शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

'झीरो ग्रॅव्हिटी' प्रकल्प यशस्वी : विजेशिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:11 IST

संतोषकुमार गवई शिर्ला : पातूर तालुक्यातील कोठारी गावातील ५१ शेतकºयांनी मोर्णा धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाला ...

संतोषकुमार गवई

शिर्ला : पातूर तालुक्यातील कोठारी गावातील ५१ शेतकºयांनी मोर्णा धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाला असून, ११ जून रोजी शेतकºयांच्या बांधावर पाणी पोहोचले. परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी २४ तास बारमाही पाणी मिळणार आहे.कोठारी शेतशिवारात अकोला महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता तथा झीरो ग्रॅव्हिटी प्रकल्पाचे प्रमुख हरिदास ताठे तथा महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त हिंमतराव टप्पे या जोडीने एक वर्षापूर्वी ५१ शेतकºयांना एकत्रित करून श्री सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्थेची स्थापना केली. कोठारी गावाच्या वरील बाजूस मोर्णा धरण आहे असे असूनही या गावाला सिंचनासाठी पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे शेतकºयांना बारमाही शेती करणे शक्य नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षी हरिदास ताठे यांच्या मार्गदर्शनात आणि हिंमतराव टप्पे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी शेतीला शेतीला कायमस्वरूपी पाणी देता यावे, या उद्देशाने या धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वाने पाणी आणण्याचा निर्णय १ मे २०१९ रोजी घेतला. त्यानुसार पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सचिन वाकोडे यांच्या माध्यमातून शासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली. या प्रकरणीसाठी कर्ज मिळत नसल्याने अनेक शेतकºयांनी आपली शेती गहान ठेवली. तसेच मोर्णा धरणातून पाइपद्वारे आठ किलोमीटर अंतरावरून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चून झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वाने पाणी आणण्याचा प्रयोग आज यशस्वी झाला. त्याची यशस्वी चाचणी तज्ज्ञ हरिदास ताठे तथा हिंमतराव टप्पे, अर्जुन टप्पे, हरीश टप्पे यांनी गुरुवारी सकाळी घेतली.

पाण्याची होणार बचतया प्रकल्पामुळे कॅनलद्वारे खर्चिक, महागड्या, वेळखाऊ आणि पाण्याचा अपव्यय होणाºया पद्धतीला आळा बसणार आहे. या पद्धतीच्या प्रकल्पाची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रकल्पातील पाणी कॅनॉलद्वारे दिल्यास पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे सदर प्रकल्प अत्यंत लाभदायी आहे. या प्रकल्पाची माहिती अकोट तालुक्यातील वान प्रकल्पातील येथील शेतकºयांना मिळाली आहे. तेथेही झीरो ग्रॅव्हिटी कोठारी पॅटर्न राबविला जाणार आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र