शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:19 IST

२०१६ मध्ये रस्त्याच्या कामाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. एका कंपनीने कामसुद्धा सुरू केले. परंतु पुन्हा कंत्राटदाराने काम अर्धवट साेडून ...

२०१६ मध्ये रस्त्याच्या कामाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. एका कंपनीने कामसुद्धा सुरू केले. परंतु पुन्हा कंत्राटदाराने काम अर्धवट साेडून दिले. २०२० मध्ये दुसऱ्या आणखी एका कंपनीमार्फत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु तेही काम बंद पडले. रोडचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे रोडवरील गिट्टी व धूळ उडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तसेच परिसरातील ग्रामस्थसुद्धा कमालीचे वैतागले आहेत. अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम कंत्राटदाराने २०१८ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. तसे वर्कऑर्डरमध्येसुद्धा नमूद केले होते. परंतु दोन-तीन वर्षे उलटूनही रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. रस्त्याच्या एका बाजूने गिट्टी पसरवून ठेवल्यामुळे सध्या एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्यामुळे रस्त्यावर धुळीचे लोट उठत आहेत. डोळ्यांमध्ये, तोंडामध्ये धूळ जात असल्याने, ग्रामस्थ, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहेत. रस्त्याच्या कामात मातीमिश्रित मुरूम टाकत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून, शेतकऱ्यांना या धुळीचा फटका बसत आहे.

खरीप हंगाम तोंडावर, शेतात कसे जावे?

खरीप हंगाम ताेंडावर आहे. या मार्गावर हजारो शेतकऱ्यांची शेती आहे. रस्ता खोदून ठेवल्यामुळे व रस्त्याच्या एका बाजूने गिट्टी टाकून ठेवल्यामुळे शेतात जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर पेरणी करण्यासाठी शेतात कसे जावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

रस्त्याच्या कामात दिरंगाई

कंत्राटदाराकडून सध्या तरी रोडवर कामाची हालचाल दिसत नाही. रोडच्या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. निमकर्दा गावात सदर कंपनीचा ठावठिकाणा असून कंपनीमार्फत अनेक व्यावसायिकांनी मालाचा पुरवठा केला आहे. परंतु व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. वाहनांचे भाडेसुद्धा थकित असल्याची माहिती आहे. या मार्गाचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीला अभय कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही!

दोन-तीन वर्षांपासून अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम सुरू आहेत. रस्ता खोदून ठेवला. रस्त्यावर गिट्टी पसरवून ठेवली आहे. परंतु कंत्राटदाराने काम बंद ठेवले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनासुद्धा जनतेच्या समस्यांशी काहीएक देणेघेणे नाही.