शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

वरूर जऊळका येथील युवकांनी मागितली धोंडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST

जऊळका : परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, काही शेतकरी पेरणीसाठी शेतीची मशागत करून बसले आहेत. परंतु १५ दिवसांपासून पाऊस ...

जऊळका : परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, काही शेतकरी पेरणीसाठी शेतीची मशागत करून बसले आहेत. परंतु १५ दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. पाऊस येत नसल्यामुळे वरूर जऊळका येथील युवकांनी धोंडी धोंडी पाणी दे...असे म्हणत, गावात घरोघरी धोंडी मागितली आणि भंडाऱ्याचे आयोजन केले होते.

गेल्या पंधरा दिवसांपासून या भागातील शेतकरी सतत पावसाची वाट पाहत आहेत. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतातील मशागत झाली आहे. पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. घरात बी-बियाणे, रासायनिक खते भरून ठेवली आहेत. परंतु पाऊसच येत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. यंदाचेही वर्ष दुष्काळात जाते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहेत. मृग नक्षत्रापासून पावसाचे आगमन झाले नसल्यामुळे शेतकरी सातत्याने पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आलेला नाही. परिणामी पेरणी उशिरा होणार की काय असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत. मागीलवर्षी सुद्धा पावसाने वेळेवर हुकावणी दिल्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन पिकांचे उत्पन्न घसरले होते. येणाऱ्या दहा दिवसांत पाऊस न आल्यास उडीद, सोयाबीन पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पाऊस लवकर येण्यासाठी खारपाणपट्ट्यातील युवकांनी गावात घरोघरी फिरून धोंडी धोंडी पाणी दे....अशी प्रार्थना करीत, गावात मिरवणूक काढली आणी धोंडी मागितली.

फोटो:

मृग नक्षत्रापासून परिसरात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन पिके शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेली. येणाऱ्या पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात कमालीची घट होणार आहे.

-दत्ता पाटील ओंळबे, शेतकरी खापरवाडी बु.

फोटो: