शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बेताल वक्तव्याचा हिशेब चुकता करण्याची संधी भाजप घेईल का?

By राजेश शेगोकार | Updated: August 26, 2021 10:43 IST

BJP Akola : भूमिका घेण्याची जबाबदारी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्यावर देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले

ठळक मुद्देआ. देशमुखांचे आंदाेलनात राणेंबद्दल अनुदगार बावनकुळे म्हणतात सावरकर बाजू तपासतील

-  राजेश शेगाेकार

अकाेला : नारायण राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने रंगलेल्या राजकीय नाट्यात मंगळवारी अकाेल्यात झालेल्या आंदाेलनात शिवसेनेेचे आमदार व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी नारायण राणे यांच्यावर चांगलेच ताेंडसुख घेतले. दरम्यान, यासंदर्भात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता कायदेशीर बाजू तपासून भूमिका घेण्याची जबाबदारी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्यावर देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे बेताल वक्तव्याचा हिशेब चुकता करण्याची संधी भाजप घेईल का? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या बेताल वक्तव्याबाबत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे राज्यभरात चांगलेच राजकारण तापले असून, शिवसेना व भाजप हे दाेन्ही पक्ष रस्त्यावर आले आहेत. शिवसेनेेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हे आमदार झाल्यापासून अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात संख्येने मजबूत असलेल्या भाजपाला थेट शिंगावर घेण्याची भूमिका घेतली आहे. जिल्हा नियाेजन समितीमधील निधीची फिरवाफिरव असाे की महानगरपालिकेतील भाजपाचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी आपल्या शिलेदारांना दिलेले पाठबळ असाे. आ. देशमुखांनी भाजपाला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडलेली नाही. त्यांच्या हा आक्रमकपणा मंगळवारी सेनेने काढलेल्या माेर्चातही चांगलाच समाेर आला. त्यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या भाषेत ताेंडसुख घेतले. राणे यांच्या उंचीपासून तर थेट त्यांना प्राण्याची उपमा देण्यापर्यंत ते आक्रमक हाेते. आंदाेलनात त्यांनी काढलेले अनुद्गार आता चांगलेच व्हायरल झाले आहे. एकीकडे राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विराेधात केलेल्या वक्तव्यावरून थेट अटक करून कायदेशीर मार्ग स्वीकारल्याचे शिवसेनेने प्रथम दर्शनी दाखवून दिले आहे, त्यामुळे आता इतर पक्षांसाठी हाच मार्ग खुला झाला आहे. बुधवारी भाजपाचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबतच छेडले असता त्यांनी सदर विधाने तपासून रीतसरपणे कायदेशीर सल्ला घेण्यात आल्यावर कारवाई केली जाईल, त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर पुढाकार घेतील, असे स्पष्ट केल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून आ. रणधीर सावरकर यांची जबाबदारी वाढली आहे. आ. सावरकर हे सध्या अकाेल्यातील भाजपाचा आक्रमक चेहरा आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यात पक्षबांधणी करताना ते सामान्य कार्यकर्त्यांसाठी काेणत्याही सरकारी अधिकाऱ्यासाेबत थेट भिडतात. त्यामुळे त्यांचा आक्रमकपणा सेनेच्या बाबतीत कितपत प्रखर हाेताे, यावर पुढचे राजकारण रंगणार आहे. राजकारणात टीका करताना अनेकांचा ताेल सुटल्याची उदाहरणे आहेत. मात्र, अशा वक्तव्याबाबत थेट अटकेची कारवाई करण्याची सुरुवात सेनेने केली असल्याचे विधान भाजपाच्या सर्वच नेत्यांकडून प्रसारित हाेत आहे. त्यामुळे सेनेच्या कारवाईचा हिशेब अकाेल्यात चुकता करण्याची संधी भाजपा घेईल का? हा प्रश्न या निमित्ताने समाेर आला आहे.

युतीची शक्यता धूसरच

गेल्या विधानसभा निवडणुकी भाजप शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवत अकाेल्यात शतप्रतिशत यश मिळविले. पाचपैकी चार मतदारसंघ भाजपाने तर एक शिवसेनेने जिंकला. युतीची एकत्रित मते विभाजित न झाल्याचा फायदा भाजप, सेना या दाेन्ही पक्षांना झाला. मात्र, महाविकास आघाडीच्या निमित्ताने या दाेन पक्षांतील मतभेद वाढतच गेले असले तरी सामान्य कार्यकर्त्यांना युती हाेईल, असे वाटत हाेते. राणे प्रकरणानंतर आता सेना-भाजपातील दरी आणखी रुंदावली असून, या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याची संधी दाेन्ही पक्ष साेडणार नाहीत. त्यामुळे युतीची शक्यता आता धूसरच असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेNitin Deshmukhनितीन देशमुखRandhir Savarkarरणधीर सावरकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा