शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

वर्ष उलटले, पण दीड लाखांवर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:00 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ७९ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत केवळ १ लाख १६ हजार ४०२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देसन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत १ लाख १६ हजार ४०२ शेतकºयांना ४८९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ५९८ शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

- संतोष येलकर

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ७९ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत केवळ १ लाख १६ हजार ४०२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेला वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला तरी, जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ५९८ शेतकरी अद्यापही कर्जमाफी लाभाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी गत सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण २ लाख ७९ हजार थकबाकीदार शेतकऱ्यां पैकी १ लाख ३८ हजार ७३२ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. आॅनलाइन अर्ज केलेल्या आणि कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. आॅनलाइन अर्ज केलेल्या १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत १ लाख १६ हजार ४०२ शेतकºयांना ४८९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेला वर्षपूर्ती होत असली तरी, जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ५९८ शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत संपुष्टात!कर्जमाफीसाठी गतवर्षी आॅनलाइन अर्ज सादर करू न शकलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनामार्फत आॅनलाइन अर्ज सादर करण्याची २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची ही मुदतही आता संपुष्टात आली आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात आॅनलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांपैकी २५ जूनपर्यंत १ लाख १६ हजार ४०२ शेतकºयांना ४८९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.- गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).

 

टॅग्स :Akolaअकोला