शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास न करताच विकास, सोहोळ अभयारण्याचा -हास

By admin | Updated: December 26, 2015 02:34 IST

गवताळ भागात लावली झाडे; हरणांनी सोडले अभयारण्य

विवेक चांदूरकर/ वाशिम: हरीण तसेच काळविटांच्या जीवनशैलीचा कोणत्याही प्रकारे अभ्यास न करता वन विभागाने सोहोळ अभयारण्याचा चुकीच्या पद्धतीने विकास केला. परिणामी या अभयारण्यातून हरीण व काळवीट बाहेर पडत असून, ते शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान करीत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येत आहे. जिल्हय़ात काळवीट तसेच हरणांचे वास्तव्य असलेले सोहळ अभयारण्य आहे. हे अभयारण्य गवताळ असून, १८३५ हेक्टरवर पसरले आहे. या अभयारण्यात काळवीट तसेच हरणांचा वावर मोठय़ा प्रमाणात असतो. सोहोळ हे देशात मोजक्या असलेल्या गवताळ अभयारण्यांपैकी एक आहे. मोठ-मोठय़ा वृक्षांनी नटलेल्या अभयारण्यांप्रमाणेच गवताळ अभयारण्याचीही एक वेगळी व समृद्ध अशी जैवविविधता असते; मात्र या भागाकडे नेहमीच पडीक जमीन म्हणून बघितले जाते. कारंजा-सोहोळ अभयारण्याचेही तेच झाले आहे. वन विभागाने या गवताळ प्रदेशात चुकीच्या पद्धतीने विकासकामे केली, तसेच येथे मोठ-मोठय़ा वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यांना नियमित पाणी दिल्याने येथे ही झाडे वाढली व येथे जंगल तयार झाले. तसेच या ठिकाणी मोठमोठी झुडुपेही तयार झाली आहेत. ही झुडुपे असलेले जंगल तयार झाल्यामुळे हरणांनी या ठिकाणी चरणे बंद केले. ज्या काळविटांच्या नावाने हे जंगल ओळखले जात होते, तेच प्राणी आता या जंगलात राहिले नाहीत. हरीण चरत असताना वाघ, बिबटसारखा हिंस्र पशूपासून नेहमी दक्ष असते. त्यामुळे ते वारंवार मान वर करून आजूबाजूला पाहत असते. दूर असलेला शिकारी प्राणी दिसावा याकरिता हरणे मोकळ्या जागेत चरणे पसंत करतात. सोहोळ हे गवताळ जंगल असल्यामुळे येथे हरणे मोठय़ा प्रमाणात चरत होती. आता मोठी झाडे वाढल्यामुळे वन्य प्राणी या जंगलात वास्तव्य करीत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी तसेच केंद्रीय पर्यावरण समितीचे सदस्य राहिलेले डॉ. किशोर रिठे यांनी केला आहे. वन्य प्राण्यांसाठी असलेले हे जंगल वन विभागाच्या चुकीमुळे नष्ट झाले असून, येथे आता मोठे वृक्ष व झुडुपे उभी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोहोळ अभयारण्यास वन विभागाच्या वतीने अतिरिक्त संरक्षण देण्यात आले आहे. तसेच येथे मोठ-मोठी झाडे लावण्यात आली आहे. हा गवताळ प्रदेश आहे. येथे हरीण व काळविटांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. आता मात्र झाडे वाढल्यामुळे हरणांनी हे अभयारण्य सोडले असून, ते आजूबाजूच्या गावांमधील शेतांमध्ये चरतात. याला वन विभागच जबाबदार असल्याचा ठपका पर्यावरणप्रेमी किशोर रिठे यांनी व्यक्त केले. तर या अभयारण्यात कमी प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यापैकी काही झाडे जगली नाहीत. त्यामुळे येथे जंगल तयार झाले नाही, तसेच या अभयारण्यातील वन्य प्राण्यांची संख्या वाढली असल्याचे कारंजा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यू. ए. पठाण यांनी मत व्यक्त केले.