शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

तुरीची खरेदी रखडली; व्यापाऱ्यांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 02:11 IST

अकोला : नाफेडची तूर खरेदी ३१ मेपासून बंद झाली आहे; मात्र अजूनही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा पडून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नाफेडची तूर खरेदी ३१ मेपासून बंद झाली आहे; मात्र अजूनही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा पडून आहे. नाफेडने आता खरेदी नाकारल्याने शेतकऱ्यांकडे रखडलेल्या तुरीवर आता व्यापाऱ्यांचा डोळा लागला आहे. शेतकऱ्यांकडील तूर तीन हजार ते सत्ताविसशे रुपयांनी मागण्यास सुरुवात झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीसाठी ताटकळत बसण्यापेक्षा अनेक शेतकऱ्यांनी साडेतीन हजार रुपयांच्या दराने व्यापाऱ्यांना विकली. आता मात्र नाफेडने खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तूर विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनी पडल्या भावात तूर मागण्यास सुरुवात केली आहे.तूर खरेदीबाबतचे धोरण शासनाचे स्पष्ट नसल्याने यंदा तुरीचे भरपूर पीक असूनही भाव नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून नाफेडची खरेदी होत असतानाच व्यापाऱ्यांनी साडेतीन हजार रुपये क्विंटलच्या भावाने तुरीची खरेदी सुरू केली. आता तर शेतकरी स्वत:हून व्यापाऱ्यांकडे ओढल्या जाणार असल्याने हे भाव तीन हजार ते सत्ताविसशे रुपयांपर्यत पोहोचले आहेत. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास १३० डाळ मिल आहेत. यापैकी बहुतांश डाळ मिल तुरीच्या आहेत, त्यामुळे अकोल्यातच मोठ्या प्रमाणात तुरीची आवश्यकता आहे. काही व्यापाऱ्यांकडे मागील तूर शिल्लक आहे; पण आता कमी भावात तूर मिळत असल्याने तुरीची साठेबाजी होण्याची शक्यता आहे. शासनाच्या धोरणाकडे व्यापाऱ्यांचे विशेष लक्ष आहे. शासनाने तुरीच्या निर्यातीवर बंदी घालून, डाळींची मोठ्या प्रमाणात आयात केली. दरम्यान, मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन आले. शासनाचे पुढचे धोरण काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि कर्नाटक या पट्ट्यातही तुरीचे उत्पादन वाढल्याने हा पेच निर्माण झाला आहे.