शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

गरज पडल्यास चौकटीबाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार - कृषी मंत्री दादाजी भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:23 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेती दिन व चर्चासत्रात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तळागाळातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शेतकरीभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून, गरज पडल्यास नियमाच्या काही चौकटीबाहेर जाऊन शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी दिली.जिल्ह्यातील अकोला तालुक्यात घुसर येथे आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेती दिन व चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, पवन बुटे, पंचायत समिती सदस्य बाळू गव्हाळे, घुसरच्या सरपंच निर्मला गवळी, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे विषय तज्ज्ञ रफीक नाईकवाडी, कीटकशास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त ठिपसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी, तहसीलदार विजय लोखंडे व तालुका कृषी अधिकारी शलाका सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. खारपाणपट्ट्यातील शेतकºयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली.शेतकºयांना पीक कर्ज, नाला खोलीकरण, मत्स्य शेती, तलावांचे पुनर्भरण इत्यादी कामांसंदर्भात खारपाणपट्ट्यातील शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचेही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार कृषी पर्यवेक्षक एन. डी. वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला घुसर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.महिला मजुरांच्या जाणून घेतल्या समस्या!नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत घुसर येथील शेतकरी नंदलाल डहाके यांच्या शेतातील हरभरा पिकाच्या बीजोत्पादन क्षेत्राला कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच तात्याराव चोपडे यांच्या शेतात कीड नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या कामगंध सापळ्यांची पाहणी त्यांनी केली. वाकी येथील शेतकरी कैलास गोटे यांच्या शेतात कापूस वेचणी करणाºया महिला मजुरांसोबत कृषी मंत्र्यांनी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दोन लाखांवरील थकीत कर्जासंदर्भात अहवाल लवकरच शासनाकडे!शेतकºयांचे दोन लाख रुपयांवरील थकीत कर्ज आणि नियमित कर्ज माफ करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी शासनामार्फत उपसमिती नेमण्यात आली असून, या उपसमितीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर यासंदर्भात शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती