शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

होय..आम्ही जिवंत आहोत....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:23 IST

पातूर : वय झालं, रस्त्याने आधार घेत चालावे लागते. हात थरथरतात. अशा वृद्धांना श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचा ...

पातूर : वय झालं, रस्त्याने आधार घेत चालावे लागते. हात थरथरतात. अशा वृद्धांना श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘होय..आम्ही जिवंत आहोत...’याचा पुरावा देण्यासाठी पातूर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

पातूर तालुक्यातील ८६ गावांमध्ये श्रावण बाळ योजने अंतर्गत ५००४ आणि संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनेचे २५१८ लाभार्थी शासनाच्या मानधनावर जीवन चरितार्थ चालवितात. त्यांचे अनुदान नियमित चालू राहावे. यासाठी त्यांना जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागतो. अनेक वृद्ध स्त्री-पुरुषांना पातूर तहसील कार्यालयातील संबंधित विभागात पुरावा देण्यासाठी स्वतः उपस्थित राहावे लागत आहे त्याबरोबरच आधार कार्ड आणि पासबुकची झेरॉक्स द्यावी लागते. उपरोक्त योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी पातूर तालुक्याच्या ८४ गावांमध्ये आडवळणाच्या दुर्गम भागात राहतात. त्यांचे वय झाले, चालताना दम भरून येतो. हातपाय लटपटतात. अशांना तहसील कार्यालयाच्या संबंधित विभागांमध्ये उंबरठे झिजवावे लागते. जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी निराधार वयोवृद्धांना बोलावले जात असल्याने त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वयोवृद्धांना तहसील कार्यालयात बोलावून दिवसभर थांबवून, ताटकळत बसावे लागत आहे. याकडे जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी लक्ष द्यावे आणि वृध्दांना होणारा त्रास, त्यांची पायपीट थांबविण्याची मागणी होत आहे. वृद्धांना घरपोच सेवा देण्यासाठी, अनेक खासगी संस्था पुढाकार घेतात. मात्र सरकारी व्यवस्था निराधार वृद्धांच्या जीवावर उठली आहे, असे चित्र तहसील कार्यालयात दिसून येते.

फोटो: