शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

चक्क पावणेदोन महिन्यानंतर घनकचरा निविदेची ‘वर्क ऑर्डर’ जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 10:44 IST

करारनाम्यात त्रुटी असल्याची माहिती असून, यामुळे भविष्यात कंपनीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अकोला : घनकचºयाचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणाºया प्रकल्पाच्या माध्यमातून मलिदा लाटणाºया शहरातील काही राजकारण्यांच्या इशाºयावरून उशिरा का होईना अखेर मनपा प्रशासनाने चक्क पावणेदोन महिन्यांच्या कालावधीनंतर मे. परभणी अ‍ॅग्रोटेक प्रा.लि. कंपनीला २१ सप्टेंबर रोजी कार्यारंभ आदेश जारी केले. दरम्यान, घनकचºयाच्या करारनाम्यात त्रुटी असल्याची माहिती असून, यामुळे भविष्यात कंपनीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत शहरांना कचरामुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी शहरातील दैनंदिन ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. डम्पिंग ग्राउंडवरील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी ‘मार्स’नामक एजन्सीने तयार केलेल्या डीपीआरला नागपूर येथील निरी संस्थेने मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाने हा डीपीआर मंजूर करीत केंद्र शासनाकडे पाठविला होता. त्यावर शासनाकडून महापालिकेला ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. साहजिकच प्रकल्प उभारण्यासाठी निधी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने ई निविदा प्रक्रिया राबविणे क्रमप्राप्त होते. या ठिकाणी तसे झालेच नाही. हा प्रकल्प स्वीकारणारी मर्जीतील कंपनी अथवा कंत्राटदार सापडत नाही तोपर्यंत निविदा प्रक्रिया न राबविण्यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रशासनावर दबाव निर्माण केला होता.कार्यादेश देण्यासाठी विलंब!मनपाच्या स्थायी समितीच्या सभागृहात २८ जुलै रोजी घनकचरा प्रकल्पाच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर अवघ्या पाचव्या दिवशी हा ठराव प्रशासनाकडे घाईघाईत सादर करण्यात आला. करारनामा करताना संबंधित कंपनीच्या हिताच्या अटींचा त्यामध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. करारनामा तयार करताना त्यामध्ये त्रुटी असल्याची माहिती आहे.

२२० टन कचºयाचे निर्माण नाहीच!शहरातील कचºयाची उपलब्धता लक्षात घेता त्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारता येऊ शकतो. त्यासाठी केंद्र शासनाने प्रतिदिन पाचशे टन कचºयाची अट नमूद केली आहे. शहरातून दैनंदिन २२० टन कचरा निघत असल्याचा दावा मनपाकडून होत असला तरी त्याची अचूक मोजदाद करण्याची कोणतीही यंत्रणा आजरोजी मनपाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ४५ कोटी रुपयातून कचºयाची नेमकी कशा पद्धतीने विल्हेवाट लावणार, याबद्दल माहिती उघड न करण्यासाठी प्रशासनावर काही राजकारण्यांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. अर्थात या मुद्यावर संबंधित कंत्राटदाराची फसगत करण्यात आल्याची चर्चा होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका