शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

उद्योगांची चाके अद्यापही रुतलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 10:54 IST

Akola MIDC वर्षभरात जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्राला मोठी हानी सहन करावी लागली.

अकोला : लाॅकडाऊनने जिल्ह्यातील उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. कच्चा माल, यंत्रांचे सुटे भाग, कामगार नसल्याने उद्योगक्षेत्राला कोट्यवधींचे नुकसान झाले. लॉकडाऊनला वर्ष पूर्ण होऊनही उद्योगांची चाके रुतलेलीच असून अद्यापही आर्थिक तोट्यातून व्यवसाय उभरला नाही. मार्च २०२१ मध्ये लॉकडाऊनची वर्षपूर्ती होत असताना, कोरोनाच्या वेदनादायी आठवणींबरोबरच नव्याने सुरू झालेल्या कोरोनाच्या उद्रेकाने समाजमन चिंतित झाले आहे. वर्षभरात जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्राला मोठी हानी सहन करावी लागली. अकोला जिल्ह्यात ७०० ते ८०० मोठे, मध्यम व लघुउद्योग आहेत. त्यांपैकी ५० टक्के उद्योग कृषी आधारित आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या उद्योगांमध्ये हजारो मजूर काम करतात. लॉकडाऊनमुळे ६० टक्के मजूर बाहेरगावी अडकून पडले होते. वाहतूक व्यवस्था खोळंबल्याने उद्योगांना कच्चा माल पुरवठा, उत्पादनांचा पुरवठा, पॅकेजिंग, मटेरिअल, यंत्रांचे सुटे भाग मिळणे कठीण झाले होते. मजुरांच्या अभावाने कामाची वेळही कमी झाली. त्यामुळे उत्पादन निर्मिती अर्ध्यावर आली होती. या समस्यांमुळे प्रशासनाची मंजुरी मिळूनही ६० टक्के उद्योग बंद होते. वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा फटका येथील उद्योगांना बसला आहे. हे नुकसान भरून निघायला अजून बराच कालावधी लागणार आहे.

  

उद्योगांची आर्थिक अडचण

लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेले उद्योग वर्षभरानंतरही आर्थिक अडचणीमुळे बंद आहेत. जवळपास सर्वच उद्योग ५० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत.

 

केवळ २० टक्के वाढीव कर्जाचा दिलासा

उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी शासनाकडून केवळ २० टक्के वाढीव कर्ज देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केल्या गेला; मात्र इतर कुठलेही कर्ज माफ, व्याज माफ अथवा करामध्ये सूट दिली नसल्याने उद्योजकांमध्ये नाराजी आहे.

 

उद्योजकांची आर्थिक हानी भरून निघालेली नाही. अद्यापही उद्योग पूर्ववत सुरू झालेले नाहीत. मध्यंतरी उद्योगाला चालना मिळत असताना पुन्हा लॉकडाऊन झाल्याने आर्थिक नुकसान भरून निघायला वेळ लागेल.

- उन्मेष मालू, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळAkolaअकोला