शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 10:40 IST

पाच जिल्ह्यात सरासरी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते.

अकोला: खरीप हंगामातील नियोजन करण्याचे काम सुरू असून,पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबतच शेतकऱ्यांकडील भाजीपाला, फळे विक्रीसाठी मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे.अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यात सरासरी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.येत्या ३१ मे पर्यंत अमरावती विभागातील नियोजनाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठा खते, बियाणे, कीटकनाशके ,औषधांचा पुरवठा करण्यासाठी घाऊक विक्रेते व वितरकाकडून बियाणे खतांचे ग्रेड इत्यादी माहिती घेऊन सहसंचालक कार्यालयाला पाठवावी त्यासाठीच्या सूचना सर्व कृषी सहाय्यक ते अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत, तसेच प्रत्येक दिवसाचा अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवण्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तालुका तसेच मंडळ स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कच्चे काम सुरू आहे किंवा नाही, त्याचा अहवाल शेतकºयांना शेती कामासाठी लागणाºया मजुरांना त्यांच्या मागणीप्रमाणे कामाच्या कालावधीसाठी ओळखपत्र देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. कृषी सहायकांना क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी त्यांना निर्धारित केलेल्या मुख्यालयी जातात किंवा नाही, याबाबत सरपंचाकडून खातरजमा करून घ्यावी, तसेच खरीप हंगामातील नियोजन करून अंमलबजावणीला सुरुवात करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.विभागात ३२ लाख हेक्टरवर खरीप हंगामात पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे. शेतकºयांकडील फळे भाजीपाला विकण्यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.- सुभाष नागरे,विभागीय सह संचालक,कृषी, अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती