शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

शाळा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:21 IST

शासनाने बाजारपेठ, सिनेमागृह, जलतरण तलाव अशी गर्दीची ठिकाणे सुरू केली आहेत. मग शाळा का नाहीत? शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ...

शासनाने बाजारपेठ, सिनेमागृह, जलतरण तलाव अशी गर्दीची ठिकाणे सुरू केली आहेत. मग शाळा का नाहीत? शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करावी, अशी मागणी करीत शिक्षक समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात येणार आहे.

इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद आहे. काही ठिकाणी शिक्षक उपस्थिती ५० टक्के आहे तर काही ठिकाणी १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती आहे. अनेक सामाजिक संघटना आणि शिक्षण तज्ज्ञ शाळा सुरू करण्याबाबत आग्रही आहेत. विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. परंतु, तथाकथित अनेक समाजसेवक शिक्षकांनाच शाळा नको, अशी गरळ ओकण्यासाठी पुढे सरसावत आहेत; त्यातून शिक्षकांची बदनामी होत आहे. त्यामुळे आता तत्काळ शाळा उघडणे अत्यंत गरजेचे आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाला अनेकदा निवेदने दिली आहेत. परंतु, शासनाने त्याकडे दुर्लक्षच केले. आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आदींच्या माध्यमातून आणि संपर्कातील विविध मान्यवरांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना शीघ्रतेने शाळा सुरू करण्यासाठी विनंती वजा मागणीचे पोस्ट कार्ड पाठविण्यात येणार आहेत.

विद्यार्थी, पालक, शिक्षकांना आवाहन

प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने पोस्ट कार्ड खरेदी करून जास्तीत जास्त पोस्ट कार्ड मुख्यमंत्री महोदयांना पाठवावे. असे आवाहन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय टोहरे, शिक्षक नेते गोपाल सुरे, जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार, जिल्हा सरचिटणीस राजेश देशमुख, कार्याध्यक्ष अरविंद गाडगे आदींनी केले आहे.