शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

आकोटमधील पालकांना न्याय मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 02:02 IST

शोषखड्डय़ात बालकांचा बुडून मृत्यू प्रकरण : अकोल्याचा न्याय आकोटला नाही !

विजय शिंदे आकोट, दि १७: आकोट रेल्वे स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पाण्याच्या शोषखड्डय़ात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आकोट रेल्वे स्टेशनचे प्रबंधक व इतर जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध आकोट शहर पोलिसात २१ जुलै रोजी पालकांनी तक्रार दाखल केली आहे; परंतु याप्रकरणी महिना झाला, अद्याप कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर दुसरीकडे आकोला येथे शोषखड्डय़ात दोन बालकांचा बुडून झालेल्या मृत्युप्रकरणी पालिका आयुक्तासह दोषीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकाच जिल्ह्यातील दोन वेगवेगळय़ा पोलीस स्टेशनमध्ये एकाच प्रकारचे साम्य असलेल्या घटनांवरून पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केल्या जात आहे. रेल्वे स्टेशनच्या वसाहतीजवळ असलेल्या पाण्याच्या शोषखड्ड्यात १९ जुलै रोजी विराज संजय देशमुख व हितेश सुनील जेस्वाणी या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये पालक सुनील कन्हैयालाल जेस्वाणी व संजय पंजाबराव देशमुख यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार मुलांच्या मृत्यूस जबाबदार असलेले स्टेशन प्रबंधक आकोट रेल्वे स्टेशन, कंत्राटदार व अन्य संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. आकोट शहर पोलिसांनी सदर तक्रार स्वीकृत केली; परंतु अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही, तर अकोला येथील महापालिकेच्या शाळा मैदानावर खोदण्यात आलेल्या शोषखड्डय़ात सिद्धार्थ धनगावकर व कृष्णा बहेल या दोन बालकांचा १४ ऑगस्ट रोजी बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाची पालकाने तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी करून खदान पोलीस स्टेशनला मनपा आयुक्त अजय लहाने, जलवर्धन संस्था, अभियंता व कंत्राटदार यांच्याविरुद्ध भादंवि ३0४ अ आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकोट व अकोला या दोन्ही ठिकाणी शोषखड्डय़ात बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सारखीच आहे. दोन्ही ठिकाणी दुर्लक्ष केल्याने संबंधित बालकांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेले आहेत; मात्र आकोट पोलिसांनी सदर बालकांच्या मृत्युची तक्रार गंभीरतेने घेतली नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभागातील दोन पोलीस स्टेशनमधील या कारवाईवरून सर्वसामान्य नागरिकांत मात्र कुतूहलाचा विषय ठरत आहे. त्यामुळे आकोट येथील बालकांच्या मृत्यूप्रकरणी पालक मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.