शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

हवामानावर आधारित पीक विमा योजनेत तुरीला डावलले!

By admin | Updated: November 11, 2015 01:10 IST

मका, जवस, सूर्यफूल व करडई पिकांकडे दुर्लक्ष; योजनेचा सर्वत्र विस्तार आवश्यक.

राजरत्न सिरसाट/ अकोला : डाळवर्गीय पिकात तूर डाळीला महत्त्वाचे स्थान आहे. जवस, करडई, सूर्यफूल या तेलवर्गीय पिकांसह मका या पिकाची मागणी वाढली आहे; परंतु याच पिकांना नेमके हवामानावर आधारित पीक विमा योजनेतून डावलण्यात आले आहे. विदर्भात या पिकांचे क्षेत्र मोठे असल्याने, या पिकांचा योजनेत समावेश करणे गरजेचे आहे. भात, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांचे राज्यात उत्पादन घेतले जाते. रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, जवस आदी पिके घेतली जातात; परंतु गेल्या काही वर्षांपासून या पिकांचे उत्पादन घटत आहे. दुष्काळ, गारपीट, पाण्याची कमतरता, नापिकी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित न मिळणारे भाव, ही प्रमुख कारणे याला कारणीभूत असून, बदलत्या हवामानाच्या या ऋतुचक्रात शेती अर्थकारणावर मोठा प्रभाव झाला आहे. सततच्या दुष्काळ आणि अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करणारा शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी विमा योजना, हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या नुकसानाची भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्‍चित करण्यासाठी राज्यातील सर्व अधिसूचित पिकांसाठी खरीप हंगामात सर्व अधिसूचना लागू करण्यात येते. भारतीय कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करू न नुकसान निश्‍चित करण्यात येते. हवामानावर आधारित पीक विमा योजना २0१४ खरीप हंगामात ठाणे, रायगड, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा व नागपूर या निवडक १२ जिल्हय़ात लागू करण्यात आली होती. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या पिकासाठी पथदर्शक स्वरू पात ही योजना होती. विदर्भात ११ जिल्हय़ातील खरीप भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मागील दहा वर्षातील जिल्हानिहाय सरासरी क्षेत्र अमरावती विभागात ८५ टक्के व नागपूर विभागात ८0 टक्के असले, तरी या योजनेतून तूर, मका,जवस, सूर्यफूल, करडई इत्यादी पिकांना डावलले. तूर डाळीचे प्रतिकिलो भाव १८0 रुपयांवर गेल्याने या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जवस हे नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर व गडचिरोली या जिलंतील रबीतील प्रमुख पीक आहे. कमी पावसात येणारे पीक अशी त्याची ओळख आहे. सूर्यफूल, करडई, तीळ ही पिकेही कमी पाण्यात येणारी आहेत. ही पिके शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आहेत; पण याच पिकांना पीक विमा योजनेत समाविष्ट केले नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे डॉ. राजेंद्र देशमुख तसेच सेवानवृत्त कृषी सांख्यिकी डॉ. श्यामकांत जहागिरदार व रणजित पाटील यांनी विदर्भातील पाक विम्याचा अभ्यास केला आहे. त्यांनी पीक विमा शेतकर्‍यांना कसा पोषक आहे, त्याचे निष्कर्ष काढले आहेत.