शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पाणीपुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लावणार

By admin | Updated: November 22, 2014 02:00 IST

लोकमत संवाद कार्यक्रमात गोवर्धन शर्मा यांचे आश्‍वासन.

अकोला : सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाण पूल, स्वच्छता, वीज, पिण्याचे पाणी, रस्ते आदी सुविधांपासून दूर असलेल्या अकोला शहराच्या विकासाच्या दृष्टीने विधानसभेच्या अकोला पश्‍चिम मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी शुक्रवारी ह्यलोकमतह्ण संवाद कार्यक्रमात मनमोकळी चर्चा केली. मंत्रिपदापेक्षा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निधी खेचून आणण्यात आपल्याला रस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी मतदारसंघात राबविण्यात येणार्‍या विविध विकास योजनांसोबतच शहरातील राजकारणावर लोकमतच्या संपादकीय विभागातील सहकार्‍यांशी दिलखुलास चर्चा केली.

प्रश्न : शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराल ?आ. शर्मा : मोर्णा प्रकल्पातून अकोला शहरात पाईप लाईन टाकण्यासाठी ४0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही योजना मंजूर झाल्यास पाणी पुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लागेल.

प्रश्न : अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा कसा काढता येईल?आ. शर्मा : मनपाने शहरात हॉकर्स झोन तयार करावेत. यासाठी मनपाने प्रस्ताव दिल्यास आमदार कोट्यातून अथवा शासनाकडून मदत मिळवून देऊ. अतिक्रमण मोहिम एकतर्फी राबविल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल. परिणामी बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रश्न : सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघाच्या विकासाबाबत तुमच्या कोणत्या योजना आहेत?आ. शर्मा : शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी दोन उड्डाण पूल आणि २0 पेक्षा जास्त रस्ते बांधण्याचे नियोजन आहे. यापूर्वी राज्यात १५ वर्षांपेक्षा जास्त काळ विरोधीपक्षाची सत्ता होती. त्यामुळे निधी कमी मिळत होता.मात्र आता राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने निधीसाठी प्रयत्न करु.

प्रश्न : आपण सलग पाचव्यांदा निवडून आलात; आपल्या यशाचे गमक काय?आ. शर्मा : मी दोनवेळा नगर परिषद आणि पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकलो. प्रत्येक वॉर्डाचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले. वॉर्डातील समस्या सुटण्यासाठी थेट नागरिकांशीच संपर्क साधला. वॉर्डात रस्ते, पथदिवे, स्वच्छता आणि सभागृहांसाठी भरीव निधी दिला. १८ कोटी ५0 लाख रुपये खर्च करुन पूर संरक्षण भिंत बांधली. नवीन दगडी पूल बांधला. महामार्गाच्या चौपदरीसाठी प्रयत्न केले. जुने शहरात विद्युत उपकेंद्र आणले. वाण धरणातील पाणी अकोला शहरात आणण्यासाठी पाईप लाईन टाकली. मी रामनवमी शोभा यात्रा उत्सव समितीचा सर्वसेवाधिकारी या नात्याने केवळ अकोला शहरातीलच नव्हे ,तर जिल्ह्यातील गरजूंना मदतीचा हात दिला.राजकारणात मी कधीही कोणावर आरोप-प्रत्यारोप केले नाही. मी नेहमीच माणसं जोडण्यासाठी प्रयत्न करतो. राजकारणात जनतेच्या विश्‍वासला तडा जाईल, असे एकही कृत्य माझ्या हातून घडलेले नाही आणि घडणारही नाही.

प्रश्न : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असल्याचे त्याचा परिणाम उद्योगावरही होत आहे. त्यावर काही ठोस उपाय शोधता येतील काय ?आ. शर्मा : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाकडे पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. शहरात आमदार निधीतून ७ पोलिस चौकी बांधून दिल्या होत्या. त्यापैकी आज केवळ एकच पोलिस चौकी सुरु आहे. पोलिस दलातच अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे अकोल्यात पोलिस आयुक्तालय मंजूर करण्याची मागणी केली होती. आता राज्यात भाजपची सत्ता असल्याने पोलिस आयुक्तालयासाठी प्रयत्न करु.