शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

ग्रामस्थांच्या श्रमदानाचे झाले फलित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:33 IST

पिंजर  : जलसंधारणाचा ध्यास घेतलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केले. या श्रमदानाचे फलित म्हणजे सर्वत्र ढाळीचे बांध तयार करण्यात आले.  एवढेच नव्हे, तर गावात झालेल्या कामांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत बाश्रीटाकळी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. 

ठळक मुद्देवॉटर कप विजेतेखेर्डा परिसरात सर्वत्र झाले ढाळीचे बांधजुन्या कामाची केली दुरुस्ती 

चंद्रशेखर ठाकरे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंजर  : जलसंधारणाचा ध्यास घेतलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केले. या श्रमदानाचे फलित म्हणजे सर्वत्र ढाळीचे बांध तयार करण्यात आले.  एवढेच नव्हे, तर गावात झालेल्या कामांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत बाश्रीटाकळी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. 

अभिनेता आमिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २0१६-१७ मध्ये खेर्डा खुर्दने सहभाग नोंदवून श्रमदानची सुरुवात केली होती. ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाचा ६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते त्यांना १0 लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यामध्ये आठ लाख रुपयांची भर टाकली. त्यापाठोपाठ खेर्डा खुर्दवर निधींचा वर्षाव करीत आ. हरीश पिंपळे यांनी १0 लाख व या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य यांनी चार लाख रुपयांचा निधी मंजूर केला. स्पर्धेमधील जलसंधारणाच्या कामामध्ये डिप सीसीटी, विहीर पुनर्भरण, नाला खोलीकरण, माती नाला बांध तसेच जलयुक्त शिवार योजनेतील अपूर्ण राहिलेले १00 बाय १00 चे शेततळे श्रमदानातून पूर्ण केले व माथा ते पायथा संपूर्ण कामे ग्रामस्थ तसेच स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होऊन पूर्ण केले. खेर्डा खुर्द शिवारातील ७५२ हेक्टर जमीन क्षेत्र असून, या संपूर्ण क्षेत्रामध्ये श्रमदानातून ढाळीचे बांध खोदून पाणी थांबविण्याचा प्रयत्न झाला.

जुन्या कामाची केली दुरुस्ती जुन्या माती बंधार्‍याची दुरुस्ती करून पाणी थांबविले. शोषखड्डे, सिमेंट नाला बंधार्‍यांची दुरुस्ती करण्यात आली. संपूर्ण शेतकर्‍यांच्या शेतीची माती तपासणी झालेली असून, शेतकर्‍यांना त्याचा मोठय़ा प्रमाणात फायदा होत आहे. स्पर्धेदरम्यान १७ मे २0१७ रोजी महाश्रमदान झाले. यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच मिक्स अँकॅडमी अकोला येथील ५00 विद्यार्थ्यांंनी सहभाग नोंदविला होता.

१४ एप्रिल २0१७ रोजी संपूर्ण गावाने श्रमदानातून माती नाला बांध बांधून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन जयंतीदिनी आदरांजली वाहिली. भविष्यामध्ये निर्माण होणारी पाणी समस्या लक्षात घेता, ग्रामस्थांनी महाश्रमदान करून गावाच्या प्रगतीकरिता अहारोत्र झटून विकासाचे ध्येय पूर्ण केले. यामध्ये स्वयंसेवी संस्था व शासकीय कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.- सुरेश सोनोने, ग्रामस्थ.

मी दिलेल्या हाकेला ग्रामस्थांनी ओ दिल्याने व गाव दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पनेमुळे गाव विकास कामे करीत असून, यामध्ये प्रशासक नाकारून चांगले सहकार्य लाभले.- संदीप चौधरी, सरपंच  

मी दिलेल्या हाकेला ग्रामस्थांनी ओ दिल्याने व गाव दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पनेमुळे गाव विकास कामे करीत असून, यामध्ये प्रशासक नाकारून चांगले सहकार्य लाभले.- संदीप चौधरी, सरपंच