शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गरज पडल्यास चौकटीबाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार - कृषी मंत्री दादाजी भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:23 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेती दिन व चर्चासत्रात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तळागाळातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शेतकरीभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून, गरज पडल्यास नियमाच्या काही चौकटीबाहेर जाऊन शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी दिली.जिल्ह्यातील अकोला तालुक्यात घुसर येथे आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेती दिन व चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, पवन बुटे, पंचायत समिती सदस्य बाळू गव्हाळे, घुसरच्या सरपंच निर्मला गवळी, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे विषय तज्ज्ञ रफीक नाईकवाडी, कीटकशास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त ठिपसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी, तहसीलदार विजय लोखंडे व तालुका कृषी अधिकारी शलाका सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. खारपाणपट्ट्यातील शेतकºयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली.शेतकºयांना पीक कर्ज, नाला खोलीकरण, मत्स्य शेती, तलावांचे पुनर्भरण इत्यादी कामांसंदर्भात खारपाणपट्ट्यातील शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचेही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार कृषी पर्यवेक्षक एन. डी. वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला घुसर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.महिला मजुरांच्या जाणून घेतल्या समस्या!नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत घुसर येथील शेतकरी नंदलाल डहाके यांच्या शेतातील हरभरा पिकाच्या बीजोत्पादन क्षेत्राला कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच तात्याराव चोपडे यांच्या शेतात कीड नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या कामगंध सापळ्यांची पाहणी त्यांनी केली. वाकी येथील शेतकरी कैलास गोटे यांच्या शेतात कापूस वेचणी करणाºया महिला मजुरांसोबत कृषी मंत्र्यांनी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दोन लाखांवरील थकीत कर्जासंदर्भात अहवाल लवकरच शासनाकडे!शेतकºयांचे दोन लाख रुपयांवरील थकीत कर्ज आणि नियमित कर्ज माफ करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी शासनामार्फत उपसमिती नेमण्यात आली असून, या उपसमितीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर यासंदर्भात शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती