शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अपघातप्रवण स्थळ दर्शविणारे फलक गेले कोठे?

By admin | Updated: May 12, 2014 22:33 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र .६ वर अपघातांच्या संख्येत वाढ

बाभुळगाव जहागीर: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अकोला ते मूर्तिजापूरदरम्यान अनेक अपघातप्रवण स्थळे असून, या ठिकाणी बरेच अपघात घडून अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. ही अपघातप्रवण स्थळे दर्शविण्यासाठी फलकही लावण्यात आले होते; परंतु गत काही महिन्यांपासून असे अनेक फलक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून दिसेनासे झाले आहेत, तर काही फलकच अपघातग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सुरत-कोलकाता या १९४९ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर हे तीन जिल्हे येतात. अक ोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोला, बोरगाव मंजू, कुरणखेड, मूर्तिजापूर ही महत्त्वाची शहरे या मार्गावर आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर गत काही महिन्यांत अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर ते अकोलादरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांना आपले अवयवही गमवावे लागले आहेत. या रस्त्यावर अनेक अपघातप्रवण स्थळ आहेत. त्याची माहिती दर्शविणारे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले होते; परंतु त्यातील बरेचशे फलकच अपघातग्रस्त झाले, तर अनेक फलक दिसेनासे झाले आहेत. या महामार्गावर अनेक ठिकाणी कठडे नसलेले पूल असून, वाहनचालकांना त्याची सूचना देणारे फलकही लावण्यात आलेले नाहीत. काही वळणरस्त्यावरही फ लक नाहीत. त्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, संबंधित विभागाकडून त्याची थोडीही दखल घेण्यात आल्याचे दिसत नाही. अकोला शहरालगत असलेल्या बाभुळगाव जहागीरनजीकच्या शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असलेल्या धोक्याच्या वळणावर त्याची सूचना देणारा फलक नाही. मूर्तिजापूर शहराच्या जवळ असलेल्या वणीरंभापूर येथील कुष्टधामनजीक धोक्याच्या वळणावरील फलकही गायब झाला आहे. महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी याची गंभीर दखल घेऊन नादुरुस्त असलेल्या फलकांची दुरुस्ती करावी आणि आवश्यक ठिकाणी फलक लावून अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी वाहनधारक आणि जनतेकडून करण्यात येत आहे.