शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाणीपुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लावणार

By admin | Updated: November 22, 2014 02:00 IST

लोकमत संवाद कार्यक्रमात गोवर्धन शर्मा यांचे आश्‍वासन.

अकोला : सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाण पूल, स्वच्छता, वीज, पिण्याचे पाणी, रस्ते आदी सुविधांपासून दूर असलेल्या अकोला शहराच्या विकासाच्या दृष्टीने विधानसभेच्या अकोला पश्‍चिम मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी शुक्रवारी ह्यलोकमतह्ण संवाद कार्यक्रमात मनमोकळी चर्चा केली. मंत्रिपदापेक्षा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निधी खेचून आणण्यात आपल्याला रस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी मतदारसंघात राबविण्यात येणार्‍या विविध विकास योजनांसोबतच शहरातील राजकारणावर लोकमतच्या संपादकीय विभागातील सहकार्‍यांशी दिलखुलास चर्चा केली.

प्रश्न : शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराल ?आ. शर्मा : मोर्णा प्रकल्पातून अकोला शहरात पाईप लाईन टाकण्यासाठी ४0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही योजना मंजूर झाल्यास पाणी पुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लागेल.

प्रश्न : अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा कसा काढता येईल?आ. शर्मा : मनपाने शहरात हॉकर्स झोन तयार करावेत. यासाठी मनपाने प्रस्ताव दिल्यास आमदार कोट्यातून अथवा शासनाकडून मदत मिळवून देऊ. अतिक्रमण मोहिम एकतर्फी राबविल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल. परिणामी बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रश्न : सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघाच्या विकासाबाबत तुमच्या कोणत्या योजना आहेत?आ. शर्मा : शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी दोन उड्डाण पूल आणि २0 पेक्षा जास्त रस्ते बांधण्याचे नियोजन आहे. यापूर्वी राज्यात १५ वर्षांपेक्षा जास्त काळ विरोधीपक्षाची सत्ता होती. त्यामुळे निधी कमी मिळत होता.मात्र आता राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने निधीसाठी प्रयत्न करु.

प्रश्न : आपण सलग पाचव्यांदा निवडून आलात; आपल्या यशाचे गमक काय?आ. शर्मा : मी दोनवेळा नगर परिषद आणि पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकलो. प्रत्येक वॉर्डाचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले. वॉर्डातील समस्या सुटण्यासाठी थेट नागरिकांशीच संपर्क साधला. वॉर्डात रस्ते, पथदिवे, स्वच्छता आणि सभागृहांसाठी भरीव निधी दिला. १८ कोटी ५0 लाख रुपये खर्च करुन पूर संरक्षण भिंत बांधली. नवीन दगडी पूल बांधला. महामार्गाच्या चौपदरीसाठी प्रयत्न केले. जुने शहरात विद्युत उपकेंद्र आणले. वाण धरणातील पाणी अकोला शहरात आणण्यासाठी पाईप लाईन टाकली. मी रामनवमी शोभा यात्रा उत्सव समितीचा सर्वसेवाधिकारी या नात्याने केवळ अकोला शहरातीलच नव्हे ,तर जिल्ह्यातील गरजूंना मदतीचा हात दिला.राजकारणात मी कधीही कोणावर आरोप-प्रत्यारोप केले नाही. मी नेहमीच माणसं जोडण्यासाठी प्रयत्न करतो. राजकारणात जनतेच्या विश्‍वासला तडा जाईल, असे एकही कृत्य माझ्या हातून घडलेले नाही आणि घडणारही नाही.

प्रश्न : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असल्याचे त्याचा परिणाम उद्योगावरही होत आहे. त्यावर काही ठोस उपाय शोधता येतील काय ?आ. शर्मा : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाकडे पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. शहरात आमदार निधीतून ७ पोलिस चौकी बांधून दिल्या होत्या. त्यापैकी आज केवळ एकच पोलिस चौकी सुरु आहे. पोलिस दलातच अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे अकोल्यात पोलिस आयुक्तालय मंजूर करण्याची मागणी केली होती. आता राज्यात भाजपची सत्ता असल्याने पोलिस आयुक्तालयासाठी प्रयत्न करु.