शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:19 IST

२०१६ मध्ये रस्त्याच्या कामाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. एका कंपनीने कामसुद्धा सुरू केले. परंतु पुन्हा कंत्राटदाराने काम अर्धवट साेडून ...

२०१६ मध्ये रस्त्याच्या कामाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. एका कंपनीने कामसुद्धा सुरू केले. परंतु पुन्हा कंत्राटदाराने काम अर्धवट साेडून दिले. २०२० मध्ये दुसऱ्या आणखी एका कंपनीमार्फत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु तेही काम बंद पडले. रोडचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे रोडवरील गिट्टी व धूळ उडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तसेच परिसरातील ग्रामस्थसुद्धा कमालीचे वैतागले आहेत. अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम कंत्राटदाराने २०१८ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. तसे वर्कऑर्डरमध्येसुद्धा नमूद केले होते. परंतु दोन-तीन वर्षे उलटूनही रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. रस्त्याच्या एका बाजूने गिट्टी पसरवून ठेवल्यामुळे सध्या एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्यामुळे रस्त्यावर धुळीचे लोट उठत आहेत. डोळ्यांमध्ये, तोंडामध्ये धूळ जात असल्याने, ग्रामस्थ, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहेत. रस्त्याच्या कामात मातीमिश्रित मुरूम टाकत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून, शेतकऱ्यांना या धुळीचा फटका बसत आहे.

खरीप हंगाम तोंडावर, शेतात कसे जावे?

खरीप हंगाम ताेंडावर आहे. या मार्गावर हजारो शेतकऱ्यांची शेती आहे. रस्ता खोदून ठेवल्यामुळे व रस्त्याच्या एका बाजूने गिट्टी टाकून ठेवल्यामुळे शेतात जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर पेरणी करण्यासाठी शेतात कसे जावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

रस्त्याच्या कामात दिरंगाई

कंत्राटदाराकडून सध्या तरी रोडवर कामाची हालचाल दिसत नाही. रोडच्या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. निमकर्दा गावात सदर कंपनीचा ठावठिकाणा असून कंपनीमार्फत अनेक व्यावसायिकांनी मालाचा पुरवठा केला आहे. परंतु व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. वाहनांचे भाडेसुद्धा थकित असल्याची माहिती आहे. या मार्गाचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीला अभय कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही!

दोन-तीन वर्षांपासून अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम सुरू आहेत. रस्ता खोदून ठेवला. रस्त्यावर गिट्टी पसरवून ठेवली आहे. परंतु कंत्राटदाराने काम बंद ठेवले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनासुद्धा जनतेच्या समस्यांशी काहीएक देणेघेणे नाही.