शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कामगार कल्याण केंद्रांना द्यावी लागणार बाह्य रुग्ण सेवा!

By admin | Updated: November 29, 2014 22:21 IST

कल्याण आयुक्ताचे अहवाल सादर करण्याचे निर्देश.

हर्षनंदन वाघ /बुलडाणाकामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आजाराचे निदान करण्यासाठी, राज्यातील सर्वच कामगार कल्याण केंद्रांमध्ये बाह्य रुग्ण सेवा सुरू होणार आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणे, तसेच त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक उन्नती घडविण्याच्या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या कामगार कल्याण केंद्रांच्या माध्यमातून आता कामगारांची रुग्णसेवा करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. कामगार कल्याण केंद्रांच्या बाह्य रुग्ण सेवा केंद्रांच्या माध्यमातून चर्म रोग, अस्थिरोग, हृदयरोग, सामान्य आजार, मुत्र रोग, तसेच नाक, कान, घशाच्या आजारांसोबतच, मानसिक आजारांचेही अचूक निदान करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या कल्याण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, कामगार कल्याण केंद्रांचे अधिकारी कार्यालयात बाह्य रूग्ण सेवा देण्यासाठी उपाययोजना करीत आहेत.*अहवाल सादर करण्याचे निर्देश!कामगार कल्याण केंद्रांमध्ये कामगार आणि कामगार कुटुंबीयांसाठी बाह्य रुग्ण सेवा सुरू करण्यासाठी तात्काळ अहवाल सादर करण्याचे स्मरणपत्र राज्यातील सर्वच केंद्र आणि उप-केंद्रांना देण्यात आले आहेत. त्यासाठी शासकीय, तसेच खासगी डॉक्टरांचे पॅनल तयार करण्यात येणार असून, पॅनलमधील डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी विशेष मोबदलाही कामगार कल्याण केंद्रांकडून दिल्या जाणार आहे. वेळेवर व अचुक आजाराच्या निदानासाठीच हा उपक्रम राबविल्या जाणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीचे स्पष्ट निर्देश कल्याण आयुक्तांनी साहाय्यक कल्याण आयुक्तांना दिले आहेत.*ईएसआयसीला अपयशसध्या ह्यएम्प्लॉईज स्टेट इंश्युरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाह्ण (ईएसआयसी)च्या रूग्णालयांवर कामगार किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य तपासणी व उपचारांची जबाबदारी आहे. त्या रुग्णालयांमध्ये संबंधित तज्ज्ञ उपलब्ध नसल्यास, खासगी रूग्णालयातील तज्ज्ञांकडून उपचारासाठी पत्र, किंवा केंद्राचे कार्ड दिले जाते. खासगी तज्ज्ञ डॉक्टरांना कामगार कल्याण केंद्राकडून उपचाराचा खर्चही दिला जातो; मात्र अनेकदा ते तपासणी व उपचारास नकार देतात, असे अनुभव आहेत. त्यामुळेच कामगार कल्याण केंद्रांमध्ये बाह्य रूग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.*२३२ ठिकाणी मिळणार सेवाराज्यातील कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमातून एकूण २३२ ठिकाणी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी बाह्य रूग्ण विभाग सुरू होणार आहे. त्यामध्ये कामगार कल्याण विभागाचे तीन प्रकल्प, ११ कामगार कल्याण भवन, २0 ललित कला भवन, १५ कामगार कल्याण उप-केंद आणि तीन ग्रामीण व समिती तत्वावरील केंद्रांचा समावेश आहे.