शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

स्त्री मुक्ती परिषद: आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करा! - रोहिणी टेकाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:21 IST

अकोला : देशातील महिलांचे मुक्तिदाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे सांगत महिलांनी आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन पुणे येथील रोहिणी टेकाडे यांनी मंगळवारी येथे केले.

अकोला : देशातील महिलांचे मुक्तिदाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे सांगत महिलांनी आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन पुणे येथील रोहिणी टेकाडे यांनी मंगळवारी येथे केले.भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने शहरातील अशोक वाटिका येथे आयोजित स्त्री मुक्ती परिषदेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. जगात सर्वप्रथम स्त्री-पुरुष समानतेचा संदेश तथागत गौतम बुद्ध यांनी दिला, असे सांगत २५ डिसेंबर १९२७ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मनुस्मृती’चे दहन करून देशातील समस्त स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य केले, असे त्या म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांच्या आधारे महिलांनी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन रोहिणी टेकाडे यांनी केले. भारिप-बमसं महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, वंदना वासनिक, रेखा अंभोरे, अ‍ॅड. धनश्री देव, किरण बोराखडे, आशा अहिरे, इंदू भड, आशा इंगळे, सरला मेश्राम, लक्ष्मी सरिसे, आशा एखे, सूर्यकांत घनबहादूर, सुवर्णा जाधव, संगीता खंडारे, सुनंदा चांदणे, पार्वती लहाने, शोभा आठवले, हिना चौधरी, सुनीता रंगारी, मनीषा मते, विद्या अंभोरे, कविता राठोड, सुषमा कावरे, माजी मंत्री डॉ. डी. एम. भांडे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, अ‍ॅड. संतोष रहाटे, रामा तायडे व गजानन गवई उपस्थित होते. या परिषदेचे प्रास्ताविक प्रतिभा अवचार यांनी केले. संचालन शोभा शेळके तर आभार मंगला सिरसाट यांनी मानले. स्त्री मुक्ती परिषदेला जिल्ह्यातील भारिप-बमसं महिला आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्ता महिला उपस्थित होत्या.परिषदेत ११ ठराव मंजूर!स्त्री मुक्ती परिषदेत ११ ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये २५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन जाहीर करावा, आरक्षणावर गदा आणणाऱ्या व्यवस्थेचा निषेध, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला शासनाच्या ई-क्लास जमिनीचा ताबा देण्यात यावा, स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचा त्वरित थांबवावे, फुले-आंबेडकरी चळवळीत जात-भाषेचा वापर न करणे, ‘आरएसएस’च्या शस्त्रपूजेवर बंदी घालावी, कोरेगाव-भीमा प्रकरणाचे सूत्रधार मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करावी, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवावे, बहुजन वर्गाला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध कराव्या, आदिवासींना ई-क्लास जमीन हक्क देण्यात यावे व अकोला मनपाचा अवाजवी कर त्वरित रद्द करावा इत्यादी ठरावांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोला