शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

सिग्नलला काेण घाबरताे? पाेलीस असेल तरच आम्ही नियम पाळताे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 12:15 IST

Akola Traffic : सिग्नलला गांभीर्याने न घेणाऱ्या अशा बेबंद वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक झाले आहे.

अकाेला : अकाेल्यातील वाहतुकीला कितीही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी अनेक वाहनचालक या प्रयत्नांना भीक घालत नाहीत. त्यामुळे वाहतुकीची काेंडी हे नेहमीचेच चित्र झाले आहे. शहरात सध्या नेकलेस राेडवर सिग्नल लावण्यात आले आहेत. मात्र, सिग्नलचे संकेतही दुर्लक्षित करताना अनेक वाहनचालक दिसतात. जर चाैकात पाेलीस उभे असतील तरच सिग्नलला गांभीर्याने न घेणाऱ्या अशा बेबंद वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक झाले आहे. पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेकडून सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू असते. २०२१ या वर्षभरात अधिक गतीने वाहन चालविणाऱ्या ३२ हजारपेक्षा अधिक चालकांना दंड ठोठावण्यात आला तसेच ५,१५० वाहनचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांची वाहने जप्त केली आहेत. मात्र, या कारवाईलाही न जुमानणाऱ्या बेदरकार वाहनचालकांमुळे वाहतुकीला शिस्त लागत नाही.

रतनलाल प्लाॅट चाैक

नेकलेस राेडवरील माेठ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी जाणारे ग्राहक व या मार्गावरून शहरातील प्रमुख रूग्णालयात जाणाऱ्यांच्या गर्दीने हा चाैक सदैव गजबजलेला असताे. या चाैकात सिग्नल लाल असतानाही अनेकदा वाहनचालक बेदरकारपणे सिग्नलचा संकेत माेडून रस्ता पार करताना दिसतात.

 

सिव्हील लाईन चाैक

नेहरू पार्ककडून सिव्हील लाईन चाैकात जाणारा मार्गही रहदारीचाच आहे. या चाैकात अनेकांना सिग्नलवर थांबण्यास जणू काही वेळ नसताे. शुक्रवारीही एक तरूणी सिग्नल सुरू हाेण्याची वाट न पाहता सुसाट निघाली. असा प्रकार दिवसभरात अनेकदा दिसताे.

डावी बाजू मोकळी कधी ठेवणार?

रतनलाल प्लाॅट, सिव्हील लाईन चाैकातील सिग्नलवरून डावीकडे वळण्यासाठी सिग्नलची गरज नसते. मात्र, डावीकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी डावी बाजू माेकळी ठेवली पाहिजे, याचे भान अनेक वाहनधारकांना नसते. त्यामुळे डावीकडे जाणाऱ्या बाजूलाही वाहने उभी करून सिग्नल सुरू हाेण्याची वाट पाहणे कधी थांबविणार, हा प्रश्नच आहे.

 

सगळी जबाबदारी पाेलिसांचीच का?

वाहतूक सुरळीत व्हावी, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, त्यासाठी पाेलिसांनीच दंडुका घेऊन रस्त्यावर उतरावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

प्रत्येकाने नियमांचे पालन केले तर रस्ता सुरक्षेच्या प्रश्नासह वाहतूक काेंडीची समस्या आपाेआप निकालात निघू शकते. यासाठी गरज आहे ती फक्त नियम पाळण्याची.

 

पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली आहे. ती सुरूच राहील. मात्र, नागरिकांनीही नियमांचे पालन केले तर आपल्याच शहराची वाहतूक सुरळीत व सुरक्षित हाेईल.

- विलास पाटील, पोलीस निरीक्षक

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस