शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

सिग्नलला काेण घाबरताे? पाेलीस असेल तरच आम्ही नियम पाळताे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 12:15 IST

Akola Traffic : सिग्नलला गांभीर्याने न घेणाऱ्या अशा बेबंद वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक झाले आहे.

अकाेला : अकाेल्यातील वाहतुकीला कितीही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी अनेक वाहनचालक या प्रयत्नांना भीक घालत नाहीत. त्यामुळे वाहतुकीची काेंडी हे नेहमीचेच चित्र झाले आहे. शहरात सध्या नेकलेस राेडवर सिग्नल लावण्यात आले आहेत. मात्र, सिग्नलचे संकेतही दुर्लक्षित करताना अनेक वाहनचालक दिसतात. जर चाैकात पाेलीस उभे असतील तरच सिग्नलला गांभीर्याने न घेणाऱ्या अशा बेबंद वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक झाले आहे. पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेकडून सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू असते. २०२१ या वर्षभरात अधिक गतीने वाहन चालविणाऱ्या ३२ हजारपेक्षा अधिक चालकांना दंड ठोठावण्यात आला तसेच ५,१५० वाहनचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांची वाहने जप्त केली आहेत. मात्र, या कारवाईलाही न जुमानणाऱ्या बेदरकार वाहनचालकांमुळे वाहतुकीला शिस्त लागत नाही.

रतनलाल प्लाॅट चाैक

नेकलेस राेडवरील माेठ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी जाणारे ग्राहक व या मार्गावरून शहरातील प्रमुख रूग्णालयात जाणाऱ्यांच्या गर्दीने हा चाैक सदैव गजबजलेला असताे. या चाैकात सिग्नल लाल असतानाही अनेकदा वाहनचालक बेदरकारपणे सिग्नलचा संकेत माेडून रस्ता पार करताना दिसतात.

 

सिव्हील लाईन चाैक

नेहरू पार्ककडून सिव्हील लाईन चाैकात जाणारा मार्गही रहदारीचाच आहे. या चाैकात अनेकांना सिग्नलवर थांबण्यास जणू काही वेळ नसताे. शुक्रवारीही एक तरूणी सिग्नल सुरू हाेण्याची वाट न पाहता सुसाट निघाली. असा प्रकार दिवसभरात अनेकदा दिसताे.

डावी बाजू मोकळी कधी ठेवणार?

रतनलाल प्लाॅट, सिव्हील लाईन चाैकातील सिग्नलवरून डावीकडे वळण्यासाठी सिग्नलची गरज नसते. मात्र, डावीकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी डावी बाजू माेकळी ठेवली पाहिजे, याचे भान अनेक वाहनधारकांना नसते. त्यामुळे डावीकडे जाणाऱ्या बाजूलाही वाहने उभी करून सिग्नल सुरू हाेण्याची वाट पाहणे कधी थांबविणार, हा प्रश्नच आहे.

 

सगळी जबाबदारी पाेलिसांचीच का?

वाहतूक सुरळीत व्हावी, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, त्यासाठी पाेलिसांनीच दंडुका घेऊन रस्त्यावर उतरावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

प्रत्येकाने नियमांचे पालन केले तर रस्ता सुरक्षेच्या प्रश्नासह वाहतूक काेंडीची समस्या आपाेआप निकालात निघू शकते. यासाठी गरज आहे ती फक्त नियम पाळण्याची.

 

पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली आहे. ती सुरूच राहील. मात्र, नागरिकांनीही नियमांचे पालन केले तर आपल्याच शहराची वाहतूक सुरळीत व सुरक्षित हाेईल.

- विलास पाटील, पोलीस निरीक्षक

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस