शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:19 IST

२०१६ मध्ये रस्त्याच्या कामाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. एका कंपनीने कामसुद्धा सुरू केले. परंतु पुन्हा कंत्राटदाराने काम अर्धवट साेडून ...

२०१६ मध्ये रस्त्याच्या कामाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. एका कंपनीने कामसुद्धा सुरू केले. परंतु पुन्हा कंत्राटदाराने काम अर्धवट साेडून दिले. २०२० मध्ये दुसऱ्या आणखी एका कंपनीमार्फत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु तेही काम बंद पडले. रोडचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे रोडवरील गिट्टी व धूळ उडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तसेच परिसरातील ग्रामस्थसुद्धा कमालीचे वैतागले आहेत. अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम कंत्राटदाराने २०१८ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. तसे वर्कऑर्डरमध्येसुद्धा नमूद केले होते. परंतु दोन-तीन वर्षे उलटूनही रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. रस्त्याच्या एका बाजूने गिट्टी पसरवून ठेवल्यामुळे सध्या एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्यामुळे रस्त्यावर धुळीचे लोट उठत आहेत. डोळ्यांमध्ये, तोंडामध्ये धूळ जात असल्याने, ग्रामस्थ, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहेत. रस्त्याच्या कामात मातीमिश्रित मुरूम टाकत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून, शेतकऱ्यांना या धुळीचा फटका बसत आहे.

खरीप हंगाम तोंडावर, शेतात कसे जावे?

खरीप हंगाम ताेंडावर आहे. या मार्गावर हजारो शेतकऱ्यांची शेती आहे. रस्ता खोदून ठेवल्यामुळे व रस्त्याच्या एका बाजूने गिट्टी टाकून ठेवल्यामुळे शेतात जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर पेरणी करण्यासाठी शेतात कसे जावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

रस्त्याच्या कामात दिरंगाई

कंत्राटदाराकडून सध्या तरी रोडवर कामाची हालचाल दिसत नाही. रोडच्या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. निमकर्दा गावात सदर कंपनीचा ठावठिकाणा असून कंपनीमार्फत अनेक व्यावसायिकांनी मालाचा पुरवठा केला आहे. परंतु व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. वाहनांचे भाडेसुद्धा थकित असल्याची माहिती आहे. या मार्गाचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीला अभय कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही!

दोन-तीन वर्षांपासून अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम सुरू आहेत. रस्ता खोदून ठेवला. रस्त्यावर गिट्टी पसरवून ठेवली आहे. परंतु कंत्राटदाराने काम बंद ठेवले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनासुद्धा जनतेच्या समस्यांशी काहीएक देणेघेणे नाही.