच्या माध्यमातून शासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली. या प्रकरणीसाठी कर्ज मिळत नसल्याने अनेक शेतकºयांनी आपली शेती गहान ठेवली. तसेच मोर्णा धरणातून पाइपद्वारे आठ किलोमीटर अंतरावरून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चून झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वाने पाणी आणण्याचा प्रयोग आज यशस्वी झाला. त्याची यशस्वी चाचणी तज्ज्ञ हरिदास ताठे तथा हिंमतराव टप्पे, अर्जुन टप्पे, हरीश टप्पे यांनी गुरुवारी सकाळी घेतली.

पाण्याची होणार बचतया प्रकल्पामुळे कॅनलद्वारे खर्चिक, महागड्या, वेळखाऊ आणि पाण्याचा अपव्यय होणाºया पद्धतीला आळा बसणार आहे. या पद्धतीच्या प्रकल्पाची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रकल्पातील पाणी कॅनॉलद्वारे दिल्यास पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे सदर प्रकल्प अत्यंत लाभदायी आहे. या प्रकल्पाची माहिती अकोट तालुक्यातील वान प्रकल्पातील येथील शेतकºयांना मिळाली आहे. तेथेही झीरो ग्रॅव्हिटी कोठारी पॅटर्न राबविला जाणार आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र