शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पाणीपुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लावणार

By admin | Updated: November 22, 2014 02:00 IST

लोकमत संवाद कार्यक्रमात गोवर्धन शर्मा यांचे आश्‍वासन.

अकोला : सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाण पूल, स्वच्छता, वीज, पिण्याचे पाणी, रस्ते आदी सुविधांपासून दूर असलेल्या अकोला शहराच्या विकासाच्या दृष्टीने विधानसभेच्या अकोला पश्‍चिम मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी शुक्रवारी ह्यलोकमतह्ण संवाद कार्यक्रमात मनमोकळी चर्चा केली. मंत्रिपदापेक्षा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निधी खेचून आणण्यात आपल्याला रस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी मतदारसंघात राबविण्यात येणार्‍या विविध विकास योजनांसोबतच शहरातील राजकारणावर लोकमतच्या संपादकीय विभागातील सहकार्‍यांशी दिलखुलास चर्चा केली.

प्रश्न : शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराल ?आ. शर्मा : मोर्णा प्रकल्पातून अकोला शहरात पाईप लाईन टाकण्यासाठी ४0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही योजना मंजूर झाल्यास पाणी पुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लागेल.

प्रश्न : अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा कसा काढता येईल?आ. शर्मा : मनपाने शहरात हॉकर्स झोन तयार करावेत. यासाठी मनपाने प्रस्ताव दिल्यास आमदार कोट्यातून अथवा शासनाकडून मदत मिळवून देऊ. अतिक्रमण मोहिम एकतर्फी राबविल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल. परिणामी बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रश्न : सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघाच्या विकासाबाबत तुमच्या कोणत्या योजना आहेत?आ. शर्मा : शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी दोन उड्डाण पूल आणि २0 पेक्षा जास्त रस्ते बांधण्याचे नियोजन आहे. यापूर्वी राज्यात १५ वर्षांपेक्षा जास्त काळ विरोधीपक्षाची सत्ता होती. त्यामुळे निधी कमी मिळत होता.मात्र आता राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने निधीसाठी प्रयत्न करु.

प्रश्न : आपण सलग पाचव्यांदा निवडून आलात; आपल्या यशाचे गमक काय?आ. शर्मा : मी दोनवेळा नगर परिषद आणि पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकलो. प्रत्येक वॉर्डाचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले. वॉर्डातील समस्या सुटण्यासाठी थेट नागरिकांशीच संपर्क साधला. वॉर्डात रस्ते, पथदिवे, स्वच्छता आणि सभागृहांसाठी भरीव निधी दिला. १८ कोटी ५0 लाख रुपये खर्च करुन पूर संरक्षण भिंत बांधली. नवीन दगडी पूल बांधला. महामार्गाच्या चौपदरीसाठी प्रयत्न केले. जुने शहरात विद्युत उपकेंद्र आणले. वाण धरणातील पाणी अकोला शहरात आणण्यासाठी पाईप लाईन टाकली. मी रामनवमी शोभा यात्रा उत्सव समितीचा सर्वसेवाधिकारी या नात्याने केवळ अकोला शहरातीलच नव्हे ,तर जिल्ह्यातील गरजूंना मदतीचा हात दिला.राजकारणात मी कधीही कोणावर आरोप-प्रत्यारोप केले नाही. मी नेहमीच माणसं जोडण्यासाठी प्रयत्न करतो. राजकारणात जनतेच्या विश्‍वासला तडा जाईल, असे एकही कृत्य माझ्या हातून घडलेले नाही आणि घडणारही नाही.

प्रश्न : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असल्याचे त्याचा परिणाम उद्योगावरही होत आहे. त्यावर काही ठोस उपाय शोधता येतील काय ?आ. शर्मा : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाकडे पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. शहरात आमदार निधीतून ७ पोलिस चौकी बांधून दिल्या होत्या. त्यापैकी आज केवळ एकच पोलिस चौकी सुरु आहे. पोलिस दलातच अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे अकोल्यात पोलिस आयुक्तालय मंजूर करण्याची मागणी केली होती. आता राज्यात भाजपची सत्ता असल्याने पोलिस आयुक्तालयासाठी प्रयत्न करु.