शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नलला काेण घाबरताे? पाेलीस असेल तरच आम्ही नियम पाळताे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 12:15 IST

Akola Traffic : सिग्नलला गांभीर्याने न घेणाऱ्या अशा बेबंद वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक झाले आहे.

अकाेला : अकाेल्यातील वाहतुकीला कितीही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी अनेक वाहनचालक या प्रयत्नांना भीक घालत नाहीत. त्यामुळे वाहतुकीची काेंडी हे नेहमीचेच चित्र झाले आहे. शहरात सध्या नेकलेस राेडवर सिग्नल लावण्यात आले आहेत. मात्र, सिग्नलचे संकेतही दुर्लक्षित करताना अनेक वाहनचालक दिसतात. जर चाैकात पाेलीस उभे असतील तरच सिग्नलला गांभीर्याने न घेणाऱ्या अशा बेबंद वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक झाले आहे. पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेकडून सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू असते. २०२१ या वर्षभरात अधिक गतीने वाहन चालविणाऱ्या ३२ हजारपेक्षा अधिक चालकांना दंड ठोठावण्यात आला तसेच ५,१५० वाहनचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांची वाहने जप्त केली आहेत. मात्र, या कारवाईलाही न जुमानणाऱ्या बेदरकार वाहनचालकांमुळे वाहतुकीला शिस्त लागत नाही.

रतनलाल प्लाॅट चाैक

नेकलेस राेडवरील माेठ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी जाणारे ग्राहक व या मार्गावरून शहरातील प्रमुख रूग्णालयात जाणाऱ्यांच्या गर्दीने हा चाैक सदैव गजबजलेला असताे. या चाैकात सिग्नल लाल असतानाही अनेकदा वाहनचालक बेदरकारपणे सिग्नलचा संकेत माेडून रस्ता पार करताना दिसतात.

 

सिव्हील लाईन चाैक

नेहरू पार्ककडून सिव्हील लाईन चाैकात जाणारा मार्गही रहदारीचाच आहे. या चाैकात अनेकांना सिग्नलवर थांबण्यास जणू काही वेळ नसताे. शुक्रवारीही एक तरूणी सिग्नल सुरू हाेण्याची वाट न पाहता सुसाट निघाली. असा प्रकार दिवसभरात अनेकदा दिसताे.

डावी बाजू मोकळी कधी ठेवणार?

रतनलाल प्लाॅट, सिव्हील लाईन चाैकातील सिग्नलवरून डावीकडे वळण्यासाठी सिग्नलची गरज नसते. मात्र, डावीकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी डावी बाजू माेकळी ठेवली पाहिजे, याचे भान अनेक वाहनधारकांना नसते. त्यामुळे डावीकडे जाणाऱ्या बाजूलाही वाहने उभी करून सिग्नल सुरू हाेण्याची वाट पाहणे कधी थांबविणार, हा प्रश्नच आहे.

 

सगळी जबाबदारी पाेलिसांचीच का?

वाहतूक सुरळीत व्हावी, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, त्यासाठी पाेलिसांनीच दंडुका घेऊन रस्त्यावर उतरावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

प्रत्येकाने नियमांचे पालन केले तर रस्ता सुरक्षेच्या प्रश्नासह वाहतूक काेंडीची समस्या आपाेआप निकालात निघू शकते. यासाठी गरज आहे ती फक्त नियम पाळण्याची.

 

पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली आहे. ती सुरूच राहील. मात्र, नागरिकांनीही नियमांचे पालन केले तर आपल्याच शहराची वाहतूक सुरळीत व सुरक्षित हाेईल.

- विलास पाटील, पोलीस निरीक्षक

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस