शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करा - आयुष प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 09:29 IST

सरपंचांनी राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी बुधवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील सरपंचांनी राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी बुधवारी केले.जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सरपंच परिषदेत ते बोलत होते. सरपंच परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भंडारे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी राजीव फडके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. एच.आर. मिश्रा उपस्थित होते.सरपंचपद मोठे पद असून, या पदाच्या माध्यमातून सरपंचांना गावाचा विकास करण्याची संधी मिळाली आहे, या संधीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करण्याचे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि ग्रामपंचायतींचे कामकाज यासंदर्भात सविस्तर माहिती सरपंच परिषदेत देण्यात आली. जिल्हास्तरीय सरपंच परिषदेला जिल्ह्यातील सरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शाहू भगत व आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांनी मानले.

‘सीईओं’नी सरपंचांना दिले सात संदेश!सरपंच परिषदेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी सरपंचांना सात संदेश दिले. सरपंच हे संपूर्ण गावाचे पालक असतात. त्यामुळे त्यांनी राजधर्माचे पालन करावे, राबविण्यात येणाºया सर्व योजनांची अंमलबजावणी सरपंचांनी यशस्वीपणे केली पाहिजे, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार व अनियमितता केल्यास गावकऱ्यांपर्यंत ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे माहिती पोहोचते.त्यामुळे प्रतिमा वाईट झाली तर त्याचा बोजा सात पिढीवर पडतो, जेवढे परिश्रम सरपंच पदावर निवडून येण्यासाठी केले, त्याच्या शंभर पटीने परिश्रम गावाच्या प्रगती व विकासासाठी करा, गावामध्ये जनसुविधांची कामे गुणवत्तापूर्वक व दर्जेदार करण्याची काळजी घेतली पाहिजे, ग्रामपंचायतला प्राप्त झालेला सर्व निधी विकास कामांवर खर्च केला पाहिजे व गावात चांगल्या वातावरणाची निर्मिती करा, असे सात संदेश ‘सीईओं’नी दिले.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदsarpanchसरपंच