शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये जाऊन उपमुख्यमंत्र्यांची खाऱ्या पाण्याने आंघोळ घालणार!

By आशीष गावंडे | Updated: April 3, 2023 18:01 IST

बाळापूर विधानसभा संघातील बहुतांश भागाचा खारपाणपट्ट्यात समावेश होतो.

अकोला:

जिल्ह्यातील बाळापुर मतदारसंघातील खारपाणपट्ट्यात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरणाऱ्या २२० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नागरिकांना पिण्यासाठी गोड पाणी उपलब्ध नसल्यामुळे येत्या १० एप्रिल पासून अकोला ते नागपूर पर्यंत पायदळ मोर्चा काढून टँकरद्वारे आणलेल्या खाऱ्या पाण्याने उपमुख्यमंत्र्यांची आंघोळ घालणार असल्याची माहिती सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे(ठाकरे गट) जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी दिली.

बाळापूर विधानसभा संघातील बहुतांश भागाचा खारपाणपट्ट्यात समावेश होतो. या भागात गोड पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खारेपाणी प्यावे लागत आहे. गोड पाणी उपलब्ध नसल्यामुळे ६९ गावांमधील नागरिकांना किडनीचे विकार जडले असून त्यातच अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तेल्हारा तालुक्यातील वान धरणातून ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देत २२० कोटी रुपये मंजूर केले होते, अशी माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली. 

वर्तमान स्थितीत पाणीपुरवठा योजनेचे जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली. ही स्थगिती उठविण्यासाठी मी स्वतः अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय आमरण उपोषण छेडले होते. त्या उपोषणाची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याआधी पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती उठविणार असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार देशमुख यांनी यावेळी दिली. परंतु अधिवेशन संपल्यानंतरही उपमुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती हटविली नसल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, तालुका प्रमुख विकास पागृत, शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (अकोला पूर्व) राहुल कराळे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शरद तुरकर, गजानन चव्हाण, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, संजय अग्रवाल, सोनू भरकर, राजदीप टोहरे, अमित भिरड यांसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. 

२४० किलोमीटर चालणार पायी! खारपाणपट्ट्यातील नागरिकांसाठी पाण्याची नितांत गरज लक्षात घेता अकोला ते नागपूर २४० किमीचा प्रवास पायी करणार आहे. मोर्चामध्ये खारे पाणी भरलेल्या एका टँकरचा समावेश राहील. या टँकर मधील पाणी उपमुख्यमंत्र्यांनी पिऊन दाखवावे, अन्यथा त्यांना खाऱ्या पाण्याने आंघोळ घालण्याचा इशारा आमदार देशमुख यांनी दिला. 

पाण्यापासून वंचित ठेवणे म्हणजे हिंदुत्व आहे का? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील नऊ महिन्यांपासून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सर्वसामान्य जनतेला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवणे म्हणजे हेच भाजपाचे हिंदुत्व आहे का?, त्या भागातील सर्वधर्मीय नागरिक भारतीय नाहीत का?, असा सवाल आमदार देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला. 

अकोलेकरांच्याही पाणी आरक्षणाला स्थगितीशहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या ध्यानात घेता महापालिका प्रशासनाने वाण धरणातून अकोलेकरांसाठी २४ दलघमी पाण्याचे आरक्षण निश्चित केले होते. या आरक्षणाला राज्य शासनाने मंजुरी दिली होती. या आरक्षणावरही भाजप लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. सरकारने ही स्थगिती न हटविल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.