शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अस्तिवात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी महिलांची गर्दी; जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:40 IST

अकोला : महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तिवात नसताना, या योजनेच्या लाभासाठी अकोला व अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याकरिता महिलांनी धडपड केली.

ठळक मुद्देप्रती महिना चार हजार रुपये अर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशा मागणीचे महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्राप्त होणारे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत स्वीकारण्यात आले. अस्तिवात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याकरिता अमरावती व अकोला जिल्ह्यातील महिलांनी गत महिनाभरात चांगलीच धावपळ केली.

- संतोष येलकर

अकोला : महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तिवात नसताना, या योजनेच्या लाभासाठी अकोला व अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याकरिता महिलांनी धडपड केली.राज्यातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी अकोला व अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी गत महिनाभराच्या कालावधीत महिलांची गर्दी होत होती. प्रती महिना चार हजार रुपये अर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशा मागणीचे महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्राप्त होणारे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत स्वीकारण्यात आले; परंतु महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना शासनामार्फत राबविण्यात येत नसताना, यासंदर्भात शासनाकडून कोणतेही आदेश नसताना, अस्तिवात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याकरिता अमरावती व अकोला जिल्ह्यातील महिलांनी गत महिनाभरात चांगलीच धावपळ केली. अर्ज सादर करण्याकरिता गत १ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयांत महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.अर्ज स्वीकारणे बंद!महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तित्वात नाही, तसेच यासंदर्भात शासनाचे कोणतेही आदेश किंवा निर्देश जिल्हा प्रशासनाला प्राप्त नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत जिल्ह्यातील महिलांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १ आॅगस्टपासून बंद करण्यात आली, तसेच अशा प्रकारचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. अमरावती जिल्ह्यात असे अर्ज स्वीकारण्याचे काम यापूर्वीच जिल्हा प्रशासनामार्फत बंद करण्यात आले.अर्जांसाठी महिलांचा खर्च पाण्यात!आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी महिलांना प्रत्येकी २० ते ३० रुपये खर्च करावा लागला; मात्र अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याने, त्यासाठी अर्ज सादर करण्याकरिता महिलांचा खर्च पाण्यात गेला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय