शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्त्री मुक्ती परिषद: आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करा! - रोहिणी टेकाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:21 IST

अकोला : देशातील महिलांचे मुक्तिदाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे सांगत महिलांनी आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन पुणे येथील रोहिणी टेकाडे यांनी मंगळवारी येथे केले.

अकोला : देशातील महिलांचे मुक्तिदाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे सांगत महिलांनी आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन पुणे येथील रोहिणी टेकाडे यांनी मंगळवारी येथे केले.भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने शहरातील अशोक वाटिका येथे आयोजित स्त्री मुक्ती परिषदेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. जगात सर्वप्रथम स्त्री-पुरुष समानतेचा संदेश तथागत गौतम बुद्ध यांनी दिला, असे सांगत २५ डिसेंबर १९२७ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मनुस्मृती’चे दहन करून देशातील समस्त स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य केले, असे त्या म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांच्या आधारे महिलांनी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन रोहिणी टेकाडे यांनी केले. भारिप-बमसं महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, वंदना वासनिक, रेखा अंभोरे, अ‍ॅड. धनश्री देव, किरण बोराखडे, आशा अहिरे, इंदू भड, आशा इंगळे, सरला मेश्राम, लक्ष्मी सरिसे, आशा एखे, सूर्यकांत घनबहादूर, सुवर्णा जाधव, संगीता खंडारे, सुनंदा चांदणे, पार्वती लहाने, शोभा आठवले, हिना चौधरी, सुनीता रंगारी, मनीषा मते, विद्या अंभोरे, कविता राठोड, सुषमा कावरे, माजी मंत्री डॉ. डी. एम. भांडे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, अ‍ॅड. संतोष रहाटे, रामा तायडे व गजानन गवई उपस्थित होते. या परिषदेचे प्रास्ताविक प्रतिभा अवचार यांनी केले. संचालन शोभा शेळके तर आभार मंगला सिरसाट यांनी मानले. स्त्री मुक्ती परिषदेला जिल्ह्यातील भारिप-बमसं महिला आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्ता महिला उपस्थित होत्या.परिषदेत ११ ठराव मंजूर!स्त्री मुक्ती परिषदेत ११ ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये २५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन जाहीर करावा, आरक्षणावर गदा आणणाऱ्या व्यवस्थेचा निषेध, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला शासनाच्या ई-क्लास जमिनीचा ताबा देण्यात यावा, स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचा त्वरित थांबवावे, फुले-आंबेडकरी चळवळीत जात-भाषेचा वापर न करणे, ‘आरएसएस’च्या शस्त्रपूजेवर बंदी घालावी, कोरेगाव-भीमा प्रकरणाचे सूत्रधार मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करावी, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवावे, बहुजन वर्गाला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध कराव्या, आदिवासींना ई-क्लास जमीन हक्क देण्यात यावे व अकोला मनपाचा अवाजवी कर त्वरित रद्द करावा इत्यादी ठरावांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोला