शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दोन लाखांवर रोख काढणारे निवडणूक आयोगाच्या 'रडार'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:07 IST

अकोला : दोन लाखांवर रोख काढणाऱ्या प्रत्येक बँक खातेदाराची नोंद थेट निवडणूक आयोगाकडे दररोज रेकॉर्ड होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- संजय खांडेकरअकोला : दोन लाखांवर रोख काढणाऱ्या प्रत्येक बँक खातेदाराची नोंद थेट निवडणूक आयोगाकडे दररोज रेकॉर्ड होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन लाखांवर रोख रक्कम काढणारे निवडणूक आयोगाच्या रडारवर असल्याने अनेकांची चौकशी होण्याचे संकेत आहेत.राष्ट्रीयीकृत बँका, शेड्युल बँका, को-आॅपरेटिव्ह बँकेतून दररोज कोट्यवधीची रोख उलाढाल होत असते. स्थानिक बँकेतून ही माहिती मुख्य शाखेला देणे कामाचा दैनंदिन भाग असतो; मात्र जेव्हापासून बँकेचे व्यवहार संगणीकृत आणि आॅनलाइन बँकिंग पद्धतीने जोडले गेले, तेव्हापासून प्रत्येक स्थानिक बँकेची दैनंदिन माहिती मुख्य शाखेला द्यावी लागत असे. त्यानंतर दोन लाखांवर जर कुण्या बँक खात्यातील रक्कम काढली जात असेल किंवा टाकल्या जात असेल, तर त्याची माहिती रिझर्व्ह बँकेला देणे २०१२ च्या नियमावलीनुसार बंधनकारक केली. त्यामुळे २०१२ नंतर दोन लाखांवर होणाऱ्या प्रत्येक उलाढीलीची नोंद तांत्रिक यंत्रणेतून तातडीने पोहोचत आहे; मात्र निवडणूक आयोगाने अलीकडे रिझर्व्ह बँकेचा डेटा स्वत:कडे लिंक करून घेतल्याने आता स्थानिक बँकेत होत असलेली उलाढालदेखील आयोगाकडे तातडीने पोहोचत आहे.  लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे बँक खाते आणि त्यांच्या नातेवाइकांची माहिती टिपण्याचे संकेत बँक शाखाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे बँक अधिकारी उमेदवारांच्या खात्यावर लक्ष ठेवून आहेत; पण उमेदवाराच्या नातेवाइकांवर लक्ष तरी कसे ठेवावे, हा पेच अधिकाºयांना पडला आहे.

 दोन लाखांवर बँकेतून कॅश काढणाºया प्रत्येकाची माहिती रिझर्व्ह बँके कडे आपसूकच जाते. २०१२ पासून बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक यंत्रणेत त्या प्रकारचा बदल केलेला आहे. आरबीआयने ही यंत्रणा निवडणूक आयोगाशी जोडली आहे. जर या व्यवहारासंदर्भात काही संशय जाणवत असेल, तर आयटी विभागाकडून थेट संबंधित बँक मॅनेजरला नोटीस येते.- आलोककुमार तरेनिया, एलडीएम, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगbankबँक