शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

रानडुकरांचा उच्छाद; हरभरा उगवण्यापूर्वीच ‘खल्लास’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:32 IST

हरभरा पेरणी झालेल्या शेतांमध्ये रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर जिल्ह्यात रब्बी हंगामातील हरभरा पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे; मात्र रानडुकरांच्या उच्छादात पेरलेला हरभरा उगवण्यापूर्वीच ‘खल्लास’ होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी, कपाशी इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन अवकाळी पावसाने पळविल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे; परंतु हरभरा पेरणी झालेल्या शेतांमध्ये रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. पेरलेला हरभरा उगवण्यापूर्वीच रानडुकरांचे कळप हरभरा बियाणे उखरुन फस्त करीत आहेत. पेरलेला हरभरा उगवण्याआधीच रानडुकरांच्या उच्छादात खल्लास होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.

जीव धोक्यात टाकून शेतकºयांचे जागरण !हरभरा पेरणी झालेल्या शेतांमध्ये प्रामुख्याने रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप उच्छाद मांडून पेरलेला हरभरा उखरुन फस्त करतात. त्यामुळे रानडुकरांच्या तडाख्यातून हरभरा वाचविण्यासाठी जीव धोक्यात टाकून जिल्ह्यात शेतकºयांना राजीच्या वेळी शेतांमध्ये जागरण करावे लागत आहे.

कुटार पेटवून, डबे वाजवून डुकरांना पळविण्याचे प्रयत्न !पेरलेला हरभरा रानडुकरांच्या तावडीतून वाचविण्यासाठी रात्रीच्या वेळी सामूहिकपणे शेतकºयांना शेतात जागरण करावे लागत आहे. शेताच्या धुºयावर कुटार आाणि काडीकचरा पेटवून तसेच डबे वाजवून शेतात येणाºया रानडुकरांना पळविण्याचे प्रयत्न शेतकºयांकडून करण्यात येत आहेत.अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाले आहे. त्यानंतर रब्बी हंगामात शेतात पेरलेला हरभरा उगवण्यापूर्वीच रानडुकरांकडून फस्त करण्यात येत असल्याने, दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतात पेरलेला हरभरा रानडुकरांपासून वाचविण्यासाठी जीव धोक्यात टाकून शेतकºयांना रात्रीच्यावेळी शेतात जागरण करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांच्या शेतीला सामूहिकरीत्या संरक्षक कंपाउंड देण्याची उपाययोजना केली पाहिजे.-शिवाजीराव भरणे, शेतकरी,रामगाव, ता.अकोला.

११ एकर शेतात पेरलेला हरभरा उगवण्याआधीच रानडुकरांनी फस्त केला आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यानुषंगाने रानडुकरांमुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.-सचिन गावंडेशेतकरी, केळीवेळी, ता.अकोट.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी