शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

'झीरो ग्रॅव्हिटी' प्रकल्प यशस्वी : विजेशिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:11 IST

संतोषकुमार गवई शिर्ला : पातूर तालुक्यातील कोठारी गावातील ५१ शेतकºयांनी मोर्णा धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाला ...

संतोषकुमार गवई

शिर्ला : पातूर तालुक्यातील कोठारी गावातील ५१ शेतकºयांनी मोर्णा धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाला असून, ११ जून रोजी शेतकºयांच्या बांधावर पाणी पोहोचले. परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी २४ तास बारमाही पाणी मिळणार आहे.कोठारी शेतशिवारात अकोला महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता तथा झीरो ग्रॅव्हिटी प्रकल्पाचे प्रमुख हरिदास ताठे तथा महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त हिंमतराव टप्पे या जोडीने एक वर्षापूर्वी ५१ शेतकºयांना एकत्रित करून श्री सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्थेची स्थापना केली. कोठारी गावाच्या वरील बाजूस मोर्णा धरण आहे असे असूनही या गावाला सिंचनासाठी पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे शेतकºयांना बारमाही शेती करणे शक्य नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षी हरिदास ताठे यांच्या मार्गदर्शनात आणि हिंमतराव टप्पे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी शेतीला शेतीला कायमस्वरूपी पाणी देता यावे, या उद्देशाने या धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वाने पाणी आणण्याचा निर्णय १ मे २०१९ रोजी घेतला. त्यानुसार पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सचिन वाकोडे यांच्या माध्यमातून शासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली. या प्रकरणीसाठी कर्ज मिळत नसल्याने अनेक शेतकºयांनी आपली शेती गहान ठेवली. तसेच मोर्णा धरणातून पाइपद्वारे आठ किलोमीटर अंतरावरून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चून झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वाने पाणी आणण्याचा प्रयोग आज यशस्वी झाला. त्याची यशस्वी चाचणी तज्ज्ञ हरिदास ताठे तथा हिंमतराव टप्पे, अर्जुन टप्पे, हरीश टप्पे यांनी गुरुवारी सकाळी घेतली.

पाण्याची होणार बचतया प्रकल्पामुळे कॅनलद्वारे खर्चिक, महागड्या, वेळखाऊ आणि पाण्याचा अपव्यय होणाºया पद्धतीला आळा बसणार आहे. या पद्धतीच्या प्रकल्पाची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रकल्पातील पाणी कॅनॉलद्वारे दिल्यास पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे सदर प्रकल्प अत्यंत लाभदायी आहे. या प्रकल्पाची माहिती अकोट तालुक्यातील वान प्रकल्पातील येथील शेतकºयांना मिळाली आहे. तेथेही झीरो ग्रॅव्हिटी कोठारी पॅटर्न राबविला जाणार आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र