शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 10:40 IST

पाच जिल्ह्यात सरासरी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते.

अकोला: खरीप हंगामातील नियोजन करण्याचे काम सुरू असून,पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबतच शेतकऱ्यांकडील भाजीपाला, फळे विक्रीसाठी मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे.अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यात सरासरी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.येत्या ३१ मे पर्यंत अमरावती विभागातील नियोजनाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठा खते, बियाणे, कीटकनाशके ,औषधांचा पुरवठा करण्यासाठी घाऊक विक्रेते व वितरकाकडून बियाणे खतांचे ग्रेड इत्यादी माहिती घेऊन सहसंचालक कार्यालयाला पाठवावी त्यासाठीच्या सूचना सर्व कृषी सहाय्यक ते अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत, तसेच प्रत्येक दिवसाचा अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवण्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तालुका तसेच मंडळ स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कच्चे काम सुरू आहे किंवा नाही, त्याचा अहवाल शेतकºयांना शेती कामासाठी लागणाºया मजुरांना त्यांच्या मागणीप्रमाणे कामाच्या कालावधीसाठी ओळखपत्र देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. कृषी सहायकांना क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी त्यांना निर्धारित केलेल्या मुख्यालयी जातात किंवा नाही, याबाबत सरपंचाकडून खातरजमा करून घ्यावी, तसेच खरीप हंगामातील नियोजन करून अंमलबजावणीला सुरुवात करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.विभागात ३२ लाख हेक्टरवर खरीप हंगामात पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे. शेतकºयांकडील फळे भाजीपाला विकण्यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.- सुभाष नागरे,विभागीय सह संचालक,कृषी, अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती