शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बारावीच्या परीक्षांवर पर्याय काय? शासन विचारात, विद्यार्थी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:21 IST

अकाेला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. आता बारावीच्या परीक्षेवर काथ्याकूट सुरू आहे. ...

अकाेला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. आता बारावीच्या परीक्षेवर काथ्याकूट सुरू आहे. निकाल कोणत्या पद्धतीने लागणार, विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन आणि शालेय पातळीवर घेतलेल्या परीक्षांच्या आधारे निकाल लागणार की असे नानाविध प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांसमोर आहेत. या परीक्षांबाबत शासन सध्यातरी विचारात असून विद्यार्थी संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

बारावीची परिक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे

बारावीच्या परीक्षेचे मूल्यांकन महत्त्वाचे. मूल्यांकन नसेल तर अध्ययन व अध्यापनाचे गांभीर्यच राहणार नाही. विद्या विनयेन शोभते प्रमाणे आता ‘विद्या परीक्षेन शोभते’ म्हणावं लागेल.

बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय व अभियांत्रिकीसह इतर विद्याशाखांना प्रवेश दिला जाताे. बारावीची परीक्षाही विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दुष्टीने सर्वात महत्वाची परीक्षा आहे त्यामुळे या परीक्षेच्या मूल्यमापनावर सध्या चर्चा सुरू आहेत. दुसुरीकडे अंतर्गत मूल्यमापन कसे होणार, कशा पद्धतीने करणार? याबाबत पालकांना चिंता वाटत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे. यासाठी राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र आता काेराेनाची लाट ओसरत आहे त्यामुळे परिक्षा घ्यावी असा एक मतप्रवाह शिक्षण तज्ज्ञांमध्ये आहे तर काहींना बहुपर्यायी प्रश्नावली असलेली ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबतही विचारसमाेर येत आहे. शासनाने सध्या तरी याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही त्यामुळे बारावीच्या परीक्षांचा निर्णय सध्यातरी अधांतरी आहे.

अनेक महत्वाच्या विद्याशाखांचे बारावी हे प्रवेशद्वार आहे त्यामुळे विद्यार्थ्याचे मूल्यमापन हे परीक्षेद्वारेच हाेणे अपेक्षित आहे, काेराेनाची परिस्थिती बघून परीक्षेबाबत निर्णय व्हावा .बारावीची परीक्षा ऑनलाइन घेणे हा खरे तर याेग्य पर्यया नाही. मात्र काेराेनाची लाट ओसरत नसेल तर बहुपया प्रश्नावली स्वरूपात परीक्षा घेता येतील

- डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय

..

कोरोना परिस्थिती सुधारण्ण्याची वाटच केंद्रीय व राज्य शिक्षण मंडळ पाहत राहिले. मूल्यांकनाच्या रू पर्यायी व्यवस्थेचा विचार पण केला नाही.

आता सर्व विषयांची परीक्षा घेणे कठीण असेल तर ,ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश पाहिजे असेल त्यासंबंधी विषयांची कृत्रिम बुत्रि मत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) उपयोग करून बहुपर्यायी निवड प्रश्नांव्दारे मुल्यांकन होणे सहज शक्य आहे. ह्या सर्व परिक्षा त्या त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परिक्षा म्हणून असतील.

-डाॅ संजय खडक्कार,

परिक्षा व मूल्यमापन समिती सदस्य,

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

.....................

बारावीची परीक्षा आवश्यकच आहे, गेल्या वषीर् काेराेनाकाळातच नीटची परीक्षा झाली त्यामुळे उपाययाेजना व नियमांचे पालन करून परीक्षा हाेणे हाच एक पय

आहे. बारावी नंतर इतर विद्याशाखांचे प्रवेश हाेतात त्यामुळे परिक्षा गरजेचीच आहे

प्रा. प्रकाश डवले, प्राचार्य डवले महाविद्यालय

.................

मुक्त विद्यामीठाने घेतल्या परिक्षा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने कुलगुरू डाॅ. ई. वायुनंदन यांच्या मार्गदर्शनाखाली, डाॅ. दिनेश भोंडे, कुलसचिव यांच्या तज्ज्ञ देखरेखीखाली,

मागील वर्षी व यंदा ही त्यांच्या सर्व परीक्षा बहुपर्यायी निवड प्रश्नावली या पध्दतीने यशस्वीपणे घेतल्या. हाच पॅटर्न बारावीसाठी लावण्यात यावा असा एक मतप्रवाह आहे

......................