शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूरमध्ये जाऊन उपमुख्यमंत्र्यांची खाऱ्या पाण्याने आंघोळ घालणार!

By आशीष गावंडे | Updated: April 3, 2023 18:01 IST

बाळापूर विधानसभा संघातील बहुतांश भागाचा खारपाणपट्ट्यात समावेश होतो.

अकोला:

जिल्ह्यातील बाळापुर मतदारसंघातील खारपाणपट्ट्यात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरणाऱ्या २२० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नागरिकांना पिण्यासाठी गोड पाणी उपलब्ध नसल्यामुळे येत्या १० एप्रिल पासून अकोला ते नागपूर पर्यंत पायदळ मोर्चा काढून टँकरद्वारे आणलेल्या खाऱ्या पाण्याने उपमुख्यमंत्र्यांची आंघोळ घालणार असल्याची माहिती सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे(ठाकरे गट) जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी दिली.

बाळापूर विधानसभा संघातील बहुतांश भागाचा खारपाणपट्ट्यात समावेश होतो. या भागात गोड पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खारेपाणी प्यावे लागत आहे. गोड पाणी उपलब्ध नसल्यामुळे ६९ गावांमधील नागरिकांना किडनीचे विकार जडले असून त्यातच अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तेल्हारा तालुक्यातील वान धरणातून ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देत २२० कोटी रुपये मंजूर केले होते, अशी माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली. 

वर्तमान स्थितीत पाणीपुरवठा योजनेचे जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली. ही स्थगिती उठविण्यासाठी मी स्वतः अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय आमरण उपोषण छेडले होते. त्या उपोषणाची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याआधी पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती उठविणार असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार देशमुख यांनी यावेळी दिली. परंतु अधिवेशन संपल्यानंतरही उपमुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती हटविली नसल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, तालुका प्रमुख विकास पागृत, शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (अकोला पूर्व) राहुल कराळे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शरद तुरकर, गजानन चव्हाण, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, संजय अग्रवाल, सोनू भरकर, राजदीप टोहरे, अमित भिरड यांसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. 

२४० किलोमीटर चालणार पायी! खारपाणपट्ट्यातील नागरिकांसाठी पाण्याची नितांत गरज लक्षात घेता अकोला ते नागपूर २४० किमीचा प्रवास पायी करणार आहे. मोर्चामध्ये खारे पाणी भरलेल्या एका टँकरचा समावेश राहील. या टँकर मधील पाणी उपमुख्यमंत्र्यांनी पिऊन दाखवावे, अन्यथा त्यांना खाऱ्या पाण्याने आंघोळ घालण्याचा इशारा आमदार देशमुख यांनी दिला. 

पाण्यापासून वंचित ठेवणे म्हणजे हिंदुत्व आहे का? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील नऊ महिन्यांपासून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सर्वसामान्य जनतेला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवणे म्हणजे हेच भाजपाचे हिंदुत्व आहे का?, त्या भागातील सर्वधर्मीय नागरिक भारतीय नाहीत का?, असा सवाल आमदार देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला. 

अकोलेकरांच्याही पाणी आरक्षणाला स्थगितीशहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या ध्यानात घेता महापालिका प्रशासनाने वाण धरणातून अकोलेकरांसाठी २४ दलघमी पाण्याचे आरक्षण निश्चित केले होते. या आरक्षणाला राज्य शासनाने मंजुरी दिली होती. या आरक्षणावरही भाजप लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. सरकारने ही स्थगिती न हटविल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.