शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

अपघातप्रवण स्थळ दर्शविणारे फलक गेले कोठे?

By admin | Updated: May 12, 2014 22:33 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र .६ वर अपघातांच्या संख्येत वाढ

बाभुळगाव जहागीर: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अकोला ते मूर्तिजापूरदरम्यान अनेक अपघातप्रवण स्थळे असून, या ठिकाणी बरेच अपघात घडून अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. ही अपघातप्रवण स्थळे दर्शविण्यासाठी फलकही लावण्यात आले होते; परंतु गत काही महिन्यांपासून असे अनेक फलक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून दिसेनासे झाले आहेत, तर काही फलकच अपघातग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सुरत-कोलकाता या १९४९ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर हे तीन जिल्हे येतात. अक ोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोला, बोरगाव मंजू, कुरणखेड, मूर्तिजापूर ही महत्त्वाची शहरे या मार्गावर आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर गत काही महिन्यांत अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर ते अकोलादरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांना आपले अवयवही गमवावे लागले आहेत. या रस्त्यावर अनेक अपघातप्रवण स्थळ आहेत. त्याची माहिती दर्शविणारे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले होते; परंतु त्यातील बरेचशे फलकच अपघातग्रस्त झाले, तर अनेक फलक दिसेनासे झाले आहेत. या महामार्गावर अनेक ठिकाणी कठडे नसलेले पूल असून, वाहनचालकांना त्याची सूचना देणारे फलकही लावण्यात आलेले नाहीत. काही वळणरस्त्यावरही फ लक नाहीत. त्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, संबंधित विभागाकडून त्याची थोडीही दखल घेण्यात आल्याचे दिसत नाही. अकोला शहरालगत असलेल्या बाभुळगाव जहागीरनजीकच्या शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असलेल्या धोक्याच्या वळणावर त्याची सूचना देणारा फलक नाही. मूर्तिजापूर शहराच्या जवळ असलेल्या वणीरंभापूर येथील कुष्टधामनजीक धोक्याच्या वळणावरील फलकही गायब झाला आहे. महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी याची गंभीर दखल घेऊन नादुरुस्त असलेल्या फलकांची दुरुस्ती करावी आणि आवश्यक ठिकाणी फलक लावून अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी वाहनधारक आणि जनतेकडून करण्यात येत आहे.