शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:19 IST

२०१६ मध्ये रस्त्याच्या कामाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. एका कंपनीने कामसुद्धा सुरू केले. परंतु पुन्हा कंत्राटदाराने काम अर्धवट साेडून ...

२०१६ मध्ये रस्त्याच्या कामाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. एका कंपनीने कामसुद्धा सुरू केले. परंतु पुन्हा कंत्राटदाराने काम अर्धवट साेडून दिले. २०२० मध्ये दुसऱ्या आणखी एका कंपनीमार्फत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु तेही काम बंद पडले. रोडचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे रोडवरील गिट्टी व धूळ उडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तसेच परिसरातील ग्रामस्थसुद्धा कमालीचे वैतागले आहेत. अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम कंत्राटदाराने २०१८ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. तसे वर्कऑर्डरमध्येसुद्धा नमूद केले होते. परंतु दोन-तीन वर्षे उलटूनही रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. रस्त्याच्या एका बाजूने गिट्टी पसरवून ठेवल्यामुळे सध्या एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्यामुळे रस्त्यावर धुळीचे लोट उठत आहेत. डोळ्यांमध्ये, तोंडामध्ये धूळ जात असल्याने, ग्रामस्थ, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहेत. रस्त्याच्या कामात मातीमिश्रित मुरूम टाकत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून, शेतकऱ्यांना या धुळीचा फटका बसत आहे.

खरीप हंगाम तोंडावर, शेतात कसे जावे?

खरीप हंगाम ताेंडावर आहे. या मार्गावर हजारो शेतकऱ्यांची शेती आहे. रस्ता खोदून ठेवल्यामुळे व रस्त्याच्या एका बाजूने गिट्टी टाकून ठेवल्यामुळे शेतात जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर पेरणी करण्यासाठी शेतात कसे जावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

रस्त्याच्या कामात दिरंगाई

कंत्राटदाराकडून सध्या तरी रोडवर कामाची हालचाल दिसत नाही. रोडच्या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. निमकर्दा गावात सदर कंपनीचा ठावठिकाणा असून कंपनीमार्फत अनेक व्यावसायिकांनी मालाचा पुरवठा केला आहे. परंतु व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. वाहनांचे भाडेसुद्धा थकित असल्याची माहिती आहे. या मार्गाचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीला अभय कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही!

दोन-तीन वर्षांपासून अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम सुरू आहेत. रस्ता खोदून ठेवला. रस्त्यावर गिट्टी पसरवून ठेवली आहे. परंतु कंत्राटदाराने काम बंद ठेवले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनासुद्धा जनतेच्या समस्यांशी काहीएक देणेघेणे नाही.