शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

उद्योगांची चाके अद्यापही रुतलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 10:54 IST

Akola MIDC वर्षभरात जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्राला मोठी हानी सहन करावी लागली.

अकोला : लाॅकडाऊनने जिल्ह्यातील उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. कच्चा माल, यंत्रांचे सुटे भाग, कामगार नसल्याने उद्योगक्षेत्राला कोट्यवधींचे नुकसान झाले. लॉकडाऊनला वर्ष पूर्ण होऊनही उद्योगांची चाके रुतलेलीच असून अद्यापही आर्थिक तोट्यातून व्यवसाय उभरला नाही. मार्च २०२१ मध्ये लॉकडाऊनची वर्षपूर्ती होत असताना, कोरोनाच्या वेदनादायी आठवणींबरोबरच नव्याने सुरू झालेल्या कोरोनाच्या उद्रेकाने समाजमन चिंतित झाले आहे. वर्षभरात जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्राला मोठी हानी सहन करावी लागली. अकोला जिल्ह्यात ७०० ते ८०० मोठे, मध्यम व लघुउद्योग आहेत. त्यांपैकी ५० टक्के उद्योग कृषी आधारित आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या उद्योगांमध्ये हजारो मजूर काम करतात. लॉकडाऊनमुळे ६० टक्के मजूर बाहेरगावी अडकून पडले होते. वाहतूक व्यवस्था खोळंबल्याने उद्योगांना कच्चा माल पुरवठा, उत्पादनांचा पुरवठा, पॅकेजिंग, मटेरिअल, यंत्रांचे सुटे भाग मिळणे कठीण झाले होते. मजुरांच्या अभावाने कामाची वेळही कमी झाली. त्यामुळे उत्पादन निर्मिती अर्ध्यावर आली होती. या समस्यांमुळे प्रशासनाची मंजुरी मिळूनही ६० टक्के उद्योग बंद होते. वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा फटका येथील उद्योगांना बसला आहे. हे नुकसान भरून निघायला अजून बराच कालावधी लागणार आहे.

  

उद्योगांची आर्थिक अडचण

लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेले उद्योग वर्षभरानंतरही आर्थिक अडचणीमुळे बंद आहेत. जवळपास सर्वच उद्योग ५० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत.

 

केवळ २० टक्के वाढीव कर्जाचा दिलासा

उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी शासनाकडून केवळ २० टक्के वाढीव कर्ज देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केल्या गेला; मात्र इतर कुठलेही कर्ज माफ, व्याज माफ अथवा करामध्ये सूट दिली नसल्याने उद्योजकांमध्ये नाराजी आहे.

 

उद्योजकांची आर्थिक हानी भरून निघालेली नाही. अद्यापही उद्योग पूर्ववत सुरू झालेले नाहीत. मध्यंतरी उद्योगाला चालना मिळत असताना पुन्हा लॉकडाऊन झाल्याने आर्थिक नुकसान भरून निघायला वेळ लागेल.

- उन्मेष मालू, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळAkolaअकोला