शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

तुरीची खरेदी रखडली; व्यापाऱ्यांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 02:11 IST

अकोला : नाफेडची तूर खरेदी ३१ मेपासून बंद झाली आहे; मात्र अजूनही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा पडून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नाफेडची तूर खरेदी ३१ मेपासून बंद झाली आहे; मात्र अजूनही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा पडून आहे. नाफेडने आता खरेदी नाकारल्याने शेतकऱ्यांकडे रखडलेल्या तुरीवर आता व्यापाऱ्यांचा डोळा लागला आहे. शेतकऱ्यांकडील तूर तीन हजार ते सत्ताविसशे रुपयांनी मागण्यास सुरुवात झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीसाठी ताटकळत बसण्यापेक्षा अनेक शेतकऱ्यांनी साडेतीन हजार रुपयांच्या दराने व्यापाऱ्यांना विकली. आता मात्र नाफेडने खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तूर विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनी पडल्या भावात तूर मागण्यास सुरुवात केली आहे.तूर खरेदीबाबतचे धोरण शासनाचे स्पष्ट नसल्याने यंदा तुरीचे भरपूर पीक असूनही भाव नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून नाफेडची खरेदी होत असतानाच व्यापाऱ्यांनी साडेतीन हजार रुपये क्विंटलच्या भावाने तुरीची खरेदी सुरू केली. आता तर शेतकरी स्वत:हून व्यापाऱ्यांकडे ओढल्या जाणार असल्याने हे भाव तीन हजार ते सत्ताविसशे रुपयांपर्यत पोहोचले आहेत. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास १३० डाळ मिल आहेत. यापैकी बहुतांश डाळ मिल तुरीच्या आहेत, त्यामुळे अकोल्यातच मोठ्या प्रमाणात तुरीची आवश्यकता आहे. काही व्यापाऱ्यांकडे मागील तूर शिल्लक आहे; पण आता कमी भावात तूर मिळत असल्याने तुरीची साठेबाजी होण्याची शक्यता आहे. शासनाच्या धोरणाकडे व्यापाऱ्यांचे विशेष लक्ष आहे. शासनाने तुरीच्या निर्यातीवर बंदी घालून, डाळींची मोठ्या प्रमाणात आयात केली. दरम्यान, मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन आले. शासनाचे पुढचे धोरण काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि कर्नाटक या पट्ट्यातही तुरीचे उत्पादन वाढल्याने हा पेच निर्माण झाला आहे.