शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

पावसाळ्यापूर्वी कापसाची खरेदी होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 16:45 IST

कापूस खरेदी केंद्रावर २० तर जिनिगंमध्ये केवळ १० गाड्या कापूस खरेदी केला जात आहे.

अकोला: शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने राज्यात कापूस खरेदी करण्याची भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळ ,आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाला परवानगी देण्यात आली आहे. परंतु कापूस खरेदी केंद्रावर २० तर जिनिगंमध्ये केवळ १० गाड्या कापूस खरेदी केला जात आहे. यात सिसीआयने जिनिगमध्ये नेमलेले अधिकारी आणि व्यापारी यांच्यात संगनमत असल्याचा आरोप होत आहे.मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या काळात लोकडाऊन मूळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले ते कमी करावे व पावसाळ्या पूर्वी त्यांच्या हातात कापसाची व इतर पिकांची रक्कम मिळावी आणि पुढचे पीक सुरळीत घेता यावे या हेतूने शेतमाल खरेदीचा निर्णय घेतला. या निर्णया नुसार एपीएमसी ने सीसीआयला ला कापूस खरेदी करण्यास सांगितले. या संदर्भात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जीनिंग प्रतिनिधीनी कापूस केंद्र सुरू करण्याची तयारी दर्शवली त्यावेळी पण सीसीआय च्या अधिकाºयांनी जीनिंग सुरू करू शकत नाही असे जिनिग संचालकाकडून लेखी स्वरूपात मागितले होते. त्याच वेळेस शेतकºयांच्या हिताच्या राज्य सरकारच्या धोरणाच्या अमंबाजावणीत टाळाटाळ का होते ? यात शेतकºयांचे नुकसान करण्याचा भाग आहे का ? ही शंका आली घेण्यात आली तथापि जिनिंग चालवण्यास समर्थ असल्याचे जिनिग प्रतिनिधींनी मागणी केल्यानंतर जिल्'ात तीन जिनिंग सुरू करण्यात आल्या आहेत. सुरवातीला या जिनिंगवर किमान २५ ते ३० गाड्या कापूस उतरवून घेतल्या जात होता. पण काही अधिकारी व व्यापारी वर्ग यांच्या संगनमताने जिनिंग वर आता केवळ १० च कापसाचे वाहन उतरवून घेण्याचा निर्णय सीसीआय च्या अधिकाºयांनी व्यक्तिगत स्तरावर घेतला असून, हा निर्णय त्यांनी दूरध्वनी वरून जिनिग प्रतिनिधींना कळविला आहे. पणन संचलनालयाच्या परिपत्रकानुसार कमाल २० कापसाची वहाने उतरवता येतात. त्यामुळे यातत्यांचे काही इतर हितसंबंध गुंतले आहेत का ? असा आरोप होत आहे. अकोला जिल्'ात जवळपास ३०ते ४०शे टक्के कापूस शेतकºयाकडे आहे.म्हणूनच कापूस विक्रीसाठी शेतकरी जिनिगकडे चौकशी करत आहेत. सध्यस्थीत शेतकरÞयांना त्यांचा कापूस खरेदी होण्याची अत्यंत निकड आहे. अकोल्यात खूप कमी जीनिंग चालू आहेत. एका महिन्यात पावसाळा सुरू होईल. सध्या शेतकºयांच्या हातात पैसा आला तरच पुढची कामे सुरू होतील. या पार्श्वभूमीवर सीसीआयचे देसले यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय बदलावा आणि शेतकºयांच्या सहकारी संस्थेला पूर्ण क्षमतेने काम करू देण्याची गरज आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांना पत्र देण्यात आले आहे.

  व्यापारी - अधिकाºयाचे संगनमत?-शेतकºयांकडे ३० ते ४० टक्के कापूस विकण्यासाठी पडून आहे. परंतु खरेदी केद्रावर अत्यल्प कापूस खरेदी केली जात आहे.समोर पावसाळा असल्याने ज्यांच्या कडे ठेवण्याची जागा नाही आणि कृषी निविष्ठा खरेदी साठी पैशाची गरज आहे.त्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही.खरेदी केंद्रावर नंबर लागत नसल्याने हे शेतकरी व्यापाºयाना कापूस विकत आहेत. याच मुळे व्यापारी आणि खरेदी केंद्रावरील अधिकारी यांचे संगनमत तर नाहीना असा आरोप होत आहे.जिनिग ला कापूस गाडया दररोज ५० गाड्या खरेदीची परवानगी दिली तरच शेतकरÞयाना हमी दर मिळतील. अन्यथा व्यापाºयांना कमी दरात म्हणजे ८०० ते ९०० रुपये कमी दराने कापूस विकण्याची वेळ शेतकत्यांवर आली आहे.

 एपीएमसी त ५,२४३ शेतकºयाची नोंदणी:खरेदी केव्हा होणार!अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ५ हजार २४३ कापूस उत्पादक शेतकºयांनी कापूस विकण्यासाठी नोंदणी केली आहे. पण येथे दररोज २० गाडया म्हणजे कापूस खरेदीला खूप दिवस लागतील. आता या परिस्थितीत कापूस ठेवण्याची सहनशीलता शेतकºयाकडे नाही. हे विशेष म्हणजे शेवटी व्यापाºयांना कापूस विकावा लागणार असल्याचे शेतकºयाचे म्हणणे आहे.

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसFarmerशेतकरी