शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

ग्रामपंचायतला दिलेली कामे कंत्राटदारांच्या घशात

By admin | Updated: July 7, 2017 01:30 IST

सक्षमीकरणाच्या नावाखाली ग्रामपंचायतींची कंत्राटदारांना कामे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीत भर पडावी, त्यातून गावातील कामे व्हावी, यासाठी शासनाने विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायतच्या पदरात टाकली तरी ती कामे स्वत: न करता कंत्राटदारांच्या घशात घालून पदाधिकाऱ्यांना लाभाचे वाटेकरी केले जात आहे. त्यातून शासनाचा उद्देश बाजूला पडत आहे. त्याकडे ना जिल्हा परिषदेचे लक्ष आहे ना शासनाचे, त्यामुळेच ग्रामपंचायतींऐवजी संबंधितांचे घर भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. ग्रामपंचायत संस्थांचे बळकटीकरण करणे, तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने २५ मार्च २०१५ रोजीच्या आदेशानुसार विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला ‘एजन्सी’चा दर्जा दिला. त्यानुसार वार्षिक उत्पन्न पाहता ग्रामपंचायतींना १० ते १५ लाख रुपयांपर्यंतची कामे देण्यात येतात. त्याचवेळी शासनाने ठरवून दिलेल्या काही मुद्यांकडे दुर्लक्ष करत ग्रामपंचायतींना डोळेझाक करून कामे दिली जात आहेत. त्यामध्ये वर्षभरात ६० लाखांपेक्षाही अधिक कामे एजन्सी म्हणून ग्रामपंचायतींकडे दिली जात आहेत. ती कामे ग्रामपंचायती स्वत:कडे घेतल्यानंतर त्याचे ई-टेंडरिंग करतात. त्यामुळे ती कामे पुन्हा कंत्राटदारांच्या घशात देण्याचेच काम केले जाते. ग्रामपंचायतींनी ती कामे स्वत: केल्यास त्यांना १५ टक्के निधी नफ्याच्या रूपात शिल्लक राहतो; मात्र तसे न करता कंत्राटदाराला कामे देऊन नफ्याच्या रकमेचे वाटप करण्याचा पायंडा सर्वच ग्रामपंचायतींनी पाडला आहे. ई-टेंडरिंग करायचे तर जिल्हा परिषदेत का नाही?ग्रामपंचायतींकडे काम गेल्यानंतर तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कामासाठी ई-टेंडरिंग करावे लागते. त्यातून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाते; मात्र तेच करायचे असेल तर जिल्हा परिषद स्तरावरच ई-टेंडरिंग करून कंत्राटदारांची नियुक्ती करण्याची मागणीही आता पुढे येत आहे. पंधरा टक्के ग्रामनिधीत जमा व्हावेकोणत्याही कामाच्या किमतीतून किमान १५ टक्के रक्कम संबंधित एजन्सी, कंत्राटदाराला मिळते. ग्रामपंचायतीकडे एजन्सी म्हणून असलेल्या कामांतून उरणारा १५ टक्के निधी कोठे जातो, याची कुणालाही माहिती नाही. ग्रामपंचायतींकडे असलेल्या कामांतून हा निधी ग्रामनिधीत जमा होण्याची गरज आहे.