शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

दहावीच्या दाखल्यांवर शेरा काय असणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा- ५३४ दहावीतील विद्यार्थी- २५,६३३ पास विद्यार्थी- २५,६३१ मुख्याध्यापक म्हणतात... ...

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा- ५३४

दहावीतील विद्यार्थी- २५,६३३

पास विद्यार्थी- २५,६३१

मुख्याध्यापक म्हणतात...

दरवर्षी गुणपत्रिकेसोबतच शाळा सोडल्याचा दाखला देतो. परंतु अद्यापही गुणपत्रिकाच बोर्डाकडून आल्या नाहीत. दाखल्यावर शेरा लिहिताना, विद्यार्थ्यांची टक्केवारी, कोणत्या श्रेणीत उत्तीर्ण झाला. हे लिहावे लागणार आहे. परंतु तारीख कोणती टाकायची. याबाबत संभ्रम आहे. बोर्डाने गुणपत्रिका पाठविल्यानंतर सूचनाही येतील.

-मनीषा अभ्यंकर, मुख्याध्यापिका भारत विद्यालय

दहावीचा निकाल ऑनलाइन लागला. परंतु अद्याप गुणपत्रिका वितरणाची तारीख आली नाही. शाळेचा दाखला देताना, गुणपत्रिकेवरील तारीख आणि शेऱ्यामध्ये उत्तीर्ण असे लिहावे लागणार आहे. परंतु याबाबत बोर्डाकडून अशा कोणत्याही सूचना आल्या नाहीत. काही सूचना आल्यास, त्यानुसार शाळेचे दाखले देऊ.

-माधव मुन्शी, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश हायस्कूल

पालक म्हणतात...

दहावीचा निकाल लागला. आता गुणपत्रिकेची प्रतीक्षा आहे. शाळेच्या दाखल्यावर आता शेरा लिहितात, याची कल्पना नाही. परंतु गुणवंत विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर चांगला शेरा असावा. सीईटी परीक्षा ऐच्छिक आहे. त्यामुळे संभ्रम आहे. गुणपत्रिका व दाखले लवकर द्यावेत.

-ज्ञानेश्वर खोबरखेड, पालक

निकाल लागल्यावर शाळेच्या दाखल्यावर ग्रेड देतात की श्रेणी देतात, याची माहिती नाही. परंतु अकरावी प्रवेशास पात्र असा शेरा न लिहिता, विद्यार्थ्यांना ग्रेड द्यावे. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. यंदा सर्वच विद्यार्थी एकाच रांगेत आणून ठेवले. त्यामुळे गुणवंतांचे नुकसान होऊ नये.

-नारायण पवार, पालक