शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

वन्यप्राण्यांची लोकवस्तीत धाव

By admin | Updated: May 12, 2014 19:55 IST

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने जंगलातील वन्यप्राणी आता गावाकडे धाव घेत आहेत.

मूर्तिजापूर : उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने जंगलातील वन्यप्राणी आता गावाकडे धाव घेत आहेत. रानडुकरं, माकडं, हरिणांचे कळप, मोर, यासह विविध प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे येत आहेत. जंगलातील पाण्याचे स्त्रोत बंद पडले आहेत. पाण्याच्या शोधात गावाकडे भटकंती करणार्‍या जनावरांचा जीव धोक्यात पडतो. तर गावातील जनावरांनासुद्धा वन्यप्राण्यांपासून धोका असतो. यामुळे शिकारीच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे.पाण्याच्या शोधात येणारे वन्यप्राणी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ओलांडत असतात. त्यामुळे नेहमीच वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटना घडतात; पण वन विभागाच्या कार्यालयाला याची माहिती नसते. अनेकदा लहान-मोठे प्राणी रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे दिपतात व अपघात होतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. वनात लागलेल्या आगीमुळे बहुतेक प्राणी सैरावैरा पळताना दिसतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.