शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शाळा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:21 IST

शासनाने बाजारपेठ, सिनेमागृह, जलतरण तलाव अशी गर्दीची ठिकाणे सुरू केली आहेत. मग शाळा का नाहीत? शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ...

शासनाने बाजारपेठ, सिनेमागृह, जलतरण तलाव अशी गर्दीची ठिकाणे सुरू केली आहेत. मग शाळा का नाहीत? शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करावी, अशी मागणी करीत शिक्षक समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात येणार आहे.

इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद आहे. काही ठिकाणी शिक्षक उपस्थिती ५० टक्के आहे तर काही ठिकाणी १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती आहे. अनेक सामाजिक संघटना आणि शिक्षण तज्ज्ञ शाळा सुरू करण्याबाबत आग्रही आहेत. विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. परंतु, तथाकथित अनेक समाजसेवक शिक्षकांनाच शाळा नको, अशी गरळ ओकण्यासाठी पुढे सरसावत आहेत; त्यातून शिक्षकांची बदनामी होत आहे. त्यामुळे आता तत्काळ शाळा उघडणे अत्यंत गरजेचे आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाला अनेकदा निवेदने दिली आहेत. परंतु, शासनाने त्याकडे दुर्लक्षच केले. आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आदींच्या माध्यमातून आणि संपर्कातील विविध मान्यवरांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना शीघ्रतेने शाळा सुरू करण्यासाठी विनंती वजा मागणीचे पोस्ट कार्ड पाठविण्यात येणार आहेत.

विद्यार्थी, पालक, शिक्षकांना आवाहन

प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने पोस्ट कार्ड खरेदी करून जास्तीत जास्त पोस्ट कार्ड मुख्यमंत्री महोदयांना पाठवावे. असे आवाहन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय टोहरे, शिक्षक नेते गोपाल सुरे, जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार, जिल्हा सरचिटणीस राजेश देशमुख, कार्याध्यक्ष अरविंद गाडगे आदींनी केले आहे.