शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

वन्यप्राण्यांची शिकार, अवैध व्यापार रोखणे मोठे आव्हान - यादव तरटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 18:28 IST

नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

अकोला : वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी विविध कायदे असले, तरी शिकारीच्या घटना समोर येतात. वन्यप्राण्यांची शिकार व अवैध व्यापार थांबविणे हे मोठे आव्हान असल्याचे मान्य करीत यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.प्र. - राज्य वन्य जीव मंडळाचे काम कसे चालते, उद्देश काय.?- महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्प, पाच राष्ट्रीय उद्याने, ४९ अभयारण्य व ५ संवर्धन राखीव क्षेत्राच्या संरक्षणासंदर्भात धोरणात्मक निर्णय, वन्यजीव प्रकल्पांना मंजुरी, वन्यजीव उपशमन उपाय आणि नवीन संरक्षित क्षेत्राच्या सूचनेची शिफारस तसेच वन्यजीव क्षेत्रातील प्रमुख संशोधन प्रकल्पावर निर्णय व सल्ला देण्याचे काम महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ करते.

प्र. - अभयारण्यांचे संरक्षण करताना पुर्नवसन झालेली गावे पुन्हा एकदा अभयारण्याच्या दिशेने जाताना दिसतात अशा वेळी वन्य जीव मंडळाची भूमिका काय.?

- अश्यावेळी स्थानिक प्रशासनाची भूमिका यामध्ये अतिशय महत्वाची असते. कायदा, नियम व शासन निर्णयानुसार कामकाज अपेक्षित आहे. राज्य वन्यजीव मंडळ धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात. मात्र अंमलबजावणी स्थानिक यंत्रणेला करावयाची आहे.

प्र. - विदर्भातील वन पर्यटन वाढण्यासाठी आपण काही उपाय सुचवाल ?- नक्कीच, एकट्या विदर्भात ५ व्याघ्र प्रकल्प, ४ राष्ट्रीय उद्याने व ३५ अभयारण्य आहेत. वन पर्यटनातून रोजगार निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मंडळाचे नुकतेच गठन झाले आहे. येणाऱ्या काळात याबाबत त्या दृष्टीने चर्चा अपेक्षित आहे.

प्र. - वन्य प्राण्याच्या अवैध शिकारीचे प्रमाण वाढले आहे? याला जबाबदार कोण?- वन्यप्राणी शिकार व त्यांच्या अवैध व्यापार रोखणे हे नेहमीच एक आव्हान राहिले आहे. व्याघ व इतर वन्यप्राणी तसेच पक्ष्यांची शिकार कायद्याने गुन्हा जरी असला तरीही अनेक ठिकाणी शिकारीचे प्रकार उघडकीस येतच आहेत. शिकार व अवैध व्यापार रोखणे ही कायद्याने वन विभागाची जबाबदारी असली तरीही नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही. वन विभाग आणि वन्यजीव प्रेमी यामध्ये पुढकार घेतात. सामान्य नागरिकांनी यामध्ये १९२६ या हेल्पलाईनच्या माध्यमातून माहिती द्यावी. यामध्ये नाव गुप्त ठेवल्या जाते.प्र. वन्य प्राण्यांकडून शेतीचे होणारे नुकसान व त्याचा मोबदला हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. याबाबत काही धोरण ठरविता येईल का?आपण कोणती शिफारस कराल.?

- वन्यप्राणी व शेतपिक नुकसान हा गंभीर प्रश्न आहे. शेतपिक नुकसानीमुळे हवालदिल शेतकरी, मिळणारा मोबदला व स्थानिक प्रशासनाची होणारी दमछाक हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सध्या वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय स्तरावर याबाबत अडचणी आहेत. शेतपिक नुकसान दाव्यांची वाढती संख्या, त्यांचे पंचनामे, अपुरे कर्मचारी व शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला याबाबतत उपयोजना होणे आवश्यक आहे. वन्यप्राणी, शेतकरी व स्थानिक वन प्रशासन या अनुषंगाने चित्र समाधानकारक होण्याचे दृष्टीने सखोल अभ्यासाअंती सभेत विषय मांडल्या जाईल.

टॅग्स :Akolaअकोलाwildlifeवन्यजीवinterviewमुलाखत