शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

‘आमचं काय ते बाेला’; ४२ काेटींच्या प्रस्तावांना खाेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:18 IST

यंदा अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत महापालिकेला १० काेटींचा निधी प्राप्त झाला. याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या वाटेला ...

यंदा अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत महापालिकेला १० काेटींचा निधी प्राप्त झाला. याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या वाटेला जाणारा ४२ काेटींचा निधीदेखील मनपाकडे वळता करण्यात आला. सत्ताधारी भाजपने घाईघाईत ठराव मंजूर करून विकास कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले.

हा निधी परस्पर वळता केल्याची बाब जिल्ह्यातील एका प्रभावी लाेकप्रतिनिधीच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी मनपाच्या प्रस्तावात खाेडा घातला. जिल्हा प्रशासन ‘बॅक फूट’वर गेल्याने ४२ काेटींचे प्रस्ताव रद्द हाेण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

महापालिकेला यंदा अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार याेजनेतून १० काेटींचा निधी मंजूर झाला हाेता. शहराची हद्दवाढ लक्षात घेता हा निधी अपुरा असल्यामुळे पुनर्विनियाेजन अंतर्गत अतिरिक्त ४२ काेटी ५० लाख अशा एकूण ५२ काेटी ५० लाख रुपयांतून विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. पुनर्विनियाेजन अंतर्गत प्राप्त निधी हा जिल्हा परिषदेच्या वाटेला जाणार हाेता. ताे शहरातील विकास कामांसाठी वळता करण्याकरिता विशेष समाज कल्याण विभाग व जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर वेगवान घडामाेडी पार पडल्या हाेत्या. ही बाब जिल्ह्यात प्रभावशाली असलेल्या एका लाेकप्रतिनिधीला समजताच त्यांनी हा निधी महापालिकेसाठी मंजूर न करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर दबाव वाढताच मनपाने सादर केलेले २७ काेटींचे प्रस्ताव अडगळीत पडले. यामध्ये केवळ मनपासाठी मंजूर असलेल्या १० काेटी रुपयांच्या विकास कामांनाच मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

नगरसेवकांच्या ताेंडचे पाणी पळाले!

नगरसेवकांनी ५२ काेटी ५० लाखांच्या निधीतून एकूण ३३७ प्रस्ताव तयार केले. यासाठी १८ फेब्रुवारी राेजीच्या सभेची मान्यता घेण्यात आली. आता अचानक टक्केवारीचा मुद्दा उपस्थित झाला अन् मनपाचे प्रस्ताव बाजूला सारण्यात आल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांच्या ताेंडचे पाणी पळाल्याची चर्चा आहे.

तांत्रिक पेच निर्माण

मनपात १८ फेब्रुवारी राेजी पार पडलेल्या सभेत ५२ काेटी ५० लाखांच्या निधीतून तयार हाेणाऱ्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने सदरचे प्रस्ताव रद्द केल्यास तांत्रिक पेच निर्माण हाेण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी निमा अराेरा काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.