शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्ष उलटले, पण दीड लाखांवर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:00 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ७९ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत केवळ १ लाख १६ हजार ४०२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देसन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत १ लाख १६ हजार ४०२ शेतकºयांना ४८९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ५९८ शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

- संतोष येलकर

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ७९ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत केवळ १ लाख १६ हजार ४०२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेला वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला तरी, जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ५९८ शेतकरी अद्यापही कर्जमाफी लाभाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी गत सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण २ लाख ७९ हजार थकबाकीदार शेतकऱ्यां पैकी १ लाख ३८ हजार ७३२ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. आॅनलाइन अर्ज केलेल्या आणि कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. आॅनलाइन अर्ज केलेल्या १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत १ लाख १६ हजार ४०२ शेतकºयांना ४८९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेला वर्षपूर्ती होत असली तरी, जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ५९८ शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत संपुष्टात!कर्जमाफीसाठी गतवर्षी आॅनलाइन अर्ज सादर करू न शकलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनामार्फत आॅनलाइन अर्ज सादर करण्याची २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची ही मुदतही आता संपुष्टात आली आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात आॅनलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांपैकी २५ जूनपर्यंत १ लाख १६ हजार ४०२ शेतकºयांना ४८९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.- गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).

 

टॅग्स :Akolaअकोला