शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

आव्हानांवर मात करून महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले पाहिजे - प्रतीक्षा तेजनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 18:52 IST

अन्न धान्य वितरण अधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांनी महिला दिनाच्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.

- संतोष येलकर

अकोला : प्रशासनात काम करताना महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो; मात्र त्यामुळे खचून न जाता येणाºया आव्हानांवर मात करून महिला अधिकारी व कर्मचाºयांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे मत अकोल्याच्या अन्न धान्य वितरण अधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांनी महिला दिनाच्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले. महिला अधिकारी व कर्मचाºयांना काम करताना अडचणी येतात का?-होय, प्रशासनात महिला अधिकारी व कर्मचारी म्हणून काम करताना अनेक अडचणी येत असतात, तसेच वेगवेगळ्या आव्हानांचा सामनाही करावा लागतो; परंतु आव्हानांच्या परिस्थितीत येणाºया अनुभवातून शिकत गेल्यास कर्तव्य बजावण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे येणाºया अडचणी व आव्हानांना सामोरे जाऊन महिला अधिकारी व कर्मचाºयांनी खंबीरपणे आपले कर्तव्य बजावले पाहिजे.महिला कर्मचाºयांना सांभाळाव्या लागणाºया जबाबदारीचे स्वरूप कसे आहे?-महिला अधिकारी आणि कर्मचाºयांना कौटुुंबिक आणि कार्यालयात काम करण्याची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागते. घरात मुला-बाळांची काळजी घेण्यासह महिला अधिकारी-कर्मचारी कार्यालयात मनापासून काम करतात. कार्यालयीन वेळेत महिला अधिकारी -कर्मचारी कार्यालयाबाहेर जात नसल्याने, त्यांच्याकडून होणारे कार्यालयीन कामकाजाचे प्रमाणही जास्त असते. तसेच काम करताना महिला-अधिकारी कर्मचाºयांकडून टाळाटाळ होत नाही. लहान मुलांचे संगोपन आणि कार्यालयीन कामाची जबाबदारी पार पाडताना कमालीची ओढाताण होते. त्यामुळे केंद्राच्या धर्तीवर राज्यात महिला अधिकारी व कर्मचाºयांना प्रसूती व बालसंगोपनाची रजा मिळाली पाहिजे.प्रशासनातील महिलांचा टक्का वाढत आहे का?-प्रशासनातील महिला अधिकारी व कर्मचाºयांचा टक्का कमी असला तरी, वाढत आहे. कौटुंबिक जबाबदारी आणि प्रशासनात काम करताना येणाºया आव्हानांमुळे काही ठिकाणी काम करण्याची जबाबदारी स्वीकारणे काही प्रमाणात टाळले जाते. त्यामुळे आव्हानांचा सामना करून खंबीरपणे काम करण्याची तयारी केल्यास प्रशासनातील महिला अधिकारी व कर्मचाºयांचा टक्का वाढणार आहे. 

 भविष्यातील आपले ‘व्हिजन’ काय?- शेतकरी, गरीब आणि उपेक्षित घटकांच्या अडचणी सोडविण्याची गरज आहे, तसेच आई-वडिलांचे छत्र नसलेल्या अनाथ मुला-मुलींचा शोध घेऊन, त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने भविष्यात प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत