शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

म्हणे, तुम्हीच सांगा कोणती विकास कामं हवीत?

By admin | Updated: September 15, 2014 01:58 IST

भाजप मागविणार मतदारांकडूनच विकासनामा

अकोला- दीड दशकांपासून अकोला शहराचे प्रतिनिधित्त्व करणार्‍या भारतीय जनता पक्षाने मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये कोण ती विकास कामं हवीत याबाबत जनतेची मतं जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना एवढय़ा वर्षांत जिल्ह्यातील समस्याही जाणून घेता आल्या नाही, ते समस्या कसे सोडवतील, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसोबतच सर्वच पक्षांकडून आता मतदारांना आकर्षित करण्याचे नव-नवीन फंडे शोधले जात आहे. त्यात भाजपही मागे नाही. अकोला जिल्ह्यात दोन आमदार आणि एक खासदार असलेल्या भाजपचा मित्र पक्ष, शिवसेनेचाही एक आमदार आहे. अकोला पश्‍चिम मतदारसंघात तर १५ वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. दहा वर्षांपासून भाजपचे खासदार आहेत. मूर्तिजापूर या मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. असे असतानाही आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपतर्फे पाचही मतदारसंघांचा ह्यविकासनामाह्ण जाहीर केला जाणार आहे. त्यासाठी भाजप कार्यालयाने मतदारांनाकडून त्यांच्या परिसरातील समस्यांची माहिती मागविली आहे. विकास कसा करावा, यासाठी मतदारांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. जनतेकडून येणार्‍या सूचना आणि अपेक्षा नोंदवून घेण्यासाठी भाजप कार्यालयात पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली नाही. हा सर्व खटाखोट निवडणुकीची घोषणा झाल्यावर सुरू करण्यात आला आहे. भाजपच्या उमेदवारांना जिल्ह्यातील समस्या आणि येथे कोणता विकास हवा याची साधी माहितीही दीड दशकात करून घेता आली नाही, त्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील समस्या विधानसभेत कशा मांडल्या असतील आणि ते सोडवून घेण्यासाठी किती प्रयत्न केले असतील हे यानिमित्ताने स्पष्ट होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. अकोला शहारातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील जनता मुलभूत सुविधांपासून वंचित आहे, हे कुणी सांगण्याची गरज नाही. विकास कामांची पाटी कोरी असताना, ह्य तुम्हाला कोणता विकास हवाह्ण, हे जनतेकडूनच जाणून घेण्यात कोणते लोकाभिमूख काम भाजपकडून होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.